शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आपली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 08:01 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळकरी दिवसांविषयी एक हळवा कोपरा असतो. पण याच मुलांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण समाजाची चिंता वाढवणारे आहे.

- डॉ. हमीद दाभोलकर, मनोविकारतज्ज्ञ आणि अंनिस कार्यकर्ते

शाळेच्या दिवसांविषयी बहुतांश जणांच्या मनात एक हळवा कोपरा असतो. आपल्या आयुष्यातील ते सगळ्यात छान दिवस होते असे अनेक जणांना वाटत असते. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्या देशात दहा हजारांपेक्षा जास्त शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याची बातमी आपल्याला कळते,  तेव्हा एकदम धक्का बसू शकतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय क्राइम रेकोर्ड ब्युरोच्या रिपोर्टमधील ही अस्वस्थ करणारी आकडेवारी आहे. वृत्तपत्रात  शाळकरी मुलांच्या आत्महत्येची बातमी आपण कधी ना कधी वाचलेली असते. काही वेळापुरते त्याविषयी आपल्याला हळहळ वाटते आणि आपण ही गोष्ट विसरून जातो. ज्या वयात अजून मुलांना जीवनाचे पुरेसे आकलनदेखील झालेले नाही त्या वयातील मुले जर आत्महत्या करत असतील तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांना गंभीर विचार करणे आवश्यक आहे. 

शाळकरी मुले आत्महत्या का करतात याच्या कारणाचा विचार केला तर त्यामध्ये अभ्यासाचा वाढता ताण हे एक महत्त्वाचे कारण दिसून येते. समाजातील वाढती स्पर्धात्मकता ही शाळकरी मुलांसाठी शब्दश: जीवघेणी ठरते आहे. ‘एखाद्या परीक्षेत अपयश येणे म्हणजे संपूर्ण आयुष्यात अपयशी ठरणे’ अशी जी समाजधारणा आपण तयार केली आहे, त्याचा खूप मोठा नकारात्मक प्रभाव या मुलांच्या मानसिकतेवर पडत आहे. कोविडच्या कालखंडात शालेय शिक्षणात ज्या अडचणी निर्माण झाल्या त्यामधूनदेखील अनेक मुले अजून पूर्ण सावरू शकलेली नाहीत.  

पालकांबरोबरच्या नात्यामधील ताण हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकवेळा नकार पचवता आला नाही म्हणूनदेखील शाळकरी मुलांच्या आत्महत्या होताना दिसतात. ‘पालकांनी मोबाइल देण्यास नकार दिला किंवा मित्र, मैत्रिणींनी प्रेमाच्या भावनेला हवा तसा प्रतिसाद दिला नाही’, अशा कारणांमुळेही शाळकरी मुलांच्या आत्महत्या झालेल्या दिसतात. मैत्री-प्रेम-आकर्षण यामधील फरक लक्षात न येणारे हे वय आहे. सिनेमा आणि सोशल मीडिया यांच्या प्रभावातून याविषयी खूप सारी चुकीची माहिती मुलांपर्यंत पोचते. त्यामुळेदेखील मनात गोंधळ होऊन टोकाचे निर्णय घेतले जातात. 

शाळकरी मुलांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पालक, शाळा आणि शिक्षण संस्था या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या शालेय अभ्यासक्रमात मानवी शरीराविषयी माहिती असते त्याप्रमाणे मानवी मन, ताणतणाव आणि ते हाताळण्याचे सोपे मार्ग याविषयी धडे समाविष्ट करणे काळाची गरज आहे. मुलांना येणारे ताण-तणाव कसे ओळखायचे आणि ते कशाप्रकारे हाताळता येऊ शकतात, याविषयी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. पालकसंघांनीदेखील या कामी पुढाकार घ्यायला पाहिजे. 

शाळेमध्ये समुपदेशक असणे ही गोष्ट आपल्याकडे फार कमी शाळांमध्ये दिसून येते. शाळकरी मुलांना त्यांच्या वयात पडणारे प्रश्न, त्याची उत्तरे त्यांना योग्य वेळी मिळावीत यासाठी शाळेत समुपदेशक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

शाळकरी मुलांमध्येदेखील अनेक वेळा मानसिक आजारांची सुरुवातीची लक्षणे दिसून येतात. अशा वेळी ‘समाज काय म्हणेल?’, असा विचार न करता मोकळेपणाने मनोविकार तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. देशाचे भविष्य शाळांच्या खोल्यांमध्ये घडत असते असे म्हटले जाते. मानसिकदृष्ट्या आनंदी आणि ताणतणावांना सामोरे जाऊ शकणारी पिढी घडविण्यासाठी आपण सर्वांनी मुलांच्या भविष्य आणि भवितव्यासाठी सजग असायलाच हवे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Studentविद्यार्थी