शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आपली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 08:01 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळकरी दिवसांविषयी एक हळवा कोपरा असतो. पण याच मुलांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण समाजाची चिंता वाढवणारे आहे.

- डॉ. हमीद दाभोलकर, मनोविकारतज्ज्ञ आणि अंनिस कार्यकर्ते

शाळेच्या दिवसांविषयी बहुतांश जणांच्या मनात एक हळवा कोपरा असतो. आपल्या आयुष्यातील ते सगळ्यात छान दिवस होते असे अनेक जणांना वाटत असते. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्या देशात दहा हजारांपेक्षा जास्त शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याची बातमी आपल्याला कळते,  तेव्हा एकदम धक्का बसू शकतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय क्राइम रेकोर्ड ब्युरोच्या रिपोर्टमधील ही अस्वस्थ करणारी आकडेवारी आहे. वृत्तपत्रात  शाळकरी मुलांच्या आत्महत्येची बातमी आपण कधी ना कधी वाचलेली असते. काही वेळापुरते त्याविषयी आपल्याला हळहळ वाटते आणि आपण ही गोष्ट विसरून जातो. ज्या वयात अजून मुलांना जीवनाचे पुरेसे आकलनदेखील झालेले नाही त्या वयातील मुले जर आत्महत्या करत असतील तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांना गंभीर विचार करणे आवश्यक आहे. 

शाळकरी मुले आत्महत्या का करतात याच्या कारणाचा विचार केला तर त्यामध्ये अभ्यासाचा वाढता ताण हे एक महत्त्वाचे कारण दिसून येते. समाजातील वाढती स्पर्धात्मकता ही शाळकरी मुलांसाठी शब्दश: जीवघेणी ठरते आहे. ‘एखाद्या परीक्षेत अपयश येणे म्हणजे संपूर्ण आयुष्यात अपयशी ठरणे’ अशी जी समाजधारणा आपण तयार केली आहे, त्याचा खूप मोठा नकारात्मक प्रभाव या मुलांच्या मानसिकतेवर पडत आहे. कोविडच्या कालखंडात शालेय शिक्षणात ज्या अडचणी निर्माण झाल्या त्यामधूनदेखील अनेक मुले अजून पूर्ण सावरू शकलेली नाहीत.  

पालकांबरोबरच्या नात्यामधील ताण हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकवेळा नकार पचवता आला नाही म्हणूनदेखील शाळकरी मुलांच्या आत्महत्या होताना दिसतात. ‘पालकांनी मोबाइल देण्यास नकार दिला किंवा मित्र, मैत्रिणींनी प्रेमाच्या भावनेला हवा तसा प्रतिसाद दिला नाही’, अशा कारणांमुळेही शाळकरी मुलांच्या आत्महत्या झालेल्या दिसतात. मैत्री-प्रेम-आकर्षण यामधील फरक लक्षात न येणारे हे वय आहे. सिनेमा आणि सोशल मीडिया यांच्या प्रभावातून याविषयी खूप सारी चुकीची माहिती मुलांपर्यंत पोचते. त्यामुळेदेखील मनात गोंधळ होऊन टोकाचे निर्णय घेतले जातात. 

शाळकरी मुलांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पालक, शाळा आणि शिक्षण संस्था या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या शालेय अभ्यासक्रमात मानवी शरीराविषयी माहिती असते त्याप्रमाणे मानवी मन, ताणतणाव आणि ते हाताळण्याचे सोपे मार्ग याविषयी धडे समाविष्ट करणे काळाची गरज आहे. मुलांना येणारे ताण-तणाव कसे ओळखायचे आणि ते कशाप्रकारे हाताळता येऊ शकतात, याविषयी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. पालकसंघांनीदेखील या कामी पुढाकार घ्यायला पाहिजे. 

शाळेमध्ये समुपदेशक असणे ही गोष्ट आपल्याकडे फार कमी शाळांमध्ये दिसून येते. शाळकरी मुलांना त्यांच्या वयात पडणारे प्रश्न, त्याची उत्तरे त्यांना योग्य वेळी मिळावीत यासाठी शाळेत समुपदेशक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

शाळकरी मुलांमध्येदेखील अनेक वेळा मानसिक आजारांची सुरुवातीची लक्षणे दिसून येतात. अशा वेळी ‘समाज काय म्हणेल?’, असा विचार न करता मोकळेपणाने मनोविकार तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. देशाचे भविष्य शाळांच्या खोल्यांमध्ये घडत असते असे म्हटले जाते. मानसिकदृष्ट्या आनंदी आणि ताणतणावांना सामोरे जाऊ शकणारी पिढी घडविण्यासाठी आपण सर्वांनी मुलांच्या भविष्य आणि भवितव्यासाठी सजग असायलाच हवे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Studentविद्यार्थी