शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नफेखोर पीक विमा कंपन्यांच्या खिशात कधी हात घालणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:04 IST

र्वप्रथम पीक विमा घ्यायचा म्हटला तर कंपनी निवडण्याचा कोणताही मूलभूत अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही.

शिवाजी पवार - उपसंपादक, लोकमत अहमदनगर

राज्यात ऐन काढणीला आलेली खरिपातील पिके अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहेत. संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शेतकरी मदतीसाठी सरकारकडे आस लावून बसलेला आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. पीक विम्यातून काहीतरी भरपाई मिळेल ही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र ती कितपत सत्यात उतरेल याबद्दल शंका आहे. कारण पूर्वानुभव! पंतप्रधान पीक विमा योजना यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. शेतातील पिकांना अवकाळी पाऊस, गारपीट, पूर तसेच इतर नैैसर्गिक आपत्तीतून काही नुकसानभरपाई मिळावी म्हणून आणली गेलेली ही योजना. मात्र योजना कंपन्यांसाठी राबवली जाते की शेतकऱ्यांसाठी, हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. विम्याचा हप्ता भरण्यापासून तर नुकसानीपोटी विम्याचे पैैसे पदरात मिळेपर्यंत शेतकऱ्याला मोठी वणवण करावी लागते.

सर्वप्रथम पीक विमा घ्यायचा म्हटला तर कंपनी निवडण्याचा कोणताही मूलभूत अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. जीवन विमा, वाहनाचा विमा, संपत्तीचा विमा यांत कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना असते. पीक विम्यात मात्र शेतकऱ्याला ग्राहक म्हणून कंपनी निवडण्याचे अधिकार नाहीत. कृषी विभाग प्रत्येक जिल्ह्याकरिता एका कंपनीची नियुक्ती करतो. कंपनी मिळाली म्हणजे प्रश्न सुटला असे नाही. तर येथूनच शेतकऱ्याचा काट्याकुट्याचा प्रवास सुरू होतो. जोखीम स्तराच्या ३३ टक्के रकमेएवढा विम्याचा हप्ता असतो. त्याकरिता खरीप, रब्बी आणि नगदी पिकांसाठी या हप्त्याचा अनुक्रमे दोन, दीड व पाच टक्के भार शेतकऱ्यांना भरावा लागतो. उर्वरित हप्त्याचा भार राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास टक्के उचलते. नैसर्गिक आपत्ती तर शेतकऱ्याच्या पाचवीला पूजलेलीच असते. मात्र पिकाचे नुकसान कोणत्या टप्प्यावर झाले यावरच नुकसानभरपाईची रक्कम ठरते. पीक काढणीला आले होते की फुलोऱ्यात?- हे महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा पंचनामे करून तपासते. नुकसानीचे मोजमाप हे मंडलनिहाय होते. म्हणजेच एखाद्या गावामध्ये अतिवृष्टी झाली तरी शेतकऱ्यांना विमा मिळेल याची खात्री नाही. कारण ते गाव ज्या महसुली मंडलात येते, त्या मंडलाची एकूण पावसाची सरासरी त्यासाठी गृहीत धरण्यात येते. येथेच खरी मेख आहे. संपूर्ण हंगाम उलटला तरी पीक विमा कंपनी ही जिल्हा, तालुका आणि मंडल स्तरावर कोठेही कार्यालय थाटत नाही. कंपनीने कोण प्रतिनिधी नेमले आहेत, याची शेवटपर्यंत उकल होत नाही. कार्यालय नाही म्हणजे फोनही नाही. मग झालेल्या नुकसानीसाठी संपर्क साधायचा कोठे आणि दाद मागायची कोठे, असा पेच निर्माण होतो.पी. साईनाथ यांनी पीक विमा योजना हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात परभणी जिल्ह्याची आकडेवारी मांडली. सन २०१७ मध्ये तेथे अडीच लाख शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन वाया गेले. त्यांना विमा कंपनीने नुकसानीचे ३० कोटी रुपये मंजूर केले. मात्र त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकारने मिळून विमा हप्त्याचे १७३ कोटी रुपये कंपनीकडे भरले होते. त्यामुळे कंपनीने एकाच जिल्ह्यात एका पिकातून १४३ कोटी रुपये कमाविल्याचे पी. साईनाथ सांगतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील युती सरकारमध्ये पीक विमा योजनेवर हल्लाबोल चढवला होता. निवडणुकीपूर्वी शिवसेनेची जनआशीर्वाद आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेत पीक विमा गाजला. आताही अतिवृष्टीने महाराष्ट्र झोडपला आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सर्वच नेते नुकसानीचा आढावा घेत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या पीक विम्याच्या प्रश्नाने राज्यभर प्रचाराचा फुफाटा उडवला तो विषय आता चर्चेतही नाही. सरकार पीक विम्याला शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकाराचा दर्जा देणार का? मंडलांऐवजी शेतकरीनिहाय नुकसानीचे पंचनामे करणार का? विमा कंपनी निवडण्याचा अधिकार शेतकऱ्यांना कधी मिळेल? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. अतिशय तुटपुंज्या रकमेत येणारे पर्जन्यमापक यंत्रदेखील प्रत्येक गावात बसविले जाऊ नये यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतो तर दुसरे कोरडे राहते अशी परिस्थिती आहे. गाव आणि मंडलांच्या सीमारेषा पाहून पाऊस पडत नाही. तरीही एका मंडलामध्ये दोन तीन गावे मिळून पाऊस मोजला जातो. किमान पक्षी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयांना जरी आदेश दिले तरीही मापके बसविणे सहजसाध्य होईल. त्यातून नैैसर्गिक आपत्तीचे खरेखुरे चित्र मुंबईत बसणाऱ्या यंत्रणेला मिळेल. 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा