शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आपली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 08:01 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळकरी दिवसांविषयी एक हळवा कोपरा असतो. पण याच मुलांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण समाजाची चिंता वाढवणारे आहे.

- डॉ. हमीद दाभोलकर, मनोविकारतज्ज्ञ आणि अंनिस कार्यकर्ते

शाळेच्या दिवसांविषयी बहुतांश जणांच्या मनात एक हळवा कोपरा असतो. आपल्या आयुष्यातील ते सगळ्यात छान दिवस होते असे अनेक जणांना वाटत असते. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्या देशात दहा हजारांपेक्षा जास्त शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याची बातमी आपल्याला कळते,  तेव्हा एकदम धक्का बसू शकतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय क्राइम रेकोर्ड ब्युरोच्या रिपोर्टमधील ही अस्वस्थ करणारी आकडेवारी आहे. वृत्तपत्रात  शाळकरी मुलांच्या आत्महत्येची बातमी आपण कधी ना कधी वाचलेली असते. काही वेळापुरते त्याविषयी आपल्याला हळहळ वाटते आणि आपण ही गोष्ट विसरून जातो. ज्या वयात अजून मुलांना जीवनाचे पुरेसे आकलनदेखील झालेले नाही त्या वयातील मुले जर आत्महत्या करत असतील तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांना गंभीर विचार करणे आवश्यक आहे. 

शाळकरी मुले आत्महत्या का करतात याच्या कारणाचा विचार केला तर त्यामध्ये अभ्यासाचा वाढता ताण हे एक महत्त्वाचे कारण दिसून येते. समाजातील वाढती स्पर्धात्मकता ही शाळकरी मुलांसाठी शब्दश: जीवघेणी ठरते आहे. ‘एखाद्या परीक्षेत अपयश येणे म्हणजे संपूर्ण आयुष्यात अपयशी ठरणे’ अशी जी समाजधारणा आपण तयार केली आहे, त्याचा खूप मोठा नकारात्मक प्रभाव या मुलांच्या मानसिकतेवर पडत आहे. कोविडच्या कालखंडात शालेय शिक्षणात ज्या अडचणी निर्माण झाल्या त्यामधूनदेखील अनेक मुले अजून पूर्ण सावरू शकलेली नाहीत.  

पालकांबरोबरच्या नात्यामधील ताण हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकवेळा नकार पचवता आला नाही म्हणूनदेखील शाळकरी मुलांच्या आत्महत्या होताना दिसतात. ‘पालकांनी मोबाइल देण्यास नकार दिला किंवा मित्र, मैत्रिणींनी प्रेमाच्या भावनेला हवा तसा प्रतिसाद दिला नाही’, अशा कारणांमुळेही शाळकरी मुलांच्या आत्महत्या झालेल्या दिसतात. मैत्री-प्रेम-आकर्षण यामधील फरक लक्षात न येणारे हे वय आहे. सिनेमा आणि सोशल मीडिया यांच्या प्रभावातून याविषयी खूप सारी चुकीची माहिती मुलांपर्यंत पोचते. त्यामुळेदेखील मनात गोंधळ होऊन टोकाचे निर्णय घेतले जातात. 

शाळकरी मुलांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पालक, शाळा आणि शिक्षण संस्था या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या शालेय अभ्यासक्रमात मानवी शरीराविषयी माहिती असते त्याप्रमाणे मानवी मन, ताणतणाव आणि ते हाताळण्याचे सोपे मार्ग याविषयी धडे समाविष्ट करणे काळाची गरज आहे. मुलांना येणारे ताण-तणाव कसे ओळखायचे आणि ते कशाप्रकारे हाताळता येऊ शकतात, याविषयी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. पालकसंघांनीदेखील या कामी पुढाकार घ्यायला पाहिजे. 

शाळेमध्ये समुपदेशक असणे ही गोष्ट आपल्याकडे फार कमी शाळांमध्ये दिसून येते. शाळकरी मुलांना त्यांच्या वयात पडणारे प्रश्न, त्याची उत्तरे त्यांना योग्य वेळी मिळावीत यासाठी शाळेत समुपदेशक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

शाळकरी मुलांमध्येदेखील अनेक वेळा मानसिक आजारांची सुरुवातीची लक्षणे दिसून येतात. अशा वेळी ‘समाज काय म्हणेल?’, असा विचार न करता मोकळेपणाने मनोविकार तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. देशाचे भविष्य शाळांच्या खोल्यांमध्ये घडत असते असे म्हटले जाते. मानसिकदृष्ट्या आनंदी आणि ताणतणावांना सामोरे जाऊ शकणारी पिढी घडविण्यासाठी आपण सर्वांनी मुलांच्या भविष्य आणि भवितव्यासाठी सजग असायलाच हवे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Studentविद्यार्थी