शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चळवळीचे दोन महानायक

By admin | Updated: November 12, 2014 23:23 IST

नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान असते तर देशाचे हित अधिक चांगल्या प्रकारे साधले गेले असते, असे मानणारे लोक मोठय़ा संख्येने आहेत.

नेहरू आणि पटेल महान नेते होते. पण या दोघांबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान असते तर देशाचे हित अधिक चांगल्या प्रकारे साधले गेले असते, असे मानणारे लोक मोठय़ा संख्येने आहेत. 
 
डित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या स्वातंत्र्यलढय़ाचे दोन महानायक आहेत. एक डाव्या विचारसरणीकडे झुकले होते, तर दुसरे उजव्या  विचारांकडे कलले होते. पण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दोघांनी आपल्या विचारधारा बाजूला ठेवल्या, मतभेद विसरले. स्वातंत्र्य मिळवणो हेच दोघांपुढचे उद्दिष्ट होते. स्वातंत्र्यानंतर पं. नेहरूंच्या विचारांनी देश झपाटला होता. कारण नेहरू हे  सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. त्यांचे विचार लोकांना पटायचे.  स्वाभाविकपणो पटेलांचे नाव मागे पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा भूतकाळ नव्या स्वरूपात पुढे आणला आहे. सरदार पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ या रूपात साजरी करून त्यांनी पटेलांचे नाव पुढे आणले 
आहे. पण त्यांनी नेहरूंना कमी लेखलेले नाही. आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या अगदी विरुद्ध भूमिका घेताना मोदींनी देश स्वतंत्र करण्यात आणि नंतर तो उभा करण्यात नेहरूंची भूमिका मान्य केली आहे. भाजपाने काढलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात स्वातंत्र्यसेनानी आणि राष्ट्रानिर्मात्यांच्या यादीत नेहरूंना सामील केलेले नाही. पण मोदी नेहरूंचे ऋण विसरायला तयार नाहीत. तसे ते कबूल करतात. 
नेहरू आणि पटेल महान नेते होते. पण या दोघांबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान असते तर देशाचे हित अधिक चांगल्या प्रकारे साधले गेले असते, असे मानणारे लोक मोठय़ा संख्येने आहेत. अर्थात हा सारा जर तरचा खेळ आहे.  
तत्कालीन नेत्यांमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद हे एकटे या मताचे होते. आझाद हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते आणि नेहरूंचे मार्गदर्शक होते.   त्यांनी प्रशासकाच्या रूपात नेहरूंना जवळून पाहिले होते. आझाद आपले सचिव हुमायूं कबीर यांना म्हणाले होते, ‘नेहरूंना राष्ट्रपती आणि सरदार पटेलांना पंतप्रधान बनवायला हवे होते.’ आझाद हे पटेल यांची  प्रशंसा करतात . पण ते दोघे विचाराने किंवा दुस:या कुठल्या गोष्टीने एकमेकांच्या जवळ नव्हते. दोघेही राष्ट्रीय लढय़ाचे शिपाई होते. पण दोघांच्या विचारसरणीत टोकाचे अंतर होते आणि ते त्यांनी लपवूनही ठेवले नाही. पटेल हे हिंदुवादी होते. पण अनेकतावादी विचारांवर त्यांचा विश्वास होता.   आझाद हे कट्टर धर्मनिरपेक्ष होते. ‘ते हिंदू शो बॉय आहेत’ असा आरोप मुस्लिम लीगने केला होता. आझाद यांनी जोरदारपणो हा आरोप खोडून काढला. त्यांनीे सांगितले की, ‘पाकिस्तानची निर्मिती मुसलमानांच्या हिताची नाही, तर नुकसान करणारी ठरेल.’ फाळणीच्या आधी आझाद म्हणायचे,  आपली लोकसंख्या कमी असली तरी बरोबरीच्या भावनेने मुसलमान मान वर करून चालू शकतील. धर्माच्या आधारावर एकदा भारताची फाळणी झाली तर ही भावना राहणार नाही. हिंदू मुसलमानांना म्हणतील, ‘तुम्ही तुमचा वाटा घेतला आहे, आता तुम्ही पाकिस्तानात गेले पाहिजे.’
भारताच्या फाळणीचा मामला सरदार पटेलांवर सोपवला असता तर त्यांनी काय केले असते? त्यांनी आधी दोन्ही बाजूच्या लोकांची अदलाबदली केली असती. नंतर फाळणी केली असती. पं. नेहरू वेगळे होते. राजकारण किंवा शासनात धर्माची सरमिसळ त्यांना पसंत नव्हती. दोघांच्या विचारात हा मोठा फरक होता. याच कारणाने महात्मा गांधींनी नेहरूंना 
आपला उत्तराधिकारी निवडले. गांधीजींसाठी हिंदू-मुस्लीम ऐक्य हा महत्त्वाचा विषय होता. गांधीजी आणि पटेल हे दोघेही गुजरात राज्यातले. असे असतानाही गांधीजींनी पटेलांऐवजी नेहरूंना 
आपला वारस म्हणून निवडले. हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दलचे आपले विचार नेहरूच अधिक जोरदारपणो अमलात आणतील आणि हा मार्ग अहिंसेचा असेल, याची गांधीजींना खात्री होती. याचे एक चांगले उदाहरण  त्रवणकोरचे देता येईल. त्रवणकोरच्या महाराजाने आपले राज्य स्वतंत्र असल्याचे घोषित केले आणि भारतापासून वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू केली.  या महाराजाला भेटण्यासाठी सरदार पटेल गेले, तेव्हा त्यांनी सोबत खाकी गणवेशातला एक पोलीस  घेतला होता. महाराजाने कसलेही नखरे न करता  विलीनीकरणावर सही केली. नंतर महाराजाने याचे कारण स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘मला आणि माङया कुटुंबाला तुरुंगात दिवस काढायचे नव्हते.’
धर्मनिरपेक्ष मूल्यांचे आपले आदर्श नेहरूंच्या हाती सुरक्षित राहतील, असाही गांधीजींना विश्वास होता. पटेल यांनी पाकिस्तानला 64 कोटी रुपये द्यायला नकार दिला, तेव्हा ही बाब सिद्ध झाली.  फाळणीच्या करारात ही रक्कम पाकिस्तानला देण्याचे ठरले होते. पण काश्मीरसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना आपण  हा पैसा कसा देऊ शकतो, असा  पटेल यांचा सवाल होता. पटेल यांना वाकवण्यासाठी शेवटी गांधीजींना उपोषणाला बसावे लागले होते हा इतिहास आहे.  
सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर  बंदी आणली होती. संघाने धर्मनिरपेक्षतेचे वातावरण   गढूळ केल्याचे कारण त्यांनी दिले होते. संघावर बंदी घालून त्यांनी योग्यच केले. पण पुढे आपण सांस्कृतिक संघटना असल्याचे संघाने सांगितले तेव्हा पटेलांनी बंदी हटवली. हे खरे नव्हते. देखावा होता.   संघाने भाजपाचा उपयोग आपल्या राजकीय हालचालींसाठी केला. सध्या मोदी हा त्यांचा चेहरा आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीरपणो सांगून टाकले आहे की, संघ आता राजकारणात भाग घेईल. संघाचा दुटप्पीपणा नेहरूंनी उघड केला होता.  पटेल यांचा वापर मोदी आज देश तोडण्यासाठी करीत आहेत, हे दुर्दैव आहे. 
 
कुलदीप नय्यर 
 ज्येष्ठ स्तंभलेखक