शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

Budget 2021: अर्थसंकल्पातून हवाय तरूणांना दिलासा; पैसे उकळण्याचा धंदा नियंत्रणात आणला पाहिजे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:28 AM

शिक्षणाविषयी प्रचंड जागृती निर्माण झाली असताना पैशाअभावी लोक मुलाला शिकवू शकत नाहीत.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला जातो. विविध क्षेत्रासाठी निधीची तरतूद केली जाते, मात्र हि तरतूद सर्व सामान्यांपर्यंत पोहोचते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर शिक्षण तर दुसरीकडे उच्चशिक्षण घेऊनही बेकार होण्याची वेळ आल्याने अर्थसंकल्पात दिलासा मिळावा अशी अपेक्षा तरूणांकडून व्यक्त केली जात आहे.

अर्थसंकल्पात सामान्य माणसाला नेमका काय दिलासा मिळतो. ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. महाग होत असलेले शिक्षण तर दुसरीकडे उच्चशिक्षण घेऊनही बेकार होण्याची आलेली वेळ याकडे सरकारने गंभीरपणे पाहायला हवे. बाल आणि महिला कल्याण युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठोस अशा योजनेची आवश्यकता आहे.- संतोष यमगर

शिक्षणाविषयी प्रचंड जागृती निर्माण झाली असताना पैशाअभावी लोक मुलाला शिकवू शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय शाळांचे नवे फॅड देशभर बोकाळले आहे. तेथे लाख-लाख रुपयाची फी वसूल केली जात असते. तर महाविद्यालय स्तरावर कितीही गुणवंत विद्यार्थी असला तरी डॉक्टर होण्याकरिता त्याला किमान पाच ते दहा लाख रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे. - अंकुश म्हात्रे.

शिक्षणाचा राजरोस चाललेला पैसे उकळण्याचा धंदा नियंत्रणात आणला पाहिजे. यातून अतिशय गरीब किंवा सामान्य वर्गातील लोकांना मुलांना शिक्षण देणे सुलभ होऊ शकेल. सरकारने आयुष्यमान नावाची वैद्यकीय खर्च उचलणारी योजना जाहीर केली. परंतु ती सामान्य माणसापर्यंत अजूनही पोहचलेली नाही. - मंगला गजने.

इच्छा असूनही मनासारखे शिक्षण घेता येत नाही. शिक्षण घेऊनही योग्य ते रोजगार मिळत नाही आणि रोजगार मिळाला तरी स्वतःचे आरोग्य टिकवण्याकरिता योग्य ती व्यवस्था उपलब्ध नाही. असे हे विचित्र चक्रव्यूह असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या पायाभूत सुविधांचा विचार व्हावा. - रिया पड्यार.

केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला त्यातही शिक्षण, आरोग्य, यासारख्या क्षेत्राला दिलासा देणाऱ्या योजनांना पाठबळ मिळावे लागेल. अर्थसंकल्पाचा नुसताच गाजावाजा होत असतो. परंतु प्रत्यक्षात अर्थसंकल्पातला हा पैसा सामान्य माणसापर्यंत धडपणाने पोहचत नाही ही आज वस्तुस्थिती आहे - कैलास गजने.

टॅग्स :Educationशिक्षणbudget 2021बजेट 2021jobनोकरी