शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘नव्या’ भारताची बीजे बाबासाहेबांच्या विचारांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 10:52 IST

Babasaheb Ambedkar: भारत आज महासत्तेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे; या प्रवासाची बीजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनीच रोवली होती. त्यांचे विचार कालातीत आहेत.

- डॉ. अजित गोपछडे(खासदार, राज्यसभा) 

भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासात काही व्यक्तिमत्त्वे केवळ इतिहासापुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती भविष्यास दिशा देणारी दीपस्तंभ ठरतात. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य हे असेच कालातीत मार्गदर्शक आहेत. समता आणि संविधान या मूलभूत तत्त्वांवर आधारलेली त्यांची राष्ट्रदृष्टी आजही राष्ट्रोन्नतीचा भक्कम पाया ठरते. आज भारत महासत्तेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे; या प्रवासाची बीजे खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकरांनीच रोवली होती, हे निर्विवाद सत्य आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेला केवळ सामाजिक मूल्य न मानता राष्ट्राच्या एकात्मतेचा कणा मानला. त्यांनी जात-पात, भेदभाव आणि विषमता यांचा कठोर विरोध करत मानवतेच्या आधारावर समाजरचना करण्याचे आवाहन केले. समरस समाजाशिवाय कोणताही विकास टिकाऊ ठरू शकत नाही, ही त्यांची ठाम भूमिका होती. त्यांच्या या विचारांमुळे समाजात परस्पर सन्मान, बंधुता आणि एकात्मतेची भावना दृढ होत गेली, जी आज भारताच्या एकसंधतेची खरी ताकद आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे संविधान. त्यांनी अत्यंत सखोल अभ्यास, दूरदृष्टी आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने ही राज्यघटना घडवली. या संविधानामुळे भारत केवळ स्वतंत्र राष्ट्र राहिला नाही, तर एक सशक्त, संघीय आणि सार्वभौम देश म्हणून जगासमोर उभा राहिला. आज भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होत नाही, यामागे या संविधानाने दिलेली संस्थात्मक ताकद आणि स्थैर्य आहे. हे केवळ डॉ. आंबेडकरांचे भारतीय जनतेवरील महान उपकार आहेत.समाजातील सर्वांत वंचित, उपेक्षित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीशिवाय राष्ट्राची प्रगती अपूर्ण राहते, ही त्यांची ठाम भूमिका होती. या विचारांतूनच सर्वसमावेशक आणि समताधिष्ठित विकासाची दिशा निश्चित होते. प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळणे, हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रोन्नतीची ओळख आहे. भारताचा विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांवर आधारलेला असावा, हे त्यांनी स्पष्ट केले.डॉ. आंबेडकरांनी शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. त्यांनी शिक्षणाला वैयक्तिक उन्नतीपुरते मर्यादित न ठेवता, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी साधन मानले. आज भारत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, त्यांच्या या विचारांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. जागरूक, सुशिक्षित आणि संघटित समाज हीच राष्ट्रोन्नतीची खरी गुरुकिल्ली आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात बौद्ध धर्म स्वीकारून भारतात एक सामाजिक आणि आध्यात्मिक नवचैतन्य निर्माण केले. हा निर्णय केवळ धार्मिक परिवर्तन नव्हता, तर तो सामाजिक पुनर्जागरणाचा एक विचारपूर्वक टप्पा होता. समता, करुणा आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित बौद्ध धम्माचा स्वीकार करून त्यांनी लाखो लोकांना आत्मसन्मान आणि सन्माननीय जीवनाचा मार्ग दिला. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला शांतता, सहअस्तित्व आणि नैतिकतेची दिशा दिली. या आध्यात्मिक उन्नतीमुळे भारतातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाले आणि राष्ट्र एकसंध राहण्यास बळकटी मिळाली.आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातूनही डॉ. आंबेडकरांचे विचार अत्यंत दूरदर्शी होते. औद्योगिकीकरण, कामगार हक्क आणि समतोल आर्थिक विकास यावर त्यांनी दिलेला भर आजही राष्ट्राच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतो. त्यांनी मांडलेली आर्थिक दृष्टी ही सर्वसमावेशक आणि टिकाऊ विकासाच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. पायाभूत सुविधा बळकट करणे आणि सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे, हीच त्यांची दृष्टी होती, जी आजच्या भारताच्या विकासमार्गात स्पष्टपणे दिसून येते. आज भारत जेव्हा महासत्तेकडे वाटचाल करत आहे, तेव्हा त्या प्रवासामागे असलेली वैचारिक शक्ती ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतच दडलेली आहे. त्यांनी दिलेली राज्यघटना, समाजाला दिलेली समतेची दिशा आणि बौद्ध धम्माच्या माध्यमातून दिलेला नैतिक आधार यामुळेच भारताला खरे सार्वभौमत्व प्राप्त झाले आहे. हे सार्वभौमत्व केवळ राजकीय नसून, सामाजिक आणि वैचारिक स्वातंत्र्याचेही प्रतीक आहे.बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि तत्त्वज्ञान हेच भारताच्या राष्ट्रोन्नतीचे खरे अधिष्ठान आहे. समता आणि संविधान या मूल्यांवर उभा राहणारा भारत केवळ आर्थिक महासत्ता नव्हे, तर सामाजिकदृष्ट्या न्याय्य, नैतिकदृष्ट्या सशक्त आणि मानवतेच्या मूल्यांनी परिपूर्ण असे राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Baba Saheb's thoughts: Seeds of a 'New' India.

Web Summary : Dr. Ambedkar's vision of equality and the Constitution are the foundation of India's progress. His emphasis on social justice, education, and unity guides India towards becoming a powerful and equitable nation. His thoughts are still relevant today.
टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीIndiaभारत