शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ममतादीदी गोव्यात येऊन काय करणार? भाजपापेक्षा जास्त काँग्रेसलाच फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 07:12 IST

ममता गोव्यातल्या ख्रिस्ती मतदारांना आपल्याकडे ओढतील हे स्पष्टच आहे. दीदींचा प्रयोग यशस्वी झाला, तर भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त फटका बसेल.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टक्कर देण्याची क्षमता देशातील काँग्रेसमधील अनेक बडे नेते गमावून बसले आहेत.त्रिपुरा, गोव्यासारखी छोटी राज्ये निवडली गेली आहेत. काय असावे याचे कारण? सत्ताधारी भाजपच्याही मते ममतादीदींना गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा येत्या २०२४ मध्ये जिंकायच्या आहेत

सदगुरू पाटील 

निवासी संपादक, लोकमत, गोवा

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या आयपेक कंपनीने आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्याचे राजकारण ढवळून काढण्यास आरंभ केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममतादीदींना गोव्यासारख्या छोट्या राज्यात प्रवेश करावा असे का वाटले असावे, हा प्रश्न  केवळ गोव्यातच नव्हे तर, गोव्याबाहेरही कुतूहलाने विचारला जात आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील नेते व त्या पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओ ब्रायन यांची गोव्यात भेट झाली.  ब्रायन यांनी सगळे पत्ते उघड केले नाहीत, पण, मूळ हेतूही लपवून ठेवला नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टक्कर देण्याची क्षमता देशातील काँग्रेसमधील अनेक बडे नेते गमावून बसले आहेत. सगळेच जण जणू कोशात गेले आहेत. लढण्याची, काही करून दाखवण्याची,  कार्यकर्त्यांना पुन्हा संघटित करण्याची, त्यांना पुन्हा नवचैतन्य देण्याची क्षमताच जणू ते गमावून बसले आहेत  असे वाटते. देशातील युवा मतदार  राहुल गांधी यांना अजून गंभीरपणे घेत नाही. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी मोदींच्या भाजपला चारीमुंड्या चीत केल्यानंतर ममतादीदी, त्यांच्या विश्वासातील खासदार, आमदार यांचाही आत्मविश्वास वाढला. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून  आपले नाव पुढे करायचे असेल, तर त्यासाठी काही राज्यांमध्ये आपली शक्ती  उभी करावी लागेल हे दीदी जाणून आहेत. त्यासाठी त्रिपुरा, गोव्यासारखी छोटी राज्ये निवडली गेली आहेत. काय असावे याचे कारण? 

ज्या राज्यांत हिंदुत्वाचे कार्ड वापरावे लागते, तिथे अगोदर न जाता सेक्युलर विचारसरणीचा प्रभाव असलेली राज्ये ममता दीदी निवडत असल्याचे दिसते. गोवा, त्रिपुरासारखी भूमी ही तृणमूल काँग्रेसला  अनुकूल वाटते. त्रिपुरामध्ये बंगाली भाषा आहे. गोव्याची लोकसंख्या १६ लाख तर त्रिपुराची लोकसंख्या ३७ लाख. छोट्या राज्यांमध्ये राजकीय काम उभे करण्यासाठी तुलनेने खर्चही कमी येतो. गोव्यासोबतच उत्तर प्रदेश, पंजाबच्याही निवडणुका येत्यावर्षी होणार आहेत, पण तृणमूलने अजून तिथे प्रवेश केलेला नाही.  खासदार ब्रायन यांना याविषयीचे कारण विचारले असता, पक्षाकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नाही असे ते बोलून गेले. गोव्यातील अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते व सत्ताधारी भाजपच्याही मते ममतादीदींना गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा येत्या २०२४ मध्ये जिंकायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयोग आताच सुरू झाले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीवेळी चाळीसपैकी काही जागा जरी जिंकल्या तर, आपली शक्ती उभी राहील असा विचार तृणमूल करत असल्याचे दिसते.

गोव्यात भारतीय जनता पक्षाचा प्रवेशदेखील १९९० च्या काळात असाच झाला होता. मात्र गोवा विधानसभेत खाते उघडण्यासाठी भाजपला १९९४ पर्यंत वाट पाहावी लागली होती. रामजन्मभूमी आंदोलनाने देशात जे हिंदुत्वाचे वारे तयार केले होते, त्याचा लाभ उठवत गोव्यात मनोहर पर्रीकर यांनी भाजपला विधानसभेत प्रवेश मिळवून दिला. ममतादीदींना म्हणजे तृणमूल काँग्रेसला गोव्याच्या विधानसभेत येत्या निवडणुकीवेळी खाते उघडता येईल काय?, गोव्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. अवघे चार महिने शिल्लक आहेत. तृणमूलला गोवा विधानसभेत खाते उघडणे मुळीच अशक्य नाही अशा प्रकारचा अहवाल प्रशांत किशोर यांच्या आयपेकने दीदींना दिलेला आहे. गोव्यात २५ टक्के अल्पसंख्याक मतदार आहेत. काँग्रेस पक्षाची ही हक्काची व्होट बँक. तृणमूल काँग्रेसने गोव्यात येताच याच व्होट बँकेला लक्ष्य बनविले आहे. प्रशांत किशोर यांनी प्रथम त्रिपुरामध्ये व मग गेल्या जून महिन्यापासून गोव्यात सर्वेक्षण सुरू केले. तृणमूल काँग्रेस पक्ष येथे रुजू शकतो, हा प्रशांत किशोर यांचा अंदाज. किशोर यांनी अभ्यासू व एमबीए वगैरे झालेल्या तरुणांची फळी गोव्यात राजकीय सर्वेक्षणासाठी कामाला लावली.

लुईझिन फालेरो ह्या मुरब्बी राजकीय नेत्याला काँग्रेसपासून विलग करण्यात व तृणमूलमध्ये त्यांना आणण्यात प्रशांत किशोर यांना यश आले. दोनवेळा गोव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री झालेले फालेरो हे गांधी कुटुंबाला अत्यंत जवळचे होते. तरीही त्यांना पस्तीसहून अधिक वर्षांनंतर काँग्रेस सोडण्यास प्रशांत किशोर यांनी भाग पाडले ही राष्ट्रीय बातमी ठरली. फालेरो स्वत: सांगतात की- आपण तृणमूलच्या कोणत्याच नेत्याला कधीच भेटलो नव्हतो, फक्त किशोर यांच्यासोबतच आपल्या काही बैठका झाल्या व आपण तृणमूलमध्ये पोहचलो. फालेरो यांना गोव्यातील ख्रिस्ती मतदारांमध्ये स्थान आहे व ख्रिस्ती धर्मगुरुंशी त्यांचे जवळचे नाते आहे. पहिल्या टप्प्यात ममतादीदी फालेरोंना तृणमूलचा चेहरा बनवत गोव्यात ख्रिस्ती मतदारांना स्वत:च्या बाजूने ओढतील हे स्पष्टच आहे. गोव्यात सध्या ख्रिस्ती व हिंदू धर्मीय राजकीय नेत्यांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स तृणमूल काँग्रेस पक्ष देत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने व भाजपनेही याचा धसका घेतलाय पण, दीदींचा प्रयोग यशस्वी झाला तर, भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त फटका बसेल.

टॅग्स :goaगोवाMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाcongressकाँग्रेस