शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Festival 2019 : निर्माल्य, गणेशमूर्ती दान करूया, जलसाठे सुरक्षित ठेवूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 08:19 IST

निर्माल्य केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर कधीही नदीपात्रात अथवा अन्य जलसाठ्यांत सोडणे टाळावे.

महेंद्र दातरंगे

नाशिक - नैसर्गिक जलसाठे पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित टिकवून ठेवण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. पाण्याचे महत्त्व आपण लक्षात घेत धार्मिक सण-उत्सव काळातही त्याबाबत कृतिशील उपाययोजना करायला हव्यात. निर्माल्य केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर कधीही नदीपात्रात अथवा अन्य जलसाठ्यांत सोडणे टाळावे.

गणेशोत्सवात निर्माल्याचे प्रमाण वाढलेले असते. दहा दिवस गणेशमूर्तीला वाहिलेली फुले, दूर्वा, फुलांचे हार, फळे, नैवेद्य आदी वस्तूंचा निर्माल्य स्वरूपातील साठा अनंतचतुर्दशीला नदीपात्रात सोडला जातो. यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन नैसर्गिक जलसाठ्यांची अपरिमित हानी होते. राज्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मूर्ती दान आणि निर्माल्य संकलनाची मोहीम साधारणत: १९९२ साली सुरू केली गेली. सर्वप्रथम कोल्हापूर आणि नंतर नाशिकला या विवेकाचा आवाज बुलंद झाला.

१९९५ साली नाशिकला निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यास सुरुवात ‘अंनिस’ने केली. गणेशोत्सवात जलप्रदूषण होते हे पटवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले गेले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही लक्ष वेधले आणि न्यायालयातदेखील याविषयी दाद मागितली. काळानुरूप आज चित्र बदलले असून निर्माल्य, गणेशमूर्ती संकलनाचे काम आता अंनिसला करायची गरज भासत नाही. कारण विविध सामाजिक, समविचारी संघटना यासाठी सरसावल्या आहेत. निर्माल्य पाण्यात टाकल्यानंतर ते कुजून सडते. त्यामुळे पाण्यात आपोआप रासायनिक प्रक्रिया होऊन पाण्यातील जैवविविधता धोक्यात येते. हे टाळायला हवे.

मानसिकता बदला 

पीओपीपासून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. लाखो किलो पीओपी नदीपात्रात सोडली जाते. ते जलसाठ्यात विरघळत नाही त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत व जलचर जैवविविधता संकटात सापडते. घातक रासायनिक द्रव्यांमुळे त्वचारोगापासून गंभीर व दुर्धर आजारदेखील ओढावण्याचा धोका असतो.

नदीचे वाहते पाणी पुढे शेतीला मिळाले तर जमिनी नापिकी होतात. शेती उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे लोकांनी मानसिकता बदलणे देखील गरजेचे आहे.

तरुणांनी पुढाकार घ्यावा

तरुणाईने पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि नैसर्गिक जलसाठे सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपण नद्यांना मनापासून पवित्र मानून त्यांचे पावित्र्य राखण्याची गरज आहे. वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित कराव्या या नियमात कालसापेक्ष बदल करणे गरजेचे आहे.

1997 साली केवळ १०२ नाशिककरांनी त्यांच्या विसर्जित मूर्ती समितीकडे दान केल्या. तेव्हापासून संपूर्ण राज्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.

(लेखक महाराष्ट्र अंनिस नाशिक शाखेचे जिल्हा कार्यवाह आहेत.)

शब्दांकन : अझहर शेख

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेशोत्सवWaterपाणीpollutionप्रदूषण