शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

हे काळा पैसा शोधण्यातले अपयशच!

By किरण अग्रवाल | Updated: April 16, 2019 07:46 IST

देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील बँकांमध्ये असलेला काळा पैसा शोधून भारतात आणण्याची आश्वासने गेल्या निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. परंतु बाहेरील जाऊ द्या, देशातही हे काम त्यांना करता आले नाही.

किरण अग्रवाल

काळा पैशाचे शोधकाम हे भाषणात आश्वासने देण्याइतके सोपे-सहज नाही, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आता झाली असावी; कारण म्हणता म्हणता पाच वर्षे संपली. देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील बँकांमध्ये असलेला काळा पैसा शोधून भारतात आणण्याची आश्वासने गेल्या निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. परंतु बाहेरील जाऊ द्या, देशातही हे काम त्यांना करता आले नाही. यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत देशात तब्बल २५०४ कोटींची बेहिशेबी रोकड जप्त झाल्याने तेच स्पष्ट होऊन गेल्याचे म्हणता यावे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियात वापरल्या जाणाऱ्या भाजपाच्याच टॅग लाइनप्रमाणे ‘पूर्वीपेक्षा अधिक’चे प्रत्यंतर अनेक बाबतीत येत आहे. कधी नव्हे इतक्या टोकाच्या व जहरी प्रचाराने ही निवडणूक लढली जात आहेच, शिवाय जिंकण्यासाठीचे जे जे म्हणून काही ‘फंडे’ वापरले जातात, त्यातही अधिकची भर पडत असल्याचे यंदा प्रकर्षाने दिसत आहे. ही भर राजकीय पक्षांना अधिकृतपणे मिळणाऱ्या निधीत जशी पडताना दिसते, तशी निवडणुकीतील खर्चातही मुक्तहस्तपणे होताना दिसते आहे. रोकड, मद्य, अंमली पदार्थाचा यात घडून येत असलेला गैरवापर केवळ आश्चर्यचकित करणाराच नसून व्यवस्था सुधारू पाहण्याच्या बाता मारणाऱ्यांचे अपयश अधोरेखित करणाराही आहे. विशेष म्हणजे, इतर राजकीय पक्षांपेक्षा आपण वेगळे असल्याची टिमकी वाजविणाऱ्या भाजपामध्येही मोठ्या प्रमाणात बंडाळी, तिकीट वाटपातील घोळ व त्यातून जाहीरपणे हाणामाऱ्या झाल्याचे दिसून आले आहे.

देशात होत असलेल्या सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचे केवळ एकाच चरणातील मतदान झाले असून, अजून सहा चरणातील मतदान बाकी आहे, तरी आतापर्यंत २५०४ कोटींची रोकड जप्त झाली व तब्बल ४८,८०४ किलो अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची अधिकृत माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. यातील लक्षणीय मुद्दा असा की, सर्वाधिक ५१७ कोटींची रोकड व सर्वाधिक किमतीचे अंमली पदार्थ देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांच्या गृहराज्यात गुजरातमध्ये सापडली आहेत. हा बेहिशेबी इतका पैसा बरोबर निवडणुकीच्यावेळी आला किंवा निघाला कुठून, हा खरा प्रश्न आहे. नोटाबंदीच्या निर्णयाद्वारे ‘गोलमाल’ केली गेल्याचा जो आरोप काँग्रेस व मनसे आदी पक्षांकडून केला जात आहे, त्यावर विश्वास बसावा असेच हे चित्र आहे. नीती, निष्ठा पक्षकार्य वगैरे बाबी राहिल्या तोंडी लावण्यापुरत्या, ‘पैसा’ हा फॅक्टरच निवडणुकीत महत्त्वाचा ठरू पाहतो आहे, हेच यावरून स्पष्ट व्हावे. यासंदर्भातही अगदी गुजरातचेच उदाहरण देता यावे, तेथील भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूक रिंगणात उतरविलेल्या उमेदवारांपैकी अवघे पाच जण असे आहेत ज्यांची मालमत्ता एक कोटीच्या आत आहे. बाकी सर्वच्या सर्व उमेदवार कोट्यधीश आहेत. यात उमेदवारांची सांपत्तिक स्थिती हा आक्षेपाचा भाग नाही, तर सामान्य कार्यकर्ता उमेदवारीत कुठे आहे, हा खरा मुद्दा आहे.   

आर्थिक बळ असल्याखेरीज निवडणूक लढता येत नाही, हाच बोध यातून घेता येणारा आहे. परंतु पैसा हा केवळ ‘पांढरा’ असून उपयोगाचा नसतो. कारण आयोगाच्या आचारसंहितेतील मर्यादेपेक्षा अधिक खर्च दाखवता येत नसला तरी निवडणूक तेवढ्यात होत नाही. म्हणून ‘काळा’ पैसा असावा व खर्चावा लागतो हे उघड सत्य आहे. निवडणुकीच्या काळात जी कोट्यवधीची बेहिशेबी रोकड जागोजागी हस्तगत होत आहे, ती अशी ‘काळी’ म्हणवणारीच आहे. म्हणूनच, देशातील व देशाबाहेरील बँकांत असलेला काळा पैसा हुडकून आणण्याची गर्जना करीत सत्तेवर आलेल्यांचे यासंदर्भातले अपयशही यानिमित्ताने आपोआप उघड होऊन गेले आहे. अन्यथा, करप्रणाली सक्त केली गेली असताना व संबंधित यंत्रणांची डोळ्यात तेल घालून टेहळणी सुरू असताना नोटांची अशी बंडले पकडली गेली नसती.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMonkeyमाकडblack moneyब्लॅक मनीPoliticsराजकारणBJPभाजपा