शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

थेंबा थेंबाचा हिशेब हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:20 IST

उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयात आधीच निम्मा जलसाठा आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयात आधीच निम्मा जलसाठा आहे. नियमित पाणी मिळाले तरी मे महिन्यात टंचाई ओढवणार आहे. पण महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने या पेंचच्या पाण्याला कट लावण्याची भूमिका घेतली आहे. तसे झाले तर ऐन उन्हाळ्यात ‘स्मार्ट’ नागपूरकरांचा घसा कोरडा होण्याची शक्यता आहे. या संकटाला अपुरा जलसाठा हे एक कारण असलं तरी शहरात होणारी पाण्याची गळती व चोरी हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. शहराला पुरवठा होण्याच्या पाण्यापैकी जेमतेम ५० टक्केच पाण्याचे बिलिंग होते. एवढी मोठी गळती ही बाब पटण्यासारखी नक्कीच नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली ‘पालका’ची भूमिका बजावत या तुटीसाठी आधीच महापालिकेला सतर्क केले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महापालिकेला खडसावून विचारावे लागले की, ५० टक्के पाणी मुरते कुठे ? पण महापालिकेच्या एकाही अधिकारी, पदाधिकाºयाकडे याचं उत्तर नाही. किंबहुना असेलही पण ते उघडपणे सांगणे त्यांना परवडणारे नाही. कारण, गळतीची वास्तविकता सर्वांनाच माहिती आहे. सामान्य माणसाकडे एक महिन्याचे पाणी बिल थकीत असले की पाणीपुरवठा विभाग लगेच त्याचे कनेक्शन कापण्याची नोटीस देतो. थकबाकी वाढली की मालमत्ता सील करण्याचा इशारा देतो. जो प्रामाणिकपणे पाणी घेतो, बिल भरतो त्याच्यासाठीच सर्व कानून-कायदे. मात्र, तब्बल ५० टक्के पाण्याचा हिशेबच लागत नाही, यावर विचार करायला, याचा शोध घ्यायला कुणालाच वेळ नाही. शहरातील कारखाने, मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, उपाहारगृहांमध्ये सर्रासपणे पाणी चोरी सुरू आहे. या चोरीची माहिती महापालिकेच्या अधिकाºयांनाही निश्चितच आहे. पण त्यांच्या खिशात नोटा मुरत असल्याने त्यांना या गळतीचे काहीच सोयरसुतक नाही. उघड लूट सुरू आहे. महावितरण मोठमोठ्या प्रतिष्ठानांमध्ये छापे टाकून वीज कनेक्शनची, मीटरची तपासणी करते. मात्र, इकडे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असतानाही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अशी तपासणी मोहीम हाती का घेत नाही, असा प्रश्न कायम आहे. पुरवठा होणाºया शंभर टक्के पाण्याचे बिलिंग शक्य नाही. पण ९० टक्क्यांपर्यंतही झाले तर जलप्रदाय विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल. वाचविलेल्या थेंबा थेंबाने महापालिकेची रिकामी तिजोरी भरण्यास मदत होईल. एवढेच नव्हे तर दरवाढीचा मारा सहन करणाºया सामान्य नागपूरकरांच्या पाणी बिलात कपात होऊन त्यांनाही ओलावा अनुभवता येईल. पण त्यासाठी कठोर इच्छाशक्तीने ‘चोरांना’ पाणी पाजण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणी