शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनाची भेट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 03:16 IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी राजधानी दिल्लीत जशी महिला लोकप्रतिनिधींची एक परिषद आयोजित केली होती

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी राजधानी दिल्लीत जशी महिला लोकप्रतिनिधींची एक परिषद आयोजित केली होती त्याचप्रमाणे खुद्द लोकसभेत महिलांसंबंधी विषयांवर चर्चा करण्यासाठी महिला सभासदांना विशेष अनुमती दिली होती. त्याचा लाभ उठविताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संसद आणि विधिमंडळातील महिला आरक्षणाचा विषय आग्रहाने मांडला आणि संसदसमोर प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक तत्काळ मंजूर करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीने सदर विषयास पुन्हा एकदा चालना मिळाली तर आता हे विधेयक मंजूर होण्यात काही अडचण येणार नाही अशी संसदेच्या उभय सभागृहांमधील स्थिती आहे. संपुआच्या काळात त्या आघाडीत समाविष्ट असलेल्या वा आघाडीला बाहेरुन पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आदिंचा अशा आरक्षणास विरोध असल्याने आणि त्यांच्या संख्याबळावर मात करण्याची ताकद आरक्षण अनुकूल पक्षांमध्ये नसल्याने हे विधेयक मंजूर होत नव्हते. देशातील काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष प्रथमपासून महिला आरक्षणास अनुकूल असल्याचे किमान त्यांनी वारंवार बोलून तरी दाखविले आहे. या दोहोंचीदेखील महिला आरक्षणास मनापासून अनुकूलता नाही पण तसे मान्य न करता ते विरोध करणाऱ्या पक्षांच्या आड लपत आहेत अशी टीकादेखील या संदर्भात केली गेली आहे. पण संसदेचे आजचे चित्र लक्षात घेता लोकसभेत भाजपाकडे तर राज्यसभेत काँग्रेसकडे भक्कम बहुमत असल्याने व दोन्ही पक्ष मनापासून महिलांच्या उद्धाराची आस लावून बसलेले असले तर आता हे विधेयक मंजूर होण्यात काही अडचण येण्याचे कारण नाही. श्रीमती सोनिया गांधी हा विषय लावून धरण्यामागे एक भावनिक कारणदेखील आहे. देशातील सर्व स्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण बहाल करण्याचा निर्णय त्यांचे पती राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असतानाच घटना दुरुस्तीद्वारा अंमलात आणला गेला होता. संसद आणि विधिमंडळातील महिला आरक्षणाचा मुद्दा लावून धरताना सोनिया गांधी यांनी हरयाणा आणि राजस्थान सरकारांनी याच विषयाच्या अनुरोधाने अलीकडे घेतलेल्या निर्णयावर जी टीका केली ती मात्र पचविली जाणे अवघड आहे. पंचायत स्तरावरील निवडणुकांमध्ये उमेदवारी करण्यासाठी उभय राज्यांनी किमान शैक्षणिक पात्रतेची अट लागू केली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जड वाहतुकीच्या परवान्यासाठी अशीच किमान शैक्षणिक पात्रतेची अट लागू करण्याचा प्रयत्न केला असता तो संघटन शक्तीच्या जोरावर हाणून पाडला गेला होता. किमान शैक्षणिक पात्रतेस विरोध करणे याचा अर्थ किमान शिक्षणाचा प्रसार करण्यात सरकारला आलेले अपयशच समजले गेले पाहिजे आणि ती बाब निश्चितच कोणत्याही सरकारच्या दृष्टीने भूषणावह ठरणारी नाही.