शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

औट घटकेचे अधिवेशन; अधिवेशनात एकदा जरी 'ते' कसब दिसले तरी विरोधक बॅकफूटवर जातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 06:49 IST

सरकारकडे बहुमत आहे; पण एकमत दिसत नाही. प्रचंड बहुमत असलेले सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शंभर टक्के घेऊच असे बिनदिक्कतपणे सांगू शकत नाही यातच खूप काही आले.

राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन ही म्हटले तर औपचारिकता आहे; पण सध्याच्या परिस्थितीत हे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारची कसोटी पाहणारे ठरेल असे दिसते. तीन पक्षांच्या १७० इतक्या जबरदस्त संख्याबळासह केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या (त्यातही कामकाजाचे तास फार तर १०-१५ तासच) अधिवेशनाला सामोरे जाताना खरेतर सरकार निर्धास्त असायला हवे. मात्र तसे दिसत नाही. गावखेड्यात एखादा माणूस भुताने  झपाटल्यासारखे वागायला लागला तर त्याला ‘बाहेरची बाधा’ झाली असे म्हणतात. सरकारमधील काही लोकांना जी ‘बाहेरची बाधा’ झाली आहे त्याचे सावट अधिवेशनावर असेल. त्यातच तीन पक्षांमधील परस्पर समन्वयाचा अभाव हीदेखील डोकेदुखी आहे. (state legislature session the government has a majority; But there is no consensus)

सरकारकडे बहुमत आहे; पण एकमत दिसत नाही. प्रचंड बहुमत असलेले सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शंभर टक्के घेऊच असे बिनदिक्कतपणे सांगू शकत नाही यातच खूप काही आले. काँग्रेसला अध्यक्षपद मिळत असल्याने ही निवडणूक घेण्यास राष्ट्रवादी फारशी इच्छुक नाही आणि उगाच या निवडणुकीच्या निमित्ताने एका शक्तिपरीक्षेला का म्हणून सामोरे जायचे म्हणून शिवसेनाही त्यासाठी आग्रही नाही; हे चित्र तिन्ही पक्षांच्या एकीतली बेकी दर्शविणारे आहे. अर्थात, अजूनही वेळ गेलेली नाही. अक्षपदाच्या उमेदवाराचे नाव सोमवारी जाहीर करून मंगळवारी निवडणूक घेता येऊ शकते. आमच्यात चांगला समन्वय असून तिन्ही पक्ष घट्टपणे एकत्र आहेत हे या निमित्ताने सरकारला सिद्ध करता येईल. ही निवडणूक एकतर्फी जिंकून सरकारवरील अस्थिरतेचे सावट केवळ कृत्रिम वा भाजपनिर्मित होते हे दाखविण्याची नामी संधी सरकारकडे आहे.  सरकार पाच वर्षे नक्कीच टिकेल असे बोलत राहून विश्वास व्यक्त करण्याऐवजी अध्यक्षपदाची निवडणूक घेणे व ती लिलया जिंकणे हा कृतिशील विश्वास ठरेल. त्याने सरकारची मांड अधिक पक्की होईल.

भाजपमध्येही सगळे काही आलबेल आहे असे मानण्याचे कारण नाही. या पक्षातील कच्चे दुवे,त्यांच्यातील गट-उपगट शोधून अधिवेशनात त्यांचा बरोबर वापर करून घेत विरोधकांवरच खेळी उलटविण्याचे ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ सभागृहात साधता आले पाहिजे. गेल्या अधिवेशनात अँटिलिया प्रकरणावरून सरकार बॅकफूटवर गेले होते. पुढे वेगवान घटना घडल्या. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने घेरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाइकांच्या साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. त्या प्रकरणात त्यांचे स्वत:चेही नाव आले आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनात एकदोन मोठे गौप्यस्फोट करण्याची तयारी फडणवीस यांनी केली आहे. त्यांचे हल्ले परतविण्याचे आव्हान सरकारपुढे असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा ही सरकारची जमेची बाजू आहे, खास ठाकरी शैलीत विरोधकांना नामोहरम करण्याचे कसब त्यांच्यात आहे. अधिवेशनात एकदा जरी ते कसब दिसले तरी विरोधक बॅकफूटवर जातील. राज्यासमोरील किती प्रश्नांची तड या अधिवेशनात लागेल याबाबत शंकाच आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक आहे. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीला ४० टक्के कट लावण्याचे आदेश वित्त विभागाने काही दिवसांपूर्वी काढले आहेत. कोरोना वर्ष-सहा महिन्यात जाईलही पण राज्याचे अर्थचक्र पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वर्षे लागणार आहेत. सामान्य माणूस अक्षरश: बेजार झाला आहे. त्यावर दिलासा म्हणून तत्काळ काय करायला हवे यावर खरे तर अधिवेशनात मंथन-चिंतन होणे अपेक्षित आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधकांमधील सध्याचे ताणलेले संबंध, अधिवेशनाचा अल्पकाळ या बाबी लक्षात घेता त्यावर एक मिनिटही चर्चा होण्याची शक्यता नाही. कोरोनावरील उपाययोजना, तिसऱ्या संभाव्य लाटेचे नियोजन, मराठा- ओबीसी आरक्षण, मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण असे सगळे प्रश्न या अधिवेशनात अनुत्तरितच राहतील असे दिसते.

एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी म्हणून अधिवेशनाकडे बघितले जात असेल तर दुसरे काय होणार? राज्यासमोरील समस्यांचे समाधान शोधणारे व्यासपीठ म्हणजे विधिमंडळ अधिवेशन हा विश्वास गेल्या काही वर्षांत कमी होत चालला आहे. ही बाब सुदृढ संसदीय लोकशाहीचे द्योतक नक्कीच नाही. जनसामान्यांच्या भावभावनांचे प्रतिबिंब अधिवेशनातील चर्चांमधून अन् त्यावर सरकारकडून मिळणाऱ्या उत्तरांमधून उमटावे असे अपेक्षित असते. त्याबाबत सत्तारूढ आणि विरोधी बाकांकडून अपेक्षित सामंजस्य दिवसेंदिवस कमी होत चालले आहे आणि अधिवेशन काळाच्या संकोचाने तर ते अधिकच आक्रसले आहे. 

सरकारकडे बहुमत आहे; पण एकमत दिसत नाही. प्रचंड बहुमत असलेले सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शंभर टक्के घेऊच असे बिनदिक्कतपणे सांगू शकत नाही यातच खूप काही आले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस