शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आपली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 08:01 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळकरी दिवसांविषयी एक हळवा कोपरा असतो. पण याच मुलांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण समाजाची चिंता वाढवणारे आहे.

- डॉ. हमीद दाभोलकर, मनोविकारतज्ज्ञ आणि अंनिस कार्यकर्ते

शाळेच्या दिवसांविषयी बहुतांश जणांच्या मनात एक हळवा कोपरा असतो. आपल्या आयुष्यातील ते सगळ्यात छान दिवस होते असे अनेक जणांना वाटत असते. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्या देशात दहा हजारांपेक्षा जास्त शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याची बातमी आपल्याला कळते,  तेव्हा एकदम धक्का बसू शकतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय क्राइम रेकोर्ड ब्युरोच्या रिपोर्टमधील ही अस्वस्थ करणारी आकडेवारी आहे. वृत्तपत्रात  शाळकरी मुलांच्या आत्महत्येची बातमी आपण कधी ना कधी वाचलेली असते. काही वेळापुरते त्याविषयी आपल्याला हळहळ वाटते आणि आपण ही गोष्ट विसरून जातो. ज्या वयात अजून मुलांना जीवनाचे पुरेसे आकलनदेखील झालेले नाही त्या वयातील मुले जर आत्महत्या करत असतील तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांना गंभीर विचार करणे आवश्यक आहे. 

शाळकरी मुले आत्महत्या का करतात याच्या कारणाचा विचार केला तर त्यामध्ये अभ्यासाचा वाढता ताण हे एक महत्त्वाचे कारण दिसून येते. समाजातील वाढती स्पर्धात्मकता ही शाळकरी मुलांसाठी शब्दश: जीवघेणी ठरते आहे. ‘एखाद्या परीक्षेत अपयश येणे म्हणजे संपूर्ण आयुष्यात अपयशी ठरणे’ अशी जी समाजधारणा आपण तयार केली आहे, त्याचा खूप मोठा नकारात्मक प्रभाव या मुलांच्या मानसिकतेवर पडत आहे. कोविडच्या कालखंडात शालेय शिक्षणात ज्या अडचणी निर्माण झाल्या त्यामधूनदेखील अनेक मुले अजून पूर्ण सावरू शकलेली नाहीत.  

पालकांबरोबरच्या नात्यामधील ताण हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकवेळा नकार पचवता आला नाही म्हणूनदेखील शाळकरी मुलांच्या आत्महत्या होताना दिसतात. ‘पालकांनी मोबाइल देण्यास नकार दिला किंवा मित्र, मैत्रिणींनी प्रेमाच्या भावनेला हवा तसा प्रतिसाद दिला नाही’, अशा कारणांमुळेही शाळकरी मुलांच्या आत्महत्या झालेल्या दिसतात. मैत्री-प्रेम-आकर्षण यामधील फरक लक्षात न येणारे हे वय आहे. सिनेमा आणि सोशल मीडिया यांच्या प्रभावातून याविषयी खूप सारी चुकीची माहिती मुलांपर्यंत पोचते. त्यामुळेदेखील मनात गोंधळ होऊन टोकाचे निर्णय घेतले जातात. 

शाळकरी मुलांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पालक, शाळा आणि शिक्षण संस्था या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या शालेय अभ्यासक्रमात मानवी शरीराविषयी माहिती असते त्याप्रमाणे मानवी मन, ताणतणाव आणि ते हाताळण्याचे सोपे मार्ग याविषयी धडे समाविष्ट करणे काळाची गरज आहे. मुलांना येणारे ताण-तणाव कसे ओळखायचे आणि ते कशाप्रकारे हाताळता येऊ शकतात, याविषयी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. पालकसंघांनीदेखील या कामी पुढाकार घ्यायला पाहिजे. 

शाळेमध्ये समुपदेशक असणे ही गोष्ट आपल्याकडे फार कमी शाळांमध्ये दिसून येते. शाळकरी मुलांना त्यांच्या वयात पडणारे प्रश्न, त्याची उत्तरे त्यांना योग्य वेळी मिळावीत यासाठी शाळेत समुपदेशक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

शाळकरी मुलांमध्येदेखील अनेक वेळा मानसिक आजारांची सुरुवातीची लक्षणे दिसून येतात. अशा वेळी ‘समाज काय म्हणेल?’, असा विचार न करता मोकळेपणाने मनोविकार तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. देशाचे भविष्य शाळांच्या खोल्यांमध्ये घडत असते असे म्हटले जाते. मानसिकदृष्ट्या आनंदी आणि ताणतणावांना सामोरे जाऊ शकणारी पिढी घडविण्यासाठी आपण सर्वांनी मुलांच्या भविष्य आणि भवितव्यासाठी सजग असायलाच हवे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Studentविद्यार्थी