शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘देवाची करणी’?

By admin | Updated: April 2, 2016 03:52 IST

धनपिपासू लोक किती संवेदनाहीन, निष्ठुर आणि उलट्या काळजाचे असतात याचे यापरते अन्य उदाहरण ते काय असू शकते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहराच्या उत्तरेकडील

धनपिपासू लोक किती संवेदनाहीन, निष्ठुर आणि उलट्या काळजाचे असतात याचे यापरते अन्य उदाहरण ते काय असू शकते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहराच्या उत्तरेकडील भागात अपूर्णावस्थेत असलेला एक उड्डाण पूल गुरुवारी भर माध्यान्ही कोसळला आणि त्यात जबर मनुष्य तसेच वित्त हानी झाली. अत्यंत गजबजलेल्या भागात या पुलाचे काम सुरु असल्याने पुलाच्या कोसळलेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली काही बसगाड्या, मोटारी आणि मालमोटारी दबल्या गेल्या व काही लोक अक्षरश: चिरडले जाऊन अनेकजण जखमी झाले. परिणामी दोन्ही प्रकारच्या हानीचा निश्चित अंदाज लगेचच येऊ शकलेला नाही. २००९साली सुरु झालेले या पुलाचे बांधकाम सात वर्षे झाली तरी अजून अपूर्णच असावे हे त्या राज्यातील आधीच्या डाव्या आघाडीच्या आणि नंतर सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारच्या कार्यक्षमतेचे द्योतकच मानले पाहिजे. आंध्र प्रदेशातील कोणा बांधकाम कंपनीला या पुलाचे काम देण्यात आले होते. साहजिकच अर्धवट अवस्थेतील पूल कोसळणे ही प्राय: त्याच कंपनीची जबाबदारी असताना तिने तत्काळ आपली जबाबदारी झटकून टाकताना जे काही घडले ते ‘अ‍ॅक्ट आॅफ गॉड’ म्हणजे देवाची करणी असल्याचे निर्लज्जपणे सांगून टाकले. ‘ओ माय गॉड’ या सिनेमामधून संबंधित ठेकेदार इतके बरीक शिकून गेला! पण केवळ या ठेकेदाराला एकट्याला तरी दोष का द्यायचा? या दुर्घटनेवरुन लगेच जी राजकीय सुंदोपसुंदी सुरु झाली ती तरी कोणती संवदनशीलतेचा प्रत्यय आणून देणारी आहे? ममतांच्या कारकिर्दीत पूल कोसळल्यामुळे डाव्या आघाडीने ममता सरकारच्या विरोधात तोफा डागल्या आणि लगेचच पुलाचे काम डाव्या आघाडीच्या सत्ताकाळात मंजूर केले गेले म्हणून तेच जबाबदार असा प्रत्त्यारोप ममतांनी केला. याबाबत त्यांनी केलेले प्रतिपादन तर मोठे औरच म्हणावे लागेल. संबंधित ठेकेदाराला सरकारने वारंवार स्मरणपत्रे देऊनदेखील त्याने शेवटपर्यंत पुलाचा आराखडा सादर केला नाही. सरकारला आणि विशेषत: ममतांनाही जो जुमानायला तयार नाही त्याला इतके दिवस त्यांनी जे सहन केले त्याची किंमत अकारण काही निष्पापांना मात्र चुकवावी लागली.