शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

आजचा अग्रलेख: जीएसटी कौन्सिलला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 07:44 IST

जीएसटी कौन्सिलचे निर्णय केंद्र तसेच राज्य सरकारांना बंधनकारक नाहीत.

जीएसटी कौन्सिलचे निर्णय केंद्र तसेच राज्य सरकारांना बंधनकारक नाहीत. ही परिषद केवळ शिफारस करू शकते, आदेश देऊ शकत नाही. करप्रणालीविषयी संसद व विधिमंडळांना समान अधिकार आहेत, हा सर्वोच्च न्यायालयाच्या तीनसदस्यीय खंडपीठाचा गुरुवारचा निकाल अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण,  संघराज्य संबंधांबद्दल नव्याने चर्चा घडविणारा आहे. न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे, की जीएसटी कौन्सिल ही फक्त अप्रत्यक्ष कर संकलनाबद्दल सुसंवाद घडविणारी, समन्वय साधणारी घटनात्मक संस्था आहे. 

राज्यकारभाराच्या अन्य विषयांप्रमाणेच आर्थिक बाबतीतही केंद्र व राज्य सरकारांमध्ये संघराज्य संकल्पना व लोकशाही ही दोन्ही मूल्ये परिषदेने जपली पाहिजेत. त्यासाठी फिस्कल फेडरलिझम असा शब्द न्यायालयाने वापरला आहे. केंद्र सरकारचे म्हणणे असे, की या निकालात नवे काही नाही. जीएसटी कौन्सिल ही केंद्र व राज्यांत समन्वय साधणारीच संस्था आहे. त्यामुळे या निकालाचा जीएसटी प्रणालीवर व करवसुलीवर काही परिणाम होणार नाही. केंद्र सरकारचे म्हणणे वरवर खरे आहे. कारण, लॉटरीवर अधिभार लावावा की नाही या मुद्द्यावर २०१९ मध्ये एकदाच अपवाद म्हणून या परिषदेत प्रत्यक्ष मतदान झाले आहे. तथापि, जीएसटी परतावा किंवा मालाच्या अंतिम विक्रीच्या ठिकाणी करवसुली होत असल्याने मालाचे उत्पादन करणाऱ्या राज्यांवर होणाऱ्या अप्रत्यक्ष अन्यायासारख्या मुद्द्यांवर आता कोर्टकज्जे वाढतील, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. राज्यांच्या विधिमंडळांनाही जीएसटीविषयी कायदा करण्याचा अधिकार असल्याचा मुद्दा विरोधी पक्षांची सरकारे असलेली राज्ये त्यांच्या राजकीय सोयीनुसार वापरतील, ही आणखी एक भीती व्यक्त होत आहे. ‘एक देश, एक कर’ घोषणेसह लागू केलेल्या जीएसटीला पुढच्या जून महिन्याच्या अखेरीस पाच वर्षे पूर्ण होतील. तो लागू करताना वर्षाला १४ टक्के नैसर्गिक वाढीसह देशातील सगळ्याच राज्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी परतावा मिळेल, असे ठरले आहे. ती मुदत ३० जूनला संपत आहे. मधली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारांना अडचणीचा सामना करावा लागला. कर भरणा खूप कमी झाला. त्यामुळे केंद्राला बाजारातून कर्ज काढून राज्य सरकारांना पैसे द्यावे लागले. 

महामारीच्या पहिल्या वर्षात १ लाख १० हजार कोटी, तर दुसऱ्या वर्षात १ लाख ५९ हजार कोटी कर्ज काढून राज्यांना परतावा दिला गेला. तरीदेखील महाराष्ट्रासह बहुतेक राज्यांना अजूनही मोठ्या रकमा येणे आहे. या पृष्ठभूमीवर, केंद्राने राज्यांना द्यावयाच्या जीएसटी परताव्याची मुदत कोरोना महामारीचा काळ विचारात घेऊन आणखी दोन वर्षे वाढवावी, अशी अनेक राज्यांची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्या मागणीला बळ येईल ते वेगळेच. कर भरणा करणाऱ्यांसाठी ही प्रणाली किचकट असली तरी तो वेगळा मुद्दा आहे व गेल्या पाच वर्षांत नियमांमध्ये अनेक सुधारणाही झाल्या आहेत. माल व सेवांचा व्यवहार एकाच राज्यात होत असेल तर एसजीएसटी हा राज्याचा आणि सीजीएसटी हा केंद्राचा वाटा, एकापेक्षा अधिक राज्यांचा संबंध आला तर इंटिग्रेटेड म्हणजे आयजीएसटी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी यूटीजीएसटी असे या प्रणालीचे ढोबळ स्वरूप आहे. जीएसटी कौन्सिलचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले ते आयजीएसटीमुळे. गुजरातमध्ये सागरी व्यापारात रिव्हर्स चार्जच्या स्वरूपात आयजीएसटी लावण्याबद्दल उच्च न्यायालयाच्या निर्णयाला गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 

केंद्र सरकारसह काही राज्यांच्याही याचिका होत्या. त्यावर एकत्रित सुनावणी झाली व हा निकाल आला. त्याच्या परिणामांचा विचार करता सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणखी एका मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवे. ही देशभराची केंद्रिभूत अशी करप्रणाली आहे आणि जीएसटी कौन्सिल म्हणा किंवा अन्य कारणांनी राज्ये महसुलाबाबत केंद्रावर अवलंबून आहेत. स्टॅम्प ड्युटी व जीएसटी कक्षेबाहेरच्या इंधनावरील अधिभार सोडला तर राज्यांच्या हातात स्वत:चे उत्पन्नाचे साधन नाही. राज्य चालविण्यासाठी पूर्णपणे केंद्रावर विसंबून राहावे लागते. पेट्रोल, डिझेल वगैरे इंधन जीएसटीच्या कक्षेत आणू नये, या बहुतेक राज्यांच्या भूमिकेचे कारण हेच आहे. त्यामुळेच राज्या-राज्यांमधील इंधनाचे दर वेगळे असतात आणि ते दर कमी करण्याच्या मुद्द्यावर राजकारण सुरू राहते. तेव्हा, महागाईच्या झळा भोगणाऱ्या सामान्यांसाठीही कुणीतरी न्यायालयात जावे किंवा एखाद्या राज्याने विधिमंडळात कायदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGSTजीएसटी