शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासारखी संकटे येत राहणार; तयार राहणे एवढेच आपल्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 15:39 IST

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दिपक आपटे यांची विशेष मुलाखत

निसर्गाच्या वाढत्या ºहासामुळे कोरोनासारखी अनेक संकटे भविष्यात येऊ शकतात. त्यासाठी तयार राहणे एवढेच आपल्या हातात आहे. विकासासाठीचे कुठलेही पाऊल निसर्गाच्या ºहासाकडे घेऊन जाते. तो थांबविणे आता आपल्या हातात नाही. हा ºहास कमीत कमी कसा होईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दिपक आपटे यांनी स्पष्ट केले. बीएनएचएसचे संचालक म्हणून पाच वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली. पर्यावरण शिक्षण आणि संशोधनात १३७ वर्षांपासून ही संस्था काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आपटे यांच्याशी संवाद साधला.- गजानन दिवाण, उप वृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद.कोरोनाने आम्हाला काय शिकविले?- निसर्गाचा वाढता ºहास पाहता कोरोना हे शेवटचे संकट आहे असे समजता कामा नये. अशी अनेक संकटे येऊ शकतात. त्यासाठी तयार राहणे एवढेच आपल्या हातात आहे. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणाऱ्या रोगांवर आता अधिक काम करण्याची गरज आहे. शहरी भागातील जैवविविधतेचा अभ्यास करायला हवा. या जैवविविधतेतील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. जोर्पंत आपण त्या जीवाला ईजा पोहचवत नाही, तोपर्यंत सर्व ठीक असते. एकमेकांचा हस्तक्षेप वाढला की संघर्ष निर्माण होतो. चंद्रपुरात वाघांच्या बाबतीत तेच होत आहे. हे टाळण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हायला हवा. या जैवविविधतेत होणाºया बदलावर लक्ष ठेवायला हवे. त्याचे परिणाम शोधत राहावे लागणार आहेत. नंतर त्यावरील उपाय याचाही अभ्यास करावा लागेल. अशा प्रश्नाला सामोरे जाणारा भारत हा काही एकमेव देश नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील जवळपास सर्वच देश या संकटाचा सामना करीत आहे. आपली स्थिती त्यांच्यापेक्षा वाईट आहे. कारण आपली लोकसंख्या, दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्यांच्या संख्या आणि प्रमुख गरजादेखील पूर्ण होऊ न शकणारी संख्या या पार्श्वभूमीवर इतर देशांच्या तुलनेत आपल्यासमोरील आव्हान अधिक मोठे आहे.यावर उपाय काय?- आता आपण पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे सेंद्रीय शेतीचे चांगले मॉडेल आपण उभे करायला हवे. भारताने अलिकडेच २७ कीटकनाशकावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. निसर्गाचा ºहास थांबविण्यासाठी असे निर्णय आपल्याला भविष्यात घ्यावे लागतील. सरकारच्या अशा भूमिकेला लोकांनीदेखील सहकार्य केले पाहिजे. जागतिक पातळीवर आपण पर्यटन उभे करू शकू का, याबाबतही विचार व्हायला हवा. हे सर्व करीत असताना संरक्षित क्षेत्र संरक्षित कसे राखले जातील, याचाही विचार करायला हवा. शेवटी मानव-वन्यजीव संघर्ष हा कोणालाच परवडणारा नाही. केवळ संवर्धन करुन भागणार नाही, तर वाढलेल्या जैवविविधतेला कसे सांभाळणार याचेही नियोजन व्हायला हवे.

विकास महत्त्वाचा की निसर्ग?- आता जंगलाच्या बाहेर खनिजे शिल्लक राहिलेच नाहीत. जगभरात हीच स्थिती आहे. म्हणून आम्ही आता जंगलातले खनिज ओरबाडण्याच्या मागे आहोत. आणि हे होणे अटळ आहे. हे फक्त खनिजाब्द्दल होत आहे, असे नाही. आम्ही विकासासाठी जे काही करीत आहोत, त्यामुळे निसर्गाचे नुकसान होणारच आहे. फक्त हे नुकसान कमीत कमी कसे करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे.माणसाचे पोट की पर्यावरण?शिक्षण पूर्ण होऊन रोजगाराच्या मागे असलेल्या माणसाला निसर्गाचे हे गणित सांगून उपयोग नाही. त्याची प्राथमिकता वेगळी आहे. त्याला स्वत:चे, कुटुंबाचे पोट भरायचे आहे. हे झाल्यानंतर विकासदेखील साधायचा आहे. त्याच्या या गरजा आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे पहिल्या वर्गापासूनच म्हणजे लहानपणापासूनच निसर्ग संवर्धनाचे बीज आम्ही कसे पेरू यावरच आपला भविष्यकाळ अवलंबून राहणार आहे. निसर्गाभिमुख जीवनशैली हे शालेय शिक्षणापासून मनावर बिंबविण्याची गरज आहे.बीएनएचएसमधील आपल्या प्रवासाबद्दल काय सांगाल?- जानेवारी १९९४मध्ये मी बीएनएचएस जॉईन केली. मरीन म्हणजे समुद्री जीव हा माझा अभ्यास. हे क्षेत्र तसे दूर्लक्षितच होते. मात्र सध्या बीएनएचएसचे देशात रत्नागिरीपासून तामीळनाडूपर्यंत समुद्री जीवावर अनेक प्रकल्प सुरु आहेत. गेल्या पाच वर्षांत संस्थेने संशोधनासोबतच बर्ड रिंगींग, पक्ष्यांचे स्थलांतर यावर मोठे काम केले. वेगवेगळ्या संवर्धन प्रकल्पांसाठी १०० कोटींचा निधी उभा केला. संशोधन डिजीटलायझेजशन सुरू केले. म्हणजे सर्वसामान्यांनाही पुढील पाच वर्षांत बीएनएचएसच्या वेबसाईटवर हे सर्व संशोधन पाहणे शक्य होणार आहे. हिमालय क्लायमेट चेंज, मरीन प्रोग्राम, आदी महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले. केंद्रसरकारच्या नॅशनल प्लान फॉर कंझर्वेशन आॅफ मायग्रेटरी बर्ड निर्मीतीमध्ये मोठा सहभाग राहिला. ग्रीन मुनीयासह असुरक्षित झालेल्या तीन प्रजातींच्या संवर्धनाचा प्रकल्प सुरु केला. लक्षद्वीपमध्ये याचवर्षी ६८५चौरस कि.मी. परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. २००४पासून त्या परिसरात केलेल्या कामाची ही पावती आहे. बीएनएचएसकडे असलेल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रजातींचे कलेक्शन आता फायरप्रुफ केबिनमध्ये ठेवण्यात आले आहे. संवर्धनामध्ये राष्टÑीय पातळीवर गेल्या पाच वर्षांत कॉरिडोरमधून जाणारे रस्ते, खाणी आदी विषय हाताळले. विकास केला जावा. पण तो करीत असताना निसर्ग संवर्धनाचे शास्त्र विचारात घ्यायला हवे. हे शास्त्र सरकारला समजून सांगण्याचा प्रयत्न केला.आता पुढे काय?- १३७ वर्षांचा इतिहास असलेल्या संस्थेचे संचालकपद पाच वर्षे सांभाळले. संशोधन, संवर्धन, एज्यूकेशन आणि प्रशासन या सर्वपातळीवर काम केले. यात प्रत्येक कर्मचाºयाचा खारीचा वाटा आहे. केलेल्या कामाचे समाधानही आहे. आता कुटूंब आणि आवडीच्या समुद्री जीवावर आणखी संशोधन करण्यासाठी वेळ मिळणार आहे. त्याचाही आनंद आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण