शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर पॅटर्नची संघाकडून दखल

By admin | Updated: January 23, 2016 03:47 IST

केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत राबविण्याचा विचार असलेल्या महाकाय

केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत राबविण्याचा विचार असलेल्या महाकाय जलपुनर्भरण योजनेची हवाई पाहणी केली. योजनेसंंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेशदेखील दिले गेले आहेत. दोन मंत्री ही पाहणी करीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात निवृत्त शासकीय भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी राबविलेली जलसंधारणाची तंत्राधारित प्रणाली प्रत्यक्ष पाहिली. तब्बल पाच तास त्यांनी भाटपुरा, अजनाड-बंगला, वाडी, बोराडी या गावात जाऊन नाल्यावर राबविलेल्या साखळी सीमेंट बंधाऱ्याचा प्रयोग पाहिला. बंधाऱ्यांमुळे साठलेले पाणी, शेतकऱ्यांनी पिकविलेली बागायती शेती पाहिली. हंगामात दोन-तीन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.महाकाय जलपुनर्भरण योजनेविषयी गेल्या दहा वर्षांपासून चर्चा सुरू आहे. राज्याचा जलसंपदा विभाग जळगावच्या गिरीश महाजन यांच्याकडे, तर केंद्रातील जलसंपदा विभाग मध्य प्रदेशातील उमा भारती यांच्याकडे असल्याने आता योजनेला पुन्हा चालना मिळाली. मे महिन्यापर्यंत प्रकल्प अहवाल तयार होईल आणि वर्षभरात कामाला सुरुवात होईल, अशी जलसंपदा मंत्री महाजन यांची अपेक्षा आहे. एकीकडे वाघूर धरण, प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजचे पाणी पाटचाऱ्यांअभावी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेले नाही. निधीअभावी पाडळसरेसह काही धरणांची कामे बंद असताना महाकाय पुनर्भरण योजनेच्या भवितव्याविषयी साशंकता असणे स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी ‘शिरपूर पॅटर्न’ची प्रत्यक्ष पाहणी करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी प्रियदर्शनी सूतगिरणी आणि शिक्षणसंस्थेच्या निधीतून ‘शिरपूर पॅटर्न’साठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. खानापूरकर यांनी शिरपूर तालुक्यातील डोंगराळ भागातील नाल्यांची निवड करून उगमापासून संगमापर्यंत विशिष्ट अंतरावर टप्प्याटप्प्याने सीमेंट बंधारे बांधले. त्यासाठी नाले ४० फूट रुंद आणि ३० फूट खोल केले. एका नाल्यावर तब्बल १६ बंधारे बांधण्याचा प्रयोग त्यांनी दहिवद, गरताड येथे केला. असे तब्बल १३५ बंधारे त्यांनी बांधले आहेत.या जलसंधारण प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही भूसंपादन करावे लागलेले नाही. बंधाऱ्याची देखभाल-दुरुस्ती करावी लागत नाही. कोणत्याही प्रकारचे स्थलांतर होत नाही. ‘शिरपूर पॅटर्न’चा परिणाम आता या तालुक्यात दिसून येत आहे. सरासरी ६०० मि.मी. पर्जन्यमान असताना या तालुक्यातही यंदा पाऊस कमी झाला. परंतु तरीही १३५ बंधाऱ्यांमुळे या परिसरात ठिकठिकाणी जानेवारीअखेर जलसाठे कायम आहेत. शंभर फुटावर गेलेल्या विहिरी आणि ८०० फुटापर्यंत पोहोचलेल्या कूपनलिकांचे पुनर्भरण झाले आहे. पावसाचा थेंब अन् थेंब वाचविला आणि साठविला जात आहे. जलसाठे तयार आहे; पण विजेअभावी ते पाणी उपसता येत नसल्याची समस्या लक्षात घेऊन अमरीशभाई पटेल यांनी शेतकऱ्यांना डिझेल पंप व पाइप दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा या प्रयोगात सहभाग वाढला. नाला रुंदीकरणासाठी शेतकरी स्वत:हून जमिनी देऊ लागले.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शिरपूर पॅटर्नची पाहणी केलेली नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे खान्देशचे असूनदेखील अद्याप याठिकाणी आलेले नाहीत. काँग्रेसच्या आमदाराने केलेल्या या रचनात्मक कार्याची दखल भाजपाच्या मंत्र्यांनी घेतली नसली तरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली आहे. या दौऱ्यानंतर सरकारच्या सिंचन धोरणावर ‘शिरपूर पॅटर्न’चा काही प्रभाव जाणवतो काय, हा औत्सुक्याचा विषय राहील.- मिलिंद कुलकर्णी