शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

थेंबा थेंबाचा हिशेब हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:20 IST

उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयात आधीच निम्मा जलसाठा आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयात आधीच निम्मा जलसाठा आहे. नियमित पाणी मिळाले तरी मे महिन्यात टंचाई ओढवणार आहे. पण महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने या पेंचच्या पाण्याला कट लावण्याची भूमिका घेतली आहे. तसे झाले तर ऐन उन्हाळ्यात ‘स्मार्ट’ नागपूरकरांचा घसा कोरडा होण्याची शक्यता आहे. या संकटाला अपुरा जलसाठा हे एक कारण असलं तरी शहरात होणारी पाण्याची गळती व चोरी हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. शहराला पुरवठा होण्याच्या पाण्यापैकी जेमतेम ५० टक्केच पाण्याचे बिलिंग होते. एवढी मोठी गळती ही बाब पटण्यासारखी नक्कीच नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली ‘पालका’ची भूमिका बजावत या तुटीसाठी आधीच महापालिकेला सतर्क केले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महापालिकेला खडसावून विचारावे लागले की, ५० टक्के पाणी मुरते कुठे ? पण महापालिकेच्या एकाही अधिकारी, पदाधिकाºयाकडे याचं उत्तर नाही. किंबहुना असेलही पण ते उघडपणे सांगणे त्यांना परवडणारे नाही. कारण, गळतीची वास्तविकता सर्वांनाच माहिती आहे. सामान्य माणसाकडे एक महिन्याचे पाणी बिल थकीत असले की पाणीपुरवठा विभाग लगेच त्याचे कनेक्शन कापण्याची नोटीस देतो. थकबाकी वाढली की मालमत्ता सील करण्याचा इशारा देतो. जो प्रामाणिकपणे पाणी घेतो, बिल भरतो त्याच्यासाठीच सर्व कानून-कायदे. मात्र, तब्बल ५० टक्के पाण्याचा हिशेबच लागत नाही, यावर विचार करायला, याचा शोध घ्यायला कुणालाच वेळ नाही. शहरातील कारखाने, मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, उपाहारगृहांमध्ये सर्रासपणे पाणी चोरी सुरू आहे. या चोरीची माहिती महापालिकेच्या अधिकाºयांनाही निश्चितच आहे. पण त्यांच्या खिशात नोटा मुरत असल्याने त्यांना या गळतीचे काहीच सोयरसुतक नाही. उघड लूट सुरू आहे. महावितरण मोठमोठ्या प्रतिष्ठानांमध्ये छापे टाकून वीज कनेक्शनची, मीटरची तपासणी करते. मात्र, इकडे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असतानाही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अशी तपासणी मोहीम हाती का घेत नाही, असा प्रश्न कायम आहे. पुरवठा होणाºया शंभर टक्के पाण्याचे बिलिंग शक्य नाही. पण ९० टक्क्यांपर्यंतही झाले तर जलप्रदाय विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल. वाचविलेल्या थेंबा थेंबाने महापालिकेची रिकामी तिजोरी भरण्यास मदत होईल. एवढेच नव्हे तर दरवाढीचा मारा सहन करणाºया सामान्य नागपूरकरांच्या पाणी बिलात कपात होऊन त्यांनाही ओलावा अनुभवता येईल. पण त्यासाठी कठोर इच्छाशक्तीने ‘चोरांना’ पाणी पाजण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणी