शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

नफेखोर पीक विमा कंपन्यांच्या खिशात कधी हात घालणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:04 IST

र्वप्रथम पीक विमा घ्यायचा म्हटला तर कंपनी निवडण्याचा कोणताही मूलभूत अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही.

शिवाजी पवार - उपसंपादक, लोकमत अहमदनगर

राज्यात ऐन काढणीला आलेली खरिपातील पिके अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहेत. संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शेतकरी मदतीसाठी सरकारकडे आस लावून बसलेला आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. पीक विम्यातून काहीतरी भरपाई मिळेल ही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र ती कितपत सत्यात उतरेल याबद्दल शंका आहे. कारण पूर्वानुभव! पंतप्रधान पीक विमा योजना यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. शेतातील पिकांना अवकाळी पाऊस, गारपीट, पूर तसेच इतर नैैसर्गिक आपत्तीतून काही नुकसानभरपाई मिळावी म्हणून आणली गेलेली ही योजना. मात्र योजना कंपन्यांसाठी राबवली जाते की शेतकऱ्यांसाठी, हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. विम्याचा हप्ता भरण्यापासून तर नुकसानीपोटी विम्याचे पैैसे पदरात मिळेपर्यंत शेतकऱ्याला मोठी वणवण करावी लागते.

सर्वप्रथम पीक विमा घ्यायचा म्हटला तर कंपनी निवडण्याचा कोणताही मूलभूत अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. जीवन विमा, वाहनाचा विमा, संपत्तीचा विमा यांत कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना असते. पीक विम्यात मात्र शेतकऱ्याला ग्राहक म्हणून कंपनी निवडण्याचे अधिकार नाहीत. कृषी विभाग प्रत्येक जिल्ह्याकरिता एका कंपनीची नियुक्ती करतो. कंपनी मिळाली म्हणजे प्रश्न सुटला असे नाही. तर येथूनच शेतकऱ्याचा काट्याकुट्याचा प्रवास सुरू होतो. जोखीम स्तराच्या ३३ टक्के रकमेएवढा विम्याचा हप्ता असतो. त्याकरिता खरीप, रब्बी आणि नगदी पिकांसाठी या हप्त्याचा अनुक्रमे दोन, दीड व पाच टक्के भार शेतकऱ्यांना भरावा लागतो. उर्वरित हप्त्याचा भार राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास टक्के उचलते. नैसर्गिक आपत्ती तर शेतकऱ्याच्या पाचवीला पूजलेलीच असते. मात्र पिकाचे नुकसान कोणत्या टप्प्यावर झाले यावरच नुकसानभरपाईची रक्कम ठरते. पीक काढणीला आले होते की फुलोऱ्यात?- हे महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा पंचनामे करून तपासते. नुकसानीचे मोजमाप हे मंडलनिहाय होते. म्हणजेच एखाद्या गावामध्ये अतिवृष्टी झाली तरी शेतकऱ्यांना विमा मिळेल याची खात्री नाही. कारण ते गाव ज्या महसुली मंडलात येते, त्या मंडलाची एकूण पावसाची सरासरी त्यासाठी गृहीत धरण्यात येते. येथेच खरी मेख आहे. संपूर्ण हंगाम उलटला तरी पीक विमा कंपनी ही जिल्हा, तालुका आणि मंडल स्तरावर कोठेही कार्यालय थाटत नाही. कंपनीने कोण प्रतिनिधी नेमले आहेत, याची शेवटपर्यंत उकल होत नाही. कार्यालय नाही म्हणजे फोनही नाही. मग झालेल्या नुकसानीसाठी संपर्क साधायचा कोठे आणि दाद मागायची कोठे, असा पेच निर्माण होतो.पी. साईनाथ यांनी पीक विमा योजना हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात परभणी जिल्ह्याची आकडेवारी मांडली. सन २०१७ मध्ये तेथे अडीच लाख शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन वाया गेले. त्यांना विमा कंपनीने नुकसानीचे ३० कोटी रुपये मंजूर केले. मात्र त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकारने मिळून विमा हप्त्याचे १७३ कोटी रुपये कंपनीकडे भरले होते. त्यामुळे कंपनीने एकाच जिल्ह्यात एका पिकातून १४३ कोटी रुपये कमाविल्याचे पी. साईनाथ सांगतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील युती सरकारमध्ये पीक विमा योजनेवर हल्लाबोल चढवला होता. निवडणुकीपूर्वी शिवसेनेची जनआशीर्वाद आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेत पीक विमा गाजला. आताही अतिवृष्टीने महाराष्ट्र झोडपला आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सर्वच नेते नुकसानीचा आढावा घेत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या पीक विम्याच्या प्रश्नाने राज्यभर प्रचाराचा फुफाटा उडवला तो विषय आता चर्चेतही नाही. सरकार पीक विम्याला शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकाराचा दर्जा देणार का? मंडलांऐवजी शेतकरीनिहाय नुकसानीचे पंचनामे करणार का? विमा कंपनी निवडण्याचा अधिकार शेतकऱ्यांना कधी मिळेल? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. अतिशय तुटपुंज्या रकमेत येणारे पर्जन्यमापक यंत्रदेखील प्रत्येक गावात बसविले जाऊ नये यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतो तर दुसरे कोरडे राहते अशी परिस्थिती आहे. गाव आणि मंडलांच्या सीमारेषा पाहून पाऊस पडत नाही. तरीही एका मंडलामध्ये दोन तीन गावे मिळून पाऊस मोजला जातो. किमान पक्षी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयांना जरी आदेश दिले तरीही मापके बसविणे सहजसाध्य होईल. त्यातून नैैसर्गिक आपत्तीचे खरेखुरे चित्र मुंबईत बसणाऱ्या यंत्रणेला मिळेल. 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा