शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

Maharashtra: सरकारला वैधानिक विकास मंडळे का नकोत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 05:44 IST

Maharashtra: वैधानिक विकास मंडळांच्या गेल्या २६ वर्षांतील कार्याचा ताळेबंद पाहिला तर या मंडळांनी पाठपुरावा केला नसता तर अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागलेच नसते.

- नंदकिशोर पाटील(संपादक, लोकमत, औरंगाबाद)

विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राच्या वैधानिक विकास मंडळांची मुदत संपून दोन वर्षे झाली तरी राज्य सरकारने या मंडळांचे पुनर्गठन केलेले नाही. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावरून बराच गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ही मागणी लावून धरली असता त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारने सुचविलेल्या बारा आमदारांच्या नावाला राज्यपाल जोवर मंजुरी देत नाहीत, तोवर आम्ही वैधानिक विकास मंडळांवरील नियुक्त्या करणार नाही!’ उपमुख्यमंत्र्यांचे हे विधान अप्रस्तुत आणि तितकेच ते राज्यघटनेची पायमल्ली करणारे होते. बारा आमदारांच्या नियुक्तीचा आणि वैधानिक मंडळांचा अर्थाअर्थी काय संबंध? राज्यपाल हे राजकीय नव्हे, तर घटनादत्त पद आहे. शिवाय, विकास मंडळांनाही वैधानिक दर्जा आहे. राज्यघटनेच्या कलम ३७१ (२) नुसार  वैधानिक विकास मंडळांची स्थापना झालेली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच वैधानिक विकास मंडळांबाबत काहींच्या मनात किंतु-परंतु आहे. या मंडळांमुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचा संकोच होईल, प्रादेशिकवादाला खतपाणी मिळेल, अशी निराधार शंका त्यांच्या मनात आहे. शिवाय, विकास निधीच्या समन्यायी वाटपाचे अधिकार राज्यपालांच्या स्वाधीन करण्यास या मंडळींचा विरोध आहे. विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळांची मागणी पुढे आली तेव्हाही प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार ती पार पाडत असल्याचा युक्तिवाद केला गेला. मात्र, २९ जुलै १९९३ रोजी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने त्या दाव्याची पोलखोल केली. दांडेकर समितीच्या निष्कर्षानुसार  तेव्हा विदर्भ ३९.१२, मराठवाडा २३.५६ आणि उर्वरित महाराष्ट्र ३७.३२ टक्के इतका अनुशेष होता.  वास्तविक विदर्भ आणि मराठवाडा या दोन मागास प्रदेशांसाठीच वैधानिक मंडळाची स्थापना करण्याची मागणी होती. लोकनेते गोविंदभाई श्रॉफ यांनी जनता विकास परिषदेच्या माध्यमातून तब्बल दहा वर्षे संघर्ष केला. विकासासाठीचे हे सर्वांत मोठे आंदोलन होते. अखेर १९९४ साली गोविंदभाईंच्या पाठपुराव्याला यश आले; पण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आग्रहावरून विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रासाठीही वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आले.जागतिकीकरणानंतर विकासकामांतील सरकारची भागीदारी कमी होत आहे. त्या जागी खासगी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून ‘पीपीपी’ मॉडेल आले आहे. तेव्हा या नव्या अर्थयुगात वैधानिक विकास मंडळांची गरज काय, असाही सवाल केला जात आहे. मात्र, पायाभूत सुविधांमधील कोणतीही गुंतवणूक सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नसते. खासगी गुंतवणूकदारांना सवलती देण्याचे अधिकार सरकारकडेच असतात. कोणत्या भागात औद्योगिक गुंतवणूक झाली पाहिजे, याचा प्राधान्यक्रम सरकारच ठरवीत असते. वैधानिक विकास मंडळांच्या गेल्या २६ वर्षांतील कार्याचा ताळेबंद पाहिला तर या मंडळांनी पाठपुरावा केला नसता आणि राज्यपालांनी आपले विशेष अधिकार वापरले नसते, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागलेच नसते. आजही अनेक प्रकल्प निधीअभावी अपूर्णावस्थेत आहेत. मराठवाड्यात पुरेशी साठवण क्षमता नसल्याने दरवर्षी गोदावरी खोऱ्यातील ५०० टीएमसी पाणी तेलंगणात वाहून जाते. साठवणार कुठे? भांडेच नाही! औरंगाबादनजीक शेंद्रा येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी आहे, पण गुंतवणूकदार येण्यास तयार नाहीत. सरकारही त्यासाठी आग्रही दिसत नाही. सध्याच्या राज्यपालांचे आणि महाविकास आघाडी सरकारचे किती सख्य आहे, हे सर्वांना विदित आहे. वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून निधी वाटपाचे अधिकार राज्यपालांच्या स्वाधीन करण्यास सरकारमधील काही मंडळींचा विरोध आहे. राजकीयदृष्ट्या तो बरोबर असेलही; परंतु या राजकीय डावपेचात मागास भागांना का वेठीस धरता? औद्योगिक गुंतवणूक, सिंचनाच्या सुविधांअभावी या भागाचे वाळवंट होण्याची वेळ आलेली आहे. समन्यायी विकासाचे सूत्र हरवले तर त्यातून निश्चित उद्रेक होऊ शकतो. आज उत्तरेकडील राज्यातील हजारो युवक ‘अग्निपथ’च्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील युवकांवर ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर विकास मंडळांचे पुनर्गठन करा.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र