शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तळकोकणातली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:27 IST

भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी असलेल्या संबंधांचा लाभ घेत स्वपक्षाचा नारा देणेच त्यांच्या हाती उरले आहे. राजकीय नेत्यांच्या यशाचा तळ दिसू लागला की, सामान्य माणसालाही चिंता वाटू लागते. एकेकाळी झंझावात निर्माण करणारे नेते अखेरच्या लढाईत कोणती खेळी खेळणार याचा अंदाज येत असला तरी त्यात बळ दिसत नाही. अशीच काहीशी अवस्था झालेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांची (शरद पवार आणि नारायण राणे) तळकोकणात कणकवलीत भेट झाली. ती राजकीय स्वरूपाची नव्हती, असे सांगण्यात आले. सदिच्छाभेट असेल, असे मानायला काहीच हरकत नाही. राजकीय नेत्यांची गणिते सदिच्छा भेटीवर आखली जात नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे. येत्या चार महिन्यांत देशभरात लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी प्रशासकीय पाातळीवर जशी वेगाने चालू आहे तशी राजकीय नेत्यांनीही आता वेळापत्रक निश्चित करायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी सातारा ते कोल्हापूर आणि कोकण असा पंधरवड्यात दोनदा दौरा केला. सातारा आणि कोल्हापूरच्या विद्यमान खासदारांच्या उमेदवारीस पक्षातूनच विरोध होत आहे. तो शमविण्यात त्यांची शक्ती खर्ची पडत आहे. या खासदारांना आवर्जून भेटून ते संकेत देत आहेत. तसाच संकेत नारायण राणे यांना देऊन तळकोकणातील राष्ट्रवादी कॉँग्रेसची संपत गेलेली ताकद पुन्हा उभी करण्यासाठी ही भेट नसेल कशावरून? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडताच सिंधुदुर्गमध्ये शिवसेना संपली होती. या दोन्ही जिल्ह्यांत शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसच होता; मात्र पक्षाच्या नेत्यांच्या भांडणात राष्ट्रवादी मागे पडली. नारायण राणे यांची तर जाम गोची झाली आहे. भाजपाने त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी कारवाईचा बडगा दाखविला. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याचे गाजरही दाखविले. त्यामुळे नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध करताच त्यांचा प्रवेशही लांबला तसेच मंत्रिमंडळातही सहभागी होता आले नाही. स्वत:चा पक्ष काढून सोय करून घ्यावी लागली. निवडणुका तोंडावर आल्या तरी शिवसेनेचा विरोध काही संपेना आणि आता तर भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी नेहमीच चांगले संबंध राहिल्याचा लाभ घेत स्वपक्षाचा नारा देणेच त्यांच्या हाती उरले आहे. राष्ट्रवादीलादेखील तळकोकणात कोणी ताकद देईल, असा नेता उरला नाही. गुहागर आणि दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेच्या वाटेवर अशा बातम्या वारंवार येत राहतात. ते खरेच गेले तर तळकोकणात राष्ट्रवादी तळ पाहणार आहे. अशा कठीण प्रसंगी मदतीला येऊ शकते ती नारायण राणे यांची फौज. शरद पवार आणि राणे या दोघांची गरज आहे याच समउद्देशाने ही ‘सदिच्छा’ भेट नसेल कशावरून? शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा तीच ते करणार असतात, असे अनेकवेळा घडले आहे. त्यामुळे त्यांनी उभयतांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असे सांगितले असले तरी त्यातून अनेक अर्थ ध्वनिप्रतित होतात. शरद पवार यांच्यापेक्षा नारायण राणे यांना कोणीतरी हात देण्याची गरज आहे. त्यांचे चिरंजीव आजही कागदोपत्री कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना पक्ष सोडून द्यावा लागणार आहे. शिवसेनेचा विरोध मोडून काढता येणार नाही. कारण भाजपाची अगतिकता आहे. कोकणात तर फारच महत्त्वाची साथ शिवसेनेची राहणार आहे. अशावेळी भाजपाने हात वर केले तर मदत कोण करणार? याच उद्देशाने ते (राणे) सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाभिमान पक्षातर्फे जनसंपर्कात गुंतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पक्ष बळकट करण्यासाठी हा जिल्हा दौरा सुरू आहे. शिवसेना सोडली, कॉँग्रेस सोडावी लागली आणि भाजपामध्ये जाता येईना अशी अडथळ्यांची शर्यत राणे यांना पार करावी लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा छोटा असला तरी येथेच त्यांच्या राजकीय ऊर्जेचा स्रोत आहे. तोच आटला तर दिवा विझायला वेळ लागणार नाही, यासाठीच ही तळकोकणातली गळाभेट असणार आहे.