शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

संजय राऊत ‘सुटले’ का नाहीत? खरेच ते बदलले आहेत की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 08:08 IST

चांगला सेनापती योग्य संधीची वाट पाहतो आणि ती मिळताच तुटून पडतो, असे मानसिकदृष्ट्या खंबीर माणसांची एक सवय सांगितली जाते.

चांगला सेनापती योग्य संधीची वाट पाहतो आणि ती मिळताच तुटून पडतो, असे मानसिकदृष्ट्या खंबीर माणसांची एक सवय सांगितली जाते. ‘झुकेगा नही साला’ म्हणत दोन्ही हातांच्या आवळलेल्या मुठी आकाशात उंचावत ईडी कोठडी व तुरूंगात गेलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत जामिनावर सुटल्यानंतर तशी योग्य संधीची वाट बघताहेत की एकशे तीन दिवस चार भिंतीच्या आत आत्मचिंतनानंतर त्यांना वेळेचे अधिक भान आले आहे?

पीएमएलए कोर्टाने जामीन दिल्यानंतर बुधवारी रात्री घरी परत येताना संजय राऊत पूर्वीच्याच आक्रमक शैलीत दिसले. जाताना ज्या आवेशात गेले त्याच आक्रमकपणे घरी आले. गुरुवारी सकाळी ते पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजल्यावर अनेकांना तीन वर्षांपूर्वीच्या त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदा आठवल्या. तीन महिने तुरूंगात साचलेला संताप ते आक्रमकपणे बाहेर काढतील, राऊत आता ‘सुटणार’, असा अंदाज होता; परंतु त्यांनी गुगली टाकली.

एकदम विरक्ती आल्यासारखे म्हणाले, आपल्याला राजकीय सूडबुद्धीने अटक झाली खरे; पण मनात कोणाबद्दल किल्मिष नाही. आपण पंतप्रधान मोदींना, गृहमंत्री अमित शहा यांना, इतकेच काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत, अशी स्तुतीही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख एक वर्षांपासून तर नवाब मलिक आठ महिन्यांपासून तुरूंगात आहेत. जामीन मिळावा म्हणून धडपडत आहेत. या पृष्ठभूमीवर, संजय व प्रवीण राऊत यांना जामीन देणारा विशेष पीएमएलए न्यायालयाचा १२२ पानांचा आदेश म्हणजे राऊतांच्या भात्यातले १२२ बाण म्हणायला हवेत.

मुंबईच्या गोरेगावातील पत्राचाळ प्रकरणाला अनेक पदर आहेत. राकेश कुमार व सारंग वाधवान या पिता- पुत्रांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनी, एचडीआयएल ही तिची होल्डिंग कंपनी, म्हाडाचे गेल्या बारा- पंधरा वर्षांतील उलटसुलट आदेश, म्हाडाविरुद्ध जीएसीपीएल असे उच्च व सर्वोच्च न्यायालयातील कोर्टकज्जे, पीएमसी बँक घोटाळ्यात होल्डिंग कंपनीने बुडविलेले सहा हजार कोटींहून अधिक कर्ज, त्यातील प्रवीण राऊत यांना मिळालेली रक्कम, आधी प्रवीण राऊत व नंतर संजय राऊत यांना अटक केल्यानंतरचा चित्रविचित्र दाव्यांचा गुंता आणि हळूहळू त्यात स्वत:च अडकत गेलेली ईडी, राऊत तुरूंगात असताना सोळा वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बैठकीचा कथित गौप्यस्फोट, त्या दाव्यातील सगळा फोलपणा, अशा चित्रपटाच्या पटकथेसारख्या नाट्यमय घटनाक्रमाचा न्यायालयाने पर्दाफाश केला आहे.

मुळात प्रवीण राऊत यांची अटकच ईडीची मनमानी आणि संजय राऊत यांची अटक तर विनाकारण, बेकायदेशीर असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. कुठल्याही अधिकाराच्या पदावर नसलेल्या एकाच व्यक्तीच्या निराधार बयाणावर विसंबून पवार व देशमुख यांची नावे घुसडण्याचा प्रकार म्हणजे, पुढचा नंबर तुमचा असल्याचा इशारा देणारा असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, संजय राऊत जामिनानंतर अधिक आक्रमक होतील, असा कयास होता. राज ठाकरे यांच्या टीकेला दिलेले उत्तर वगळता संजय राऊत एकदम बदलल्याचे दिसले. खरेच ते बदलले आहेत की यामागेही त्यांचे काही डावपेच आहेत, हे कळायला मार्ग नाही. मुळात राऊत यांचा स्वभाव असा नाही. अंगावर आलेल्याला शिंगावर घेणारे म्हणूनच ते ओळखले जातात.

कदाचित ईडीने जामिनाला स्थगिती मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या सुनावणीआधी काही उलटसुलट आक्रमक बोलून नवे संकट कशाला ओढवून घ्यायचे, असे म्हणून देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न किंवा जामीन देताना न्यायालयाने इतका सगळा फायदा पदरात टाकला आहेच तर कशाला घाई करा, असा विचार त्यांनी केलेला असू शकतो. हेदेखील खरे आहे, की राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर नाही. गृहखाते फडणवीसांसारख्या खमक्या नेत्याच्या हातात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची बाळासाहेबांची शिवसेना हा शिवसेना (उबाठा) पक्षाचा शत्रू क्रमांक एक आहे. तेव्हा, एकावेळी शत्रूत्वाच्या अधिक आघाड्या कशाला उघडायच्या. शिंदेंवर तुटून पडताना भाजपला गोंजारायचे, अशीही खेळी असू शकते. नेमके काय हे कळेपर्यंत लोक अंदाज बांधत राहतील हे नक्की.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत