शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार

By यदू जोशी | Updated: May 26, 2023 12:19 IST

महाविकास आघाडीत कोण मोठा, कोण लहान यावरून वाद सुरू आहे. त्यावर ‘आम्ही तिळे’ हा पर्याय काढण्यात आला खरा; पण तो सर्वांना मान्य होण्याची शक्यता नाही.

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

महाविकास आघाडीत नवीन भावकी सुरू झाली आहे. कोण मोठा, कोण लहान यावरून वाद पेटला आहे. जन्मतारखेवरून लहान- मोठा भाऊ ठरवता येतो; पण पक्षांबाबत तो निकष लागत नाही. लहान- मोठ्याच्या वादात ‘आम्ही तर तिळे भाऊ’ हा ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा युक्तिवाद वादावर पडदा टाकण्यासाठी योग्य वाटला; पण तो तिन्ही पक्षांकडून स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. दुसरे चव्हाण म्हणजे पृथ्वीराजबाबांनी आधी राष्ट्रवादी मग काँग्रेस अन् शेवटी शिवसेना, असा क्रम लावत मातोश्रीला धाकली पाती ठरवले. काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून ठाकरेंच्या शिवसेनेला लहान ठरवत आहेत. 

ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती दिसत असताना त्यांना लहान कसे करायचे, त्यांचे महत्त्व कमी कसे करायचे, हा प्रश्न भाजपला सतावत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्षच भाजपला जणू आपणहून मदत करत आहेत. महाविकास आघाडीसाठी ठाकरेंबद्दलची सहानुभूती हा मोठा फॅक्टर आहे व त्यातूनच त्यांची प्रतिमा मित्रपक्षांच्या नेत्यांपेक्षा मोठी बनली आहे. ठाकरेंना मविआचे नेते मानले की, मग त्यांच्या पक्षाकडेच मविआचे नेतृत्व जाईल. म्हणजे पुन्हा आपल्याला क्रमांक दोन, तीनवर बसावे लागेल. हे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना नको आहे, त्यातूनच ठाकरेंना लहान ठरवणे सुरू झाले आहे. भाजपला तेच हवे आहे.

हे सगळे सुरू होण्याआधी साधारणत: दोन महिने आधी इथेच लिहिले होते की, कोण लहान, कोण मोठा यावरून महाविकास आघाडीत वाद पेटेल. १५ आमदार अन् ५ खासदारांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याची वा लोकसभेच्या जागा देण्याची इतर दोघांची तयारी नसेल. तसेच घडत आहे. 

आपल्या ताकदीची कल्पना नसलेली शिवसेना गतवैभवाच्या आधारे अडून बसली आहे. ‘आम्ही तिन्ही भाऊ एकत्र राहतो, फक्त किचन वेगवेगळे आहे’ असे काही जण सांगतात; तिघांनी वेगवेगळे होणे हा त्यानंतरचा टप्पा असतो. महाविकास आघाडी सध्या किचन एक असण्याच्या टप्प्यात आहे. देशपातळीवर भाजपच्या विरोधात सगळे पक्ष एकवटत असताना महाराष्ट्रातील मविआचे नेते एकमेकांवर टीका करत सुटले आहेत. भाजपच्या विरोधातील वातावरणाचा एकत्रित फायदा मविआला महाराष्ट्रात घेता आला नाही, हे विश्लेषण समोर येईल तेव्हा उशीर झालेला असेल. 

भिन्न विचारांचे पक्ष भाजपच्या विरोधात एकवटून सत्तेत येऊ शकतात हे मॉडेल महाराष्ट्राने २०१९ मध्ये देशाला दिले. भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठीचा शंखनाद महाराष्ट्रातून होऊ शकतो, हा विश्वास घेऊन देशभरातील दिग्गज नेते मुंबईत येऊन शरद पवार, उद्धव ठाकरेंना भेटत आहेत.   

नितीशकुमार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, भगवंत मान हे तीन- तीन मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री येऊन गेले. आणखीही काही नेते येतील. एकीकडे महाराष्ट्राबद्दल हा विश्वास देशातील नेत्यांना वाटत असताना महाविकास आघाडीचे नेते मात्र एकमेकांना सान- थोर  ठरवत फिरत आहेत. 

हा विरोधाभास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मतदारांना अस्वस्थ करणारा आहे. कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास खूपच वाढला आहे. ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणे काँग्रेसला मान्य नसणार. राष्ट्रवादीही ते मान्य करणार नाही. त्यावर सामूहिक नेतृत्व हाच तोडगा असू शकेल. 

ती चर्चा भाजपच्या पथ्यावरलोकसभेची निवडणूक आणखी दहा महिन्यांनी आहे. विधानसभा निवडणुकीला तर आणखी १७ महिने आहेत. मग मविआतील जागावाटपाची चर्चा आतापासूनच कशासाठी? तीन पक्षांत कोणते मतदारसंघ कोणाला, हे आतापासूनच ठरले, तर ते महाविकास आघाडीसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष लढणार व कोणता उमेदवार असू शकेल, याचा नेमका अंदाज भाजपला ८-९ महिने आधीच येईल आणि आपला उमेदवार ठरविणे सोपे जाईल. मविआला तयारीसाठी जास्त अवधी मिळेल, हे खरे असले तरी आपल्या पक्षाला जागा न मिळालेले; पण इच्छुक असलेले नेते भाजपच्या गळाला लागू शकतील. जागावाटपाची बोलणी आताच करण्यामागे बाहेरच्या कुणाचा वा आतल्या कुणाचा चक्रव्यूव्ह तर नाही हेही तपासले पाहिजे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा