शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या आंदोलनाने उजळले मोदींचे भाग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 00:34 IST

नव्याने आकारास येत असलेल्या राजकीय कारकिर्दीत मोदींनी हा मोठा धोका पत्करून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. मोदींच्या या कामगिरीमुळेच डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी २५ सप्टेंबर १९९० रोजी अडवाणींच्या रथयात्रेचे गुजरातमध्ये सारथ्य करण्यासाठी मोदींची निवड केली

हरीश गुप्ता

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी सन १९९० मध्ये काढलेल्या ऐतिहासिक रथयात्रेचा एक मजेशीर पैलू आजच्या दिवशी लोकांपुढे मांडणे महत्त्वाचे आहे. खरे तर वाजपेयी, अडवाणी, त्यावेळचे भाजपचे अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी व विजयाराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या निरनिराळ्या भागांतून अयोध्येकडे चार राम रथयात्रा काढायच्या अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूळ योजना होती; परंतु अनेक कारणांमुळे अखेरीस सोमनाथपासून अडवाणींच्या नेतृत्वाखाली एकच रथयात्रा काढायचे ठरले. त्यानंतर बराच शोध घेतल्यानंतर रथयात्रेच्या सोमनाथपासूनच्या टप्प्याचे मुख्य संयोजक म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यामागे कारणही तसेच होते. त्याआधी मोदींनी गुजरातमध्ये दोन ‘न्याययात्रां’चे आयोजन करून आपले संघटन कौशल्य सिद्ध केले होते. यातील पहिली ‘न्याययात्रा’ त्यावेळच्या गुजरातमधील चिमणभाई पटेल सरकारकडून दंगलग्रस्तांवर केल्या जाणाऱ्या कथित अन्यायाविरुद्ध होती. दुसरी १९८९ मधील ‘न्याययात्रा’ गुजरातमधील दारू माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी होती. त्यावेळी गुजरातच्या राजकारणात जनता दल व काँग्रेसनंतर भाजप तिसºया क्रमांकावर होता; पण या दोन यात्रांनी गुजरात भाजपमध्ये मोदी उगवता तारा म्हणून उदयास आले होते. या यात्रांच्या यशाच्या जोरावर सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत जनता दलासोबतच्या आघाडीस सोडचिठ्ठी देऊन भाजपने एकट्याने लढावे हे मोदींनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिले.

नव्याने आकारास येत असलेल्या राजकीय कारकिर्दीत मोदींनी हा मोठा धोका पत्करून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. मोदींच्या या कामगिरीमुळेच डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी २५ सप्टेंबर १९९० रोजी अडवाणींच्या रथयात्रेचे गुजरातमध्ये सारथ्य करण्यासाठी मोदींची निवड केली. तोपर्यंत स्वत: अडवाणींचा मोदींशी फारसा संपर्क नव्हता. रथयात्रेसारख्या अशा कार्यक्रमास लोकांचा कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी अडवाणी साशंक होते. शिवाय गुजरातमध्येही ते नवखे होते; पण ती रथयात्रा गुजरातमधील ज्या ६०० गावांमधून गेली, तेथील लोकांचा प्रचंड उत्साही प्रतिसाद पाहून मोदींच्या संघटन चातुर्याची अडवाणींना खात्री पटली. यात्रेत काही लोकांनी अडवाणींच्या कपाळावर रक्ताचे तिलक लावले. एवढेच नव्हे तर राजकोटजवळ जेतपूर येथे अयोध्येला नेण्यासाठी एक रक्ताने भरलेला कलशही अडवाणींकडे सोपविण्यात आला. या सर्वाने ते एवढे भारावून गेले की, त्यांनी थेट मुंबईपर्यंत रथयात्रेचे सारथ्य करण्याची मोदींना विनंती केली. आधी मोदी फक्त गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंत यात्रा घेऊन जाणार होते.

अडवाणी यांनी गांधीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि आपला राजकीय तळ दिल्लीहून गुजरातला हलवावा, असे मोदींनी त्यांना याच रथयात्रेत सुचविले. त्यानुसार लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९९१ मध्ये अडवाणी यांनी गांधीनगरमधून लोकसभा लढविली व ती निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकली. त्यामुळे मोदींच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. अर्थात यामुळे पक्षात पोटदुखीही सुरू झाली व शंकरसिंग वाघेला मोदींच्या विरोधात गेले; पण त्यानंतर मोदींनी मागे वळून पाहिले नाही. त्या रथयात्रेने अडवाणी व मोदी या दोघांचेही भाग्य बदलले. त्यानंतर लगेचच नोव्हेंबर १९९१ मध्ये मोदींची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाली. सन १९९३ मध्ये त्यांच्यावर संघटन महासचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. पक्षात मोदींची अल्पावधीत झालेली ही प्रगती खरंच लक्षणीय होती. त्यावेळी पक्षाध्यक्ष असूनही डॉ. जोशी रथयात्रेच्या या रणधुमाळीपासून बाजूला राहिले होते; पण मोदींच्या यशापासून स्फूर्ती घेऊन त्यांनीही १९९२ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘एकता यात्रा’ काढली. त्या यात्रेच्या संघटन व सारथ्याची जबाबदारीही अर्थात मोदींवरच होती. याच यात्रेत काश्मीरमध्ये दहशतवादाच्या भस्मासुराचा उन्माद सुरू असताना धोका पत्करून श्रीनगरच्या लाल चौकात २६ जानेवारी १९९२ रोजी तिरंगा राष्ट्रध्वज प्रथमच फडकविला गेला. त्यावेळी मोदी अडवाणींहून डॉ. जोशी यांच्या अधिक जवळ असल्याचे पक्षात अनेकांना वाटले होते. खुद्द अडवाणीही त्यावेळी एकदा थट्टेने म्हणाले होते की, जेटली किंवा सुषमा स्वराज यांच्यासारखा मोदींचा मी ‘मेन्टॉर’ थोडाच आहे? पक्षातील इतर अनेकांप्रमाणे मोदी अडवाणींचे चेले नव्हते हेही खरेच होते.

स्वत: मोदींनी पक्षातील स्वत:च्या उत्कर्षाचे श्रेय रा. स्व. संघाला आणि कठोर मेहनतीला दिले. ‘कठोर परिश्रमास पर्याय नाही’, असे त्यांचे नेहमीच सांगणे असते. त्यामुळे आज अयोध्येत राम मंदिराच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणे अनेक कारणांनी सार्थ आहे. अयोध्या आंदोलनाची मूळ कल्पना रा. स्व. संघाची होती. त्यामुळे संघाच्या वतीने सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत कार्यक्रमास उपस्थित असतील. स्वत: मोदीही कट्टर हिंदू असून, धोरणे व कार्यक्रम आखताना ते संघाच्या इच्छेनुसार वागत असतात.(लेखक लोकमतचे नॅशनल एडिटर, आहेत) 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याprime ministerपंतप्रधान