शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

कोरोनासारखी संकटे येत राहणार; तयार राहणे एवढेच आपल्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 15:39 IST

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दिपक आपटे यांची विशेष मुलाखत

निसर्गाच्या वाढत्या ºहासामुळे कोरोनासारखी अनेक संकटे भविष्यात येऊ शकतात. त्यासाठी तयार राहणे एवढेच आपल्या हातात आहे. विकासासाठीचे कुठलेही पाऊल निसर्गाच्या ºहासाकडे घेऊन जाते. तो थांबविणे आता आपल्या हातात नाही. हा ºहास कमीत कमी कसा होईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दिपक आपटे यांनी स्पष्ट केले. बीएनएचएसचे संचालक म्हणून पाच वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली. पर्यावरण शिक्षण आणि संशोधनात १३७ वर्षांपासून ही संस्था काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आपटे यांच्याशी संवाद साधला.- गजानन दिवाण, उप वृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद.कोरोनाने आम्हाला काय शिकविले?- निसर्गाचा वाढता ºहास पाहता कोरोना हे शेवटचे संकट आहे असे समजता कामा नये. अशी अनेक संकटे येऊ शकतात. त्यासाठी तयार राहणे एवढेच आपल्या हातात आहे. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणाऱ्या रोगांवर आता अधिक काम करण्याची गरज आहे. शहरी भागातील जैवविविधतेचा अभ्यास करायला हवा. या जैवविविधतेतील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. जोर्पंत आपण त्या जीवाला ईजा पोहचवत नाही, तोपर्यंत सर्व ठीक असते. एकमेकांचा हस्तक्षेप वाढला की संघर्ष निर्माण होतो. चंद्रपुरात वाघांच्या बाबतीत तेच होत आहे. हे टाळण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हायला हवा. या जैवविविधतेत होणाºया बदलावर लक्ष ठेवायला हवे. त्याचे परिणाम शोधत राहावे लागणार आहेत. नंतर त्यावरील उपाय याचाही अभ्यास करावा लागेल. अशा प्रश्नाला सामोरे जाणारा भारत हा काही एकमेव देश नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील जवळपास सर्वच देश या संकटाचा सामना करीत आहे. आपली स्थिती त्यांच्यापेक्षा वाईट आहे. कारण आपली लोकसंख्या, दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्यांच्या संख्या आणि प्रमुख गरजादेखील पूर्ण होऊ न शकणारी संख्या या पार्श्वभूमीवर इतर देशांच्या तुलनेत आपल्यासमोरील आव्हान अधिक मोठे आहे.यावर उपाय काय?- आता आपण पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे सेंद्रीय शेतीचे चांगले मॉडेल आपण उभे करायला हवे. भारताने अलिकडेच २७ कीटकनाशकावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. निसर्गाचा ºहास थांबविण्यासाठी असे निर्णय आपल्याला भविष्यात घ्यावे लागतील. सरकारच्या अशा भूमिकेला लोकांनीदेखील सहकार्य केले पाहिजे. जागतिक पातळीवर आपण पर्यटन उभे करू शकू का, याबाबतही विचार व्हायला हवा. हे सर्व करीत असताना संरक्षित क्षेत्र संरक्षित कसे राखले जातील, याचाही विचार करायला हवा. शेवटी मानव-वन्यजीव संघर्ष हा कोणालाच परवडणारा नाही. केवळ संवर्धन करुन भागणार नाही, तर वाढलेल्या जैवविविधतेला कसे सांभाळणार याचेही नियोजन व्हायला हवे.

विकास महत्त्वाचा की निसर्ग?- आता जंगलाच्या बाहेर खनिजे शिल्लक राहिलेच नाहीत. जगभरात हीच स्थिती आहे. म्हणून आम्ही आता जंगलातले खनिज ओरबाडण्याच्या मागे आहोत. आणि हे होणे अटळ आहे. हे फक्त खनिजाब्द्दल होत आहे, असे नाही. आम्ही विकासासाठी जे काही करीत आहोत, त्यामुळे निसर्गाचे नुकसान होणारच आहे. फक्त हे नुकसान कमीत कमी कसे करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे.माणसाचे पोट की पर्यावरण?शिक्षण पूर्ण होऊन रोजगाराच्या मागे असलेल्या माणसाला निसर्गाचे हे गणित सांगून उपयोग नाही. त्याची प्राथमिकता वेगळी आहे. त्याला स्वत:चे, कुटुंबाचे पोट भरायचे आहे. हे झाल्यानंतर विकासदेखील साधायचा आहे. त्याच्या या गरजा आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे पहिल्या वर्गापासूनच म्हणजे लहानपणापासूनच निसर्ग संवर्धनाचे बीज आम्ही कसे पेरू यावरच आपला भविष्यकाळ अवलंबून राहणार आहे. निसर्गाभिमुख जीवनशैली हे शालेय शिक्षणापासून मनावर बिंबविण्याची गरज आहे.बीएनएचएसमधील आपल्या प्रवासाबद्दल काय सांगाल?- जानेवारी १९९४मध्ये मी बीएनएचएस जॉईन केली. मरीन म्हणजे समुद्री जीव हा माझा अभ्यास. हे क्षेत्र तसे दूर्लक्षितच होते. मात्र सध्या बीएनएचएसचे देशात रत्नागिरीपासून तामीळनाडूपर्यंत समुद्री जीवावर अनेक प्रकल्प सुरु आहेत. गेल्या पाच वर्षांत संस्थेने संशोधनासोबतच बर्ड रिंगींग, पक्ष्यांचे स्थलांतर यावर मोठे काम केले. वेगवेगळ्या संवर्धन प्रकल्पांसाठी १०० कोटींचा निधी उभा केला. संशोधन डिजीटलायझेजशन सुरू केले. म्हणजे सर्वसामान्यांनाही पुढील पाच वर्षांत बीएनएचएसच्या वेबसाईटवर हे सर्व संशोधन पाहणे शक्य होणार आहे. हिमालय क्लायमेट चेंज, मरीन प्रोग्राम, आदी महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले. केंद्रसरकारच्या नॅशनल प्लान फॉर कंझर्वेशन आॅफ मायग्रेटरी बर्ड निर्मीतीमध्ये मोठा सहभाग राहिला. ग्रीन मुनीयासह असुरक्षित झालेल्या तीन प्रजातींच्या संवर्धनाचा प्रकल्प सुरु केला. लक्षद्वीपमध्ये याचवर्षी ६८५चौरस कि.मी. परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. २००४पासून त्या परिसरात केलेल्या कामाची ही पावती आहे. बीएनएचएसकडे असलेल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रजातींचे कलेक्शन आता फायरप्रुफ केबिनमध्ये ठेवण्यात आले आहे. संवर्धनामध्ये राष्टÑीय पातळीवर गेल्या पाच वर्षांत कॉरिडोरमधून जाणारे रस्ते, खाणी आदी विषय हाताळले. विकास केला जावा. पण तो करीत असताना निसर्ग संवर्धनाचे शास्त्र विचारात घ्यायला हवे. हे शास्त्र सरकारला समजून सांगण्याचा प्रयत्न केला.आता पुढे काय?- १३७ वर्षांचा इतिहास असलेल्या संस्थेचे संचालकपद पाच वर्षे सांभाळले. संशोधन, संवर्धन, एज्यूकेशन आणि प्रशासन या सर्वपातळीवर काम केले. यात प्रत्येक कर्मचाºयाचा खारीचा वाटा आहे. केलेल्या कामाचे समाधानही आहे. आता कुटूंब आणि आवडीच्या समुद्री जीवावर आणखी संशोधन करण्यासाठी वेळ मिळणार आहे. त्याचाही आनंद आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण