शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वागतार्ह धोरण

By admin | Updated: January 22, 2016 02:38 IST

आधीच्या मनमोहन सिंग सरकारवर धोरण लकव्याचा आरोप करीत सत्तारूढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारवरही, गत काही दिवसांपासून क्षीण आवाजात का होईना

आधीच्या मनमोहन सिंग सरकारवर धोरण लकव्याचा आरोप करीत सत्तारूढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारवरही, गत काही दिवसांपासून क्षीण आवाजात का होईना; पण तोच आरोप व्हायला लागला आहे. या पृष्ठभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेला, नव्या वीज दर धोरणास मंजुरी देण्याचा निर्णय, निश्चितच स्वागतार्ह म्हणायला हवा. स्वच्छ ऊर्जेला चालना देणे, वीज वितरण कंपन्यांचे अधिक परिणामकारक नियमन आणि गुंतवणूक प्रस्तावांना जलद मंजुरी, या त्रिसूत्रीवर नव्या धोरणात मुख्यत्वे भर देण्यात आला आहे. नव्या वीज दर धोरणाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानास बळ देण्याचा मनसुबा निश्चितच स्तुत्य आहे. या धोरणानुसार, ऊर्जा प्रकल्पांना यापुढे नजीकच्या पालिकांच्या सांडपाण्याचा वापर करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. गत काही वर्षांपासून देशात जलटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करू लागली असून, भविष्यात ती अधिकच बिकट होत जाणार आहे. ऊर्जा प्रकल्पांची पाण्याची गरज सांडपाण्याच्या माध्यमातून भागविल्या गेल्यास, जलटंचाईपासून अल्पप्रमाणात का होईना, दिलासा मिळू शकेल, शहरांमधील गलिच्छपणा व रोगराईचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, नद्यानाले स्वच्छ राखण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. नव्या वीज दर धोरणात याशिवाय आणखीही काही नव्या पैलूंचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यापुढे वीज वितरण कंपन्यांना कचऱ्यापासून निर्माण केलेली वीज, कितीही प्रमाणात विकत घेता येणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी साहाय्यभूत ठरणारी ही सुधारणादेखील स्वागतार्ह म्हणायला हवी. नव्या धोरणात आधीच्या धोरणाच्या तुलनेत करण्यात आलेला सर्वात मोठा बदल हा आहे, की यापुढे राज्याराज्यांमधील वीज नियामक आयोगांना केंद्र सरकारच्या धोरणापासून फारकत घेता येणार नाही. त्यांना नव्या धोरणाच्या चौकटीतच निर्णय घ्यावे लागतील, स्वत:च्या गरजांनुसार नव्हे! स्वच्छ ऊर्जेला चालना देण्याकरिता, नविनीकरणीय ऊर्जेची खरेदी करण्यासाठी वीज वितरण कंपन्यांना अनुदान देण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही नव्या धोरणात करण्यात आली आहे. जागतिक तपमानवाढ कमी करण्यासाठी भारतावर टाकण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करण्याच्या दृष्टीने असे पाऊल आवश्यकच होते. नव्या धोरणात, नियामक आयोगांना दर निश्चित करताना, आयातीत कोळशाच्या दरात होणारी वाढ विचारात घेण्याची मुभा देण्यात आली आहे; परंतु चलन विनिमय दरातील बदल, भूमी अधिग्रहणाची किंमत आणि विविध परवानग्यांसाठी लागणारा खर्च या बाबींकडे मात्र साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. सुमारे ३० सुधारणा सुचविणाऱ्या नव्या धोरणात अशा काही त्रुटी असल्या तरी, एकंदरीत हे धोरण स्वागतार्हच आहे.