शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

औट घटकेचे अधिवेशन; अधिवेशनात एकदा जरी 'ते' कसब दिसले तरी विरोधक बॅकफूटवर जातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 06:49 IST

सरकारकडे बहुमत आहे; पण एकमत दिसत नाही. प्रचंड बहुमत असलेले सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शंभर टक्के घेऊच असे बिनदिक्कतपणे सांगू शकत नाही यातच खूप काही आले.

राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन ही म्हटले तर औपचारिकता आहे; पण सध्याच्या परिस्थितीत हे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारची कसोटी पाहणारे ठरेल असे दिसते. तीन पक्षांच्या १७० इतक्या जबरदस्त संख्याबळासह केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या (त्यातही कामकाजाचे तास फार तर १०-१५ तासच) अधिवेशनाला सामोरे जाताना खरेतर सरकार निर्धास्त असायला हवे. मात्र तसे दिसत नाही. गावखेड्यात एखादा माणूस भुताने  झपाटल्यासारखे वागायला लागला तर त्याला ‘बाहेरची बाधा’ झाली असे म्हणतात. सरकारमधील काही लोकांना जी ‘बाहेरची बाधा’ झाली आहे त्याचे सावट अधिवेशनावर असेल. त्यातच तीन पक्षांमधील परस्पर समन्वयाचा अभाव हीदेखील डोकेदुखी आहे. (state legislature session the government has a majority; But there is no consensus)

सरकारकडे बहुमत आहे; पण एकमत दिसत नाही. प्रचंड बहुमत असलेले सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शंभर टक्के घेऊच असे बिनदिक्कतपणे सांगू शकत नाही यातच खूप काही आले. काँग्रेसला अध्यक्षपद मिळत असल्याने ही निवडणूक घेण्यास राष्ट्रवादी फारशी इच्छुक नाही आणि उगाच या निवडणुकीच्या निमित्ताने एका शक्तिपरीक्षेला का म्हणून सामोरे जायचे म्हणून शिवसेनाही त्यासाठी आग्रही नाही; हे चित्र तिन्ही पक्षांच्या एकीतली बेकी दर्शविणारे आहे. अर्थात, अजूनही वेळ गेलेली नाही. अक्षपदाच्या उमेदवाराचे नाव सोमवारी जाहीर करून मंगळवारी निवडणूक घेता येऊ शकते. आमच्यात चांगला समन्वय असून तिन्ही पक्ष घट्टपणे एकत्र आहेत हे या निमित्ताने सरकारला सिद्ध करता येईल. ही निवडणूक एकतर्फी जिंकून सरकारवरील अस्थिरतेचे सावट केवळ कृत्रिम वा भाजपनिर्मित होते हे दाखविण्याची नामी संधी सरकारकडे आहे.  सरकार पाच वर्षे नक्कीच टिकेल असे बोलत राहून विश्वास व्यक्त करण्याऐवजी अध्यक्षपदाची निवडणूक घेणे व ती लिलया जिंकणे हा कृतिशील विश्वास ठरेल. त्याने सरकारची मांड अधिक पक्की होईल.

भाजपमध्येही सगळे काही आलबेल आहे असे मानण्याचे कारण नाही. या पक्षातील कच्चे दुवे,त्यांच्यातील गट-उपगट शोधून अधिवेशनात त्यांचा बरोबर वापर करून घेत विरोधकांवरच खेळी उलटविण्याचे ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ सभागृहात साधता आले पाहिजे. गेल्या अधिवेशनात अँटिलिया प्रकरणावरून सरकार बॅकफूटवर गेले होते. पुढे वेगवान घटना घडल्या. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने घेरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाइकांच्या साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. त्या प्रकरणात त्यांचे स्वत:चेही नाव आले आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनात एकदोन मोठे गौप्यस्फोट करण्याची तयारी फडणवीस यांनी केली आहे. त्यांचे हल्ले परतविण्याचे आव्हान सरकारपुढे असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा ही सरकारची जमेची बाजू आहे, खास ठाकरी शैलीत विरोधकांना नामोहरम करण्याचे कसब त्यांच्यात आहे. अधिवेशनात एकदा जरी ते कसब दिसले तरी विरोधक बॅकफूटवर जातील. राज्यासमोरील किती प्रश्नांची तड या अधिवेशनात लागेल याबाबत शंकाच आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक आहे. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीला ४० टक्के कट लावण्याचे आदेश वित्त विभागाने काही दिवसांपूर्वी काढले आहेत. कोरोना वर्ष-सहा महिन्यात जाईलही पण राज्याचे अर्थचक्र पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वर्षे लागणार आहेत. सामान्य माणूस अक्षरश: बेजार झाला आहे. त्यावर दिलासा म्हणून तत्काळ काय करायला हवे यावर खरे तर अधिवेशनात मंथन-चिंतन होणे अपेक्षित आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधकांमधील सध्याचे ताणलेले संबंध, अधिवेशनाचा अल्पकाळ या बाबी लक्षात घेता त्यावर एक मिनिटही चर्चा होण्याची शक्यता नाही. कोरोनावरील उपाययोजना, तिसऱ्या संभाव्य लाटेचे नियोजन, मराठा- ओबीसी आरक्षण, मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण असे सगळे प्रश्न या अधिवेशनात अनुत्तरितच राहतील असे दिसते.

एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी म्हणून अधिवेशनाकडे बघितले जात असेल तर दुसरे काय होणार? राज्यासमोरील समस्यांचे समाधान शोधणारे व्यासपीठ म्हणजे विधिमंडळ अधिवेशन हा विश्वास गेल्या काही वर्षांत कमी होत चालला आहे. ही बाब सुदृढ संसदीय लोकशाहीचे द्योतक नक्कीच नाही. जनसामान्यांच्या भावभावनांचे प्रतिबिंब अधिवेशनातील चर्चांमधून अन् त्यावर सरकारकडून मिळणाऱ्या उत्तरांमधून उमटावे असे अपेक्षित असते. त्याबाबत सत्तारूढ आणि विरोधी बाकांकडून अपेक्षित सामंजस्य दिवसेंदिवस कमी होत चालले आहे आणि अधिवेशन काळाच्या संकोचाने तर ते अधिकच आक्रसले आहे. 

सरकारकडे बहुमत आहे; पण एकमत दिसत नाही. प्रचंड बहुमत असलेले सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शंभर टक्के घेऊच असे बिनदिक्कतपणे सांगू शकत नाही यातच खूप काही आले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस