शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ बनले आखाडा

By admin | Updated: October 7, 2015 05:14 IST

विद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विद्यापीठात आता

- सुधीर महाजनविद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विद्यापीठात आता कामाची संस्कृतीच उरलेली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षण सोडून सर्वच आघाड्यांवर पुढे दिसते. येथे खुशमस्कऱ्यांची गर्दी झाली आहे. जातीयवादाचा जोर वाढत आहे. गटातटाच्या राजकारणाचे सर्कशीचे खेळ आहेत. खेकड्यांची पाय ओढण्याची शर्यत आहे. दबावाचे राजकारण आहे. नाही फक्त शिक्षण.गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ ने विद्यापीठात एक स्टिंग आॅपरेशन केले. त्यात एक धक्कादायक बाब पुढे आली. येथे बहुतांश वर्गात शिकविलेच जात नाही. विद्यार्थी दिवसभर वाट पाहतात आणि प्राध्यापक तास घेत नाहीत. हे भयानक वास्तव आहे. ते बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठातील, ज्यांनी मराठवाड्यात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व जे केवळ राजकारणी, घटनातज्ज्ञ नव्हते तर खऱ्या अर्थाने प्रज्ञावंत होते. कोणत्याही संस्थेचा प्रमुख हा तिचा कणा असतो. त्याची धडाडी आणि दूरदृष्टी संस्थेला पुढे नेते. परंतु, विद्यापीठातील जातीय आणि गटातटाच्या राजकारणाने या प्रमुखाला निष्प्रभ करून टाकले आहे. विद्यापीठातील विविध संघटना त्याना आपल्या तालावर नाचवतांना दिसतात. सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी बदललेला दिसतो. यातूनच त्यांचा प्रशासकीय वकुबही दिसतो. उदाहरण द्यायचे झाले तर व्यवस्थापन सभेच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सदस्यांचा परदेश दौरा. विद्यापीठाच्या खर्चाने हे सदस्य परदेश दौऱ्यावर निघण्याचे जाहीर होताच त्यावर टीका झाली. त्यावेळी कुलगुरू चोपडेंनी इन्कार करीत ही मंडळी स्वखर्चाने जाणार अशी घोषणा केली. पुढे हे सदस्य केटरींग अभ्यासक्रमाच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार अशी मखलाशीही केली. सदस्य दौऱ्यावर गेले. त्यांच्यासाठी विद्यापीठाने १४ लाख रूपये खर्च केले. याबाबत आता काहीही बोलण्यास कुलगुरू तयार नाहीत. खरे तर कुलगुरूंच्याच परेदश दौऱ्यांचा हिशोब मागण्याची वेळ आली आहे. कुलगुरू चोपडेंची घोषणाबाजी प्रारंभीच दिसली. वर्षभरापूर्वी त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हां, संशोधन प्रकल्प, शिष्यवृत्ती आदींसाठी एक हजार कोटीचा निधी मिळविणार अशी घोषणा केली होती. हा निधी उद्योग जगताकडून उभारण्याचा मानस होता. त्याचा साधा प्रस्तावही अजून तयार नाही. घोषणाही हवेतच विरली. विद्यापीठाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने २५ लाखांचा पुरस्कार जाहीर करणे अशा घोषणा एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरुऐवजी राजकारण्याच्या वाटतात. विद्यार्थ्यांना पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी अशा बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. गेल्या वर्षभरात विद्यापीठात एकही मोठी व्यक्ती आली नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी येणार होत्या. पण त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. कर्मचारी संघटनांच्या दबावाला बळी पडताना कुलगुरू अनेक वेळा दिसतात.कृष्णा भोगे विभागीय आयुक्त असताना काही काळ कुलगुरूपदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. त्यांच्या शिस्तीच्या बडग्याने एकदाही आंदोलन झाले नाही. पण आज कुलसचिवांना जाहीर शिवीगाळ होते तरी विद्यापीठ आणि कुलगुरू बघ्याची भूमिका घेताना दिसतात. विद्यापीठास उज्ज्वल अशी शैक्षणिक परंपरा आहे. डॉ.वा.ल.कुलकर्णी, डॉ. जी.एस.अमूर, डॉ.आर.पी. कुरूळकर, भालचंद्र नेमाडे, गंगाधर पानतावणे, यू.म.पठाण, मोईन शाकीर, सुधाताई काळदाते, डी.बी. पाचपट्टे, आनंद कर्वे अशा प्राध्यापकांनी हे विद्यापीठ गाजविले. ही माणसे म्हणजे वैभव होते. त्याच विद्यापीठात आज शिकविले जात नाही. आधीच दुष्काळ त्यात पोटाला चिमटा देत येथील पालक मुलांना उच्चशिक्षणासाठी पाठवतात. सहाव्या वेतन आयोगानुसार रीडरने आठवड्यातून १६, सहयोगी प्राध्यापकाने १४ तर विभागप्रमुखाने १२ तास घेतले पाहिजे. विद्यापीठात असे प्रामाणिक काम करणारे किती प्राध्यापक आहेत? विद्यापीठात कामाची संस्कृती उरली नाही.