शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

वाघाने डरकाळी फोडलीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 9:51 PM

ठाकरी दम देणाऱ्या वाघांना कदाचित आपला आवाका समजून आल्याचे दिसत आहे.

- धनाजी कांबळे

थेट मोदींनाच आव्हान देऊन ‘चौकीदार चोर है’ म्हणत अवघा देश जागवत निघालेल्या वाघांनी अयोध्या आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. आधी मंदिराची चर्चा होईल, त्यानंतरच सरकार, युती  बाबतची चर्चा करू, असा ठाकरी दम देणाऱ्या वाघांना कदाचित आपला आवाका समजून आल्याचे दिसत आहे. युतीसंदर्भातील पत्रकार परिषदेत अमित शहांचे स्मितहास्य मोठा भाऊ आम्हीच ठरलो, असेच जणू दर्शवित होते. 

शिवसेना मराठी माणसांसाठी आणि मराठी माणूस शिवसेनेसाठी अशी वाघ डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेने नमतं घेण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळेच दिल्ली दरबारी कितीही भली मोठी आव्हाने देण्यात राऊतांची कसरत होत असताना इकडे प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र राफेल, नाणार, शेतकरी कर्जमुक्ती, नोटाबंदी, जीएसटी या सगळ्या उठवलेल्या वावटळीवर पाणी सोडून मोठा भाऊ भाजपच आहे, हे मान्य करून टाकले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप केवळ लोकसभा नव्हे, तर विधानसभा देखील एकत्रच लढणार आहेत. विशेष म्हणजे व्यवहारी मानसीकतेच्या अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना आताच विधानसभेसाठीही राजी केल्याने पुन्हा विधानसभेसाठी युती होणार का नाही, या चर्चेला पूर्णविराम दिल्याने एकाच दगडात दोन वेळची हमी मिळवून घेण्यात शहा आणि फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे. देशभर राफेलवरून रान उठवलं जात असताना राफेलपेक्षा पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उद्धव ठाकरे सांगत सुटले. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही पीक विमा घोटाळ्याबद्दल बोलू लागले. मात्र, कोणताच घोटाळा सत्तेत असताना बाहेर येणार नाही, याची पुरेशी तजवीस राज्यात फडणवीस आणि केंद्रात मोदींनी करून ठेवल्याने जे घोटाळे प्रथमदर्शनी झाले असावेत, असे वाटत होते. त्याची चर्चाच होणार नाही, अशी व्यवस्था या जोडगोळीने केल्याची शंका येते. कारण त्यानंतर कोणत्याच मीडियाने त्याची फारशी दखल घेतली नाही. दरम्यानच्या काळात अयोध्येत राम मंदिरच होणार अशी भीष्मप्रतिज्ञा घेऊन अयोध्येचा दौरा उद्धव ठाकरे यांनी काढला होता. त्यांनी अयोध्येत जाऊन मराठी माणसांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मूळचे अयोध्येतील रहिवासी असलेल्या व्यापारी आणि दुकानदारांना नाराजी व्यक्त केली होती. आधीच  राम मंदिरामुळे संवेदनशील बनलेल्या अयोध्येच माणसांच्या रोजच्या जगण्यात त्यामुळे येणाºया अडीअडचणींमुळे नेत्यांचे दौरे होतात, पण आमचे हाल होतात, अशा प्रतिक्रिया माध्यमांमधूनच सगळ्या देशाला समजल्या. केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर, शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आम्ही सरकारमध्ये असलो, तरी आम्ही कधीही राजीनामे देऊ शकतो, अशी पोकळ वल्गना शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी केली होती. त्यांनी आता सरकारचा कार्यकाळ काही दिवसांवर संपायला आला असला, तरी खिशातले राजीनामे काही बाहेर काढले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी देखील शिवसेना-भाजपच्या पुतणा-मावशीच्या प्रेमाचा खरपूस समाचार वेळोवेळी घेतलाच होता. तरीही स्वाभिमानी बाणा खुंटीला ठेवून स्वाभिमानाच्या तुलनेत सत्ता महत्त्वाची आहे, हे अचूक जाणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कितीही आकांडतांडव झाले, तरी भाजपसोबतचा डाव काही मोडू दिलेला नाही. अगदी सोमवारी युतीच्या घोषणा होण्याच्या आधीच्या काही दिवसांत जिथे जिथे शिवसेनेच्या सभा, बैठका, दौरे झाले. त्यात भाजप, मोदी आणि फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे यांनी सोडलेली नाही. विशेष म्हणजे ‘चौकीदार चोर है’ म्हणून दिल्लीत केजरीवाल यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी संजय राऊत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मंचावर भाजपवर टीका केली होती. किंबहुना शिवसेना विरोधकांच्या सोबत निवडणुकीत आघाडी करेल की काय, असे वाटावे इतक्या टोकाला संघर्ष गेला असताना, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत केलेली युती ही प्रत्यक्ष जनतेमध्ये किती टिकते, रुचते आणि मते मिळवून देण्यात यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेने अफजलखानाची उपमा दिलेली आहे. अर्थात या आधीच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेने भाजपला जिव्हारी लागेल, अशी टीका केलीच आहे. मात्र, अफजलखानाची उपमा देऊन निवडणुकांमध्ये गनिमी काव्याने सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे पाहणाऱ्या शिवसेनेला भाजपचे निष्ठावान आणि पारंपरिक मतदार किती मदत करतील, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, ज्या ठिकाणी भाजपची विचारधारा मानणारे, भाजपचे हक्काचे मतदार आहेत त्यांचे मन वळविण्यात, त्यांची समजूत घालण्यात नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांची टीम यशस्वी होते का, हेही पाहावे लागणार आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRafale Dealराफेल डीलRam Mandirराम मंदिरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९