शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तळकोकणातली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:27 IST

भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी असलेल्या संबंधांचा लाभ घेत स्वपक्षाचा नारा देणेच त्यांच्या हाती उरले आहे. राजकीय नेत्यांच्या यशाचा तळ दिसू लागला की, सामान्य माणसालाही चिंता वाटू लागते. एकेकाळी झंझावात निर्माण करणारे नेते अखेरच्या लढाईत कोणती खेळी खेळणार याचा अंदाज येत असला तरी त्यात बळ दिसत नाही. अशीच काहीशी अवस्था झालेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांची (शरद पवार आणि नारायण राणे) तळकोकणात कणकवलीत भेट झाली. ती राजकीय स्वरूपाची नव्हती, असे सांगण्यात आले. सदिच्छाभेट असेल, असे मानायला काहीच हरकत नाही. राजकीय नेत्यांची गणिते सदिच्छा भेटीवर आखली जात नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे. येत्या चार महिन्यांत देशभरात लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी प्रशासकीय पाातळीवर जशी वेगाने चालू आहे तशी राजकीय नेत्यांनीही आता वेळापत्रक निश्चित करायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी सातारा ते कोल्हापूर आणि कोकण असा पंधरवड्यात दोनदा दौरा केला. सातारा आणि कोल्हापूरच्या विद्यमान खासदारांच्या उमेदवारीस पक्षातूनच विरोध होत आहे. तो शमविण्यात त्यांची शक्ती खर्ची पडत आहे. या खासदारांना आवर्जून भेटून ते संकेत देत आहेत. तसाच संकेत नारायण राणे यांना देऊन तळकोकणातील राष्ट्रवादी कॉँग्रेसची संपत गेलेली ताकद पुन्हा उभी करण्यासाठी ही भेट नसेल कशावरून? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडताच सिंधुदुर्गमध्ये शिवसेना संपली होती. या दोन्ही जिल्ह्यांत शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसच होता; मात्र पक्षाच्या नेत्यांच्या भांडणात राष्ट्रवादी मागे पडली. नारायण राणे यांची तर जाम गोची झाली आहे. भाजपाने त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी कारवाईचा बडगा दाखविला. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याचे गाजरही दाखविले. त्यामुळे नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध करताच त्यांचा प्रवेशही लांबला तसेच मंत्रिमंडळातही सहभागी होता आले नाही. स्वत:चा पक्ष काढून सोय करून घ्यावी लागली. निवडणुका तोंडावर आल्या तरी शिवसेनेचा विरोध काही संपेना आणि आता तर भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी नेहमीच चांगले संबंध राहिल्याचा लाभ घेत स्वपक्षाचा नारा देणेच त्यांच्या हाती उरले आहे. राष्ट्रवादीलादेखील तळकोकणात कोणी ताकद देईल, असा नेता उरला नाही. गुहागर आणि दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेच्या वाटेवर अशा बातम्या वारंवार येत राहतात. ते खरेच गेले तर तळकोकणात राष्ट्रवादी तळ पाहणार आहे. अशा कठीण प्रसंगी मदतीला येऊ शकते ती नारायण राणे यांची फौज. शरद पवार आणि राणे या दोघांची गरज आहे याच समउद्देशाने ही ‘सदिच्छा’ भेट नसेल कशावरून? शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा तीच ते करणार असतात, असे अनेकवेळा घडले आहे. त्यामुळे त्यांनी उभयतांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असे सांगितले असले तरी त्यातून अनेक अर्थ ध्वनिप्रतित होतात. शरद पवार यांच्यापेक्षा नारायण राणे यांना कोणीतरी हात देण्याची गरज आहे. त्यांचे चिरंजीव आजही कागदोपत्री कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना पक्ष सोडून द्यावा लागणार आहे. शिवसेनेचा विरोध मोडून काढता येणार नाही. कारण भाजपाची अगतिकता आहे. कोकणात तर फारच महत्त्वाची साथ शिवसेनेची राहणार आहे. अशावेळी भाजपाने हात वर केले तर मदत कोण करणार? याच उद्देशाने ते (राणे) सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाभिमान पक्षातर्फे जनसंपर्कात गुंतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पक्ष बळकट करण्यासाठी हा जिल्हा दौरा सुरू आहे. शिवसेना सोडली, कॉँग्रेस सोडावी लागली आणि भाजपामध्ये जाता येईना अशी अडथळ्यांची शर्यत राणे यांना पार करावी लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा छोटा असला तरी येथेच त्यांच्या राजकीय ऊर्जेचा स्रोत आहे. तोच आटला तर दिवा विझायला वेळ लागणार नाही, यासाठीच ही तळकोकणातली गळाभेट असणार आहे.