शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

थेंबा थेंबाचा हिशेब हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:20 IST

उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयात आधीच निम्मा जलसाठा आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयात आधीच निम्मा जलसाठा आहे. नियमित पाणी मिळाले तरी मे महिन्यात टंचाई ओढवणार आहे. पण महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने या पेंचच्या पाण्याला कट लावण्याची भूमिका घेतली आहे. तसे झाले तर ऐन उन्हाळ्यात ‘स्मार्ट’ नागपूरकरांचा घसा कोरडा होण्याची शक्यता आहे. या संकटाला अपुरा जलसाठा हे एक कारण असलं तरी शहरात होणारी पाण्याची गळती व चोरी हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. शहराला पुरवठा होण्याच्या पाण्यापैकी जेमतेम ५० टक्केच पाण्याचे बिलिंग होते. एवढी मोठी गळती ही बाब पटण्यासारखी नक्कीच नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली ‘पालका’ची भूमिका बजावत या तुटीसाठी आधीच महापालिकेला सतर्क केले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महापालिकेला खडसावून विचारावे लागले की, ५० टक्के पाणी मुरते कुठे ? पण महापालिकेच्या एकाही अधिकारी, पदाधिकाºयाकडे याचं उत्तर नाही. किंबहुना असेलही पण ते उघडपणे सांगणे त्यांना परवडणारे नाही. कारण, गळतीची वास्तविकता सर्वांनाच माहिती आहे. सामान्य माणसाकडे एक महिन्याचे पाणी बिल थकीत असले की पाणीपुरवठा विभाग लगेच त्याचे कनेक्शन कापण्याची नोटीस देतो. थकबाकी वाढली की मालमत्ता सील करण्याचा इशारा देतो. जो प्रामाणिकपणे पाणी घेतो, बिल भरतो त्याच्यासाठीच सर्व कानून-कायदे. मात्र, तब्बल ५० टक्के पाण्याचा हिशेबच लागत नाही, यावर विचार करायला, याचा शोध घ्यायला कुणालाच वेळ नाही. शहरातील कारखाने, मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, उपाहारगृहांमध्ये सर्रासपणे पाणी चोरी सुरू आहे. या चोरीची माहिती महापालिकेच्या अधिकाºयांनाही निश्चितच आहे. पण त्यांच्या खिशात नोटा मुरत असल्याने त्यांना या गळतीचे काहीच सोयरसुतक नाही. उघड लूट सुरू आहे. महावितरण मोठमोठ्या प्रतिष्ठानांमध्ये छापे टाकून वीज कनेक्शनची, मीटरची तपासणी करते. मात्र, इकडे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असतानाही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अशी तपासणी मोहीम हाती का घेत नाही, असा प्रश्न कायम आहे. पुरवठा होणाºया शंभर टक्के पाण्याचे बिलिंग शक्य नाही. पण ९० टक्क्यांपर्यंतही झाले तर जलप्रदाय विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल. वाचविलेल्या थेंबा थेंबाने महापालिकेची रिकामी तिजोरी भरण्यास मदत होईल. एवढेच नव्हे तर दरवाढीचा मारा सहन करणाºया सामान्य नागपूरकरांच्या पाणी बिलात कपात होऊन त्यांनाही ओलावा अनुभवता येईल. पण त्यासाठी कठोर इच्छाशक्तीने ‘चोरांना’ पाणी पाजण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणी