शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

सरकार फी भरत असूनही मुंबईत अजूनही ‘आरटीई’च्या दोन हजार जागा रिकाम्याच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 07:36 IST

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील शाळा सुरू होऊन जवळपास चार महिनेही उलटून गेले आहेत. तरीही अजूनही ‘आरटीई’अंतर्गत प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यात दुर्दैवाची बाब म्हणजे, मुंबईत केवळ ४ हजार ४९२ प्रवेश झाले असून अजूनही दोन हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. सध्या चौथ्या प्रतीक्षा यादीनुसार ही प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.  परिणामी, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.

प्रवेश निश्चितीतील दिरंगाई, कागदपत्रांमुळे येणाऱ्या अडचणी, शासनाचे थकीत अनुदान, खासगी शाळांची कठोर नियमावली यामुळे ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशप्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही प्रवेशाची गती संथच असल्याचे दिसून येत आहे. राज्यासह मुंबई विभागातही अद्यापही जागा रिक्त आहे. राज्यातील रिक्त जागांची संख्या सुमारे १९ हजार ३९० आहे. 

शहर उपनगरात आरटीई शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी निवड झालेल्या शाळांमध्ये धाव घेत, प्रवेश निश्चित करण्यात आले आहे; मात्र गेल्या पाच वर्षांपासून आरटीईच्या अंतर्गत खासगी शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले त्याचे अनुदान अद्यापही खासगी शाळांना न मिळाल्याने शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत शाळा प्रवेश मिळूनही शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढवण्याची शक्यता आहे.

मुंबईसारखीच राज्यातही स्थितीराज्यात आरटीईअंतर्गत आतापर्यंत ८२ हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर १९ हजार ३९० जागा रिक्त आहे. आरटीईअंतर्गत एकूण ८ हजार ८२४ शाळांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खासगी शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४७ जागांसाठी लॅटरी काढण्यात येत आहे.

शासनाकडून थकले अनुदानसमाजातील आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांना उच्च दर्जाच्या शाळेत प्रवेश मिळावा, त्याला दर्जेदार शिक्षण घेता यावे, यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येत आहे. राज्य शासनाकडून आरटीईअंतर्गत प्रवेश देणाऱ्या विनाअनुदानित खासगी शाळांना अनुदान देण्यात येते; मात्र गेल्या चार वर्षांपासून आरटीईचे अनुदान रखडल्याने अनेक शाळा आर्थिक विवंचनेत सापडल्या आहेत. त्यातील काही शाळांनी आरटीईअंतर्गत प्रवेशही रोखले आहेत.

...म्हणून शाळा करताहेत अडवणूकआरटीईमध्ये निवड झालेल्या बालकांना यावर्षी नाइलाजास्तव प्रवेश देण्यात येणार नाही. संबंधित पालकांनी प्रवेशासंदर्भात शाळेकडे कुठलीही विचारपूस न करता शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, अथवा पूर्ण शुल्क भरून प्रवेश घ्यावा, अशा आशयाचे फलक काही खासगी शाळांनी आवारात लावल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा