शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार

By यदू जोशी | Updated: May 26, 2023 12:19 IST

महाविकास आघाडीत कोण मोठा, कोण लहान यावरून वाद सुरू आहे. त्यावर ‘आम्ही तिळे’ हा पर्याय काढण्यात आला खरा; पण तो सर्वांना मान्य होण्याची शक्यता नाही.

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

महाविकास आघाडीत नवीन भावकी सुरू झाली आहे. कोण मोठा, कोण लहान यावरून वाद पेटला आहे. जन्मतारखेवरून लहान- मोठा भाऊ ठरवता येतो; पण पक्षांबाबत तो निकष लागत नाही. लहान- मोठ्याच्या वादात ‘आम्ही तर तिळे भाऊ’ हा ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा युक्तिवाद वादावर पडदा टाकण्यासाठी योग्य वाटला; पण तो तिन्ही पक्षांकडून स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. दुसरे चव्हाण म्हणजे पृथ्वीराजबाबांनी आधी राष्ट्रवादी मग काँग्रेस अन् शेवटी शिवसेना, असा क्रम लावत मातोश्रीला धाकली पाती ठरवले. काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून ठाकरेंच्या शिवसेनेला लहान ठरवत आहेत. 

ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती दिसत असताना त्यांना लहान कसे करायचे, त्यांचे महत्त्व कमी कसे करायचे, हा प्रश्न भाजपला सतावत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्षच भाजपला जणू आपणहून मदत करत आहेत. महाविकास आघाडीसाठी ठाकरेंबद्दलची सहानुभूती हा मोठा फॅक्टर आहे व त्यातूनच त्यांची प्रतिमा मित्रपक्षांच्या नेत्यांपेक्षा मोठी बनली आहे. ठाकरेंना मविआचे नेते मानले की, मग त्यांच्या पक्षाकडेच मविआचे नेतृत्व जाईल. म्हणजे पुन्हा आपल्याला क्रमांक दोन, तीनवर बसावे लागेल. हे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना नको आहे, त्यातूनच ठाकरेंना लहान ठरवणे सुरू झाले आहे. भाजपला तेच हवे आहे.

हे सगळे सुरू होण्याआधी साधारणत: दोन महिने आधी इथेच लिहिले होते की, कोण लहान, कोण मोठा यावरून महाविकास आघाडीत वाद पेटेल. १५ आमदार अन् ५ खासदारांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याची वा लोकसभेच्या जागा देण्याची इतर दोघांची तयारी नसेल. तसेच घडत आहे. 

आपल्या ताकदीची कल्पना नसलेली शिवसेना गतवैभवाच्या आधारे अडून बसली आहे. ‘आम्ही तिन्ही भाऊ एकत्र राहतो, फक्त किचन वेगवेगळे आहे’ असे काही जण सांगतात; तिघांनी वेगवेगळे होणे हा त्यानंतरचा टप्पा असतो. महाविकास आघाडी सध्या किचन एक असण्याच्या टप्प्यात आहे. देशपातळीवर भाजपच्या विरोधात सगळे पक्ष एकवटत असताना महाराष्ट्रातील मविआचे नेते एकमेकांवर टीका करत सुटले आहेत. भाजपच्या विरोधातील वातावरणाचा एकत्रित फायदा मविआला महाराष्ट्रात घेता आला नाही, हे विश्लेषण समोर येईल तेव्हा उशीर झालेला असेल. 

भिन्न विचारांचे पक्ष भाजपच्या विरोधात एकवटून सत्तेत येऊ शकतात हे मॉडेल महाराष्ट्राने २०१९ मध्ये देशाला दिले. भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठीचा शंखनाद महाराष्ट्रातून होऊ शकतो, हा विश्वास घेऊन देशभरातील दिग्गज नेते मुंबईत येऊन शरद पवार, उद्धव ठाकरेंना भेटत आहेत.   

नितीशकुमार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, भगवंत मान हे तीन- तीन मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री येऊन गेले. आणखीही काही नेते येतील. एकीकडे महाराष्ट्राबद्दल हा विश्वास देशातील नेत्यांना वाटत असताना महाविकास आघाडीचे नेते मात्र एकमेकांना सान- थोर  ठरवत फिरत आहेत. 

हा विरोधाभास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मतदारांना अस्वस्थ करणारा आहे. कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास खूपच वाढला आहे. ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणे काँग्रेसला मान्य नसणार. राष्ट्रवादीही ते मान्य करणार नाही. त्यावर सामूहिक नेतृत्व हाच तोडगा असू शकेल. 

ती चर्चा भाजपच्या पथ्यावरलोकसभेची निवडणूक आणखी दहा महिन्यांनी आहे. विधानसभा निवडणुकीला तर आणखी १७ महिने आहेत. मग मविआतील जागावाटपाची चर्चा आतापासूनच कशासाठी? तीन पक्षांत कोणते मतदारसंघ कोणाला, हे आतापासूनच ठरले, तर ते महाविकास आघाडीसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष लढणार व कोणता उमेदवार असू शकेल, याचा नेमका अंदाज भाजपला ८-९ महिने आधीच येईल आणि आपला उमेदवार ठरविणे सोपे जाईल. मविआला तयारीसाठी जास्त अवधी मिळेल, हे खरे असले तरी आपल्या पक्षाला जागा न मिळालेले; पण इच्छुक असलेले नेते भाजपच्या गळाला लागू शकतील. जागावाटपाची बोलणी आताच करण्यामागे बाहेरच्या कुणाचा वा आतल्या कुणाचा चक्रव्यूव्ह तर नाही हेही तपासले पाहिजे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा