शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

देरसे, पर दुरुस्त नही

By admin | Updated: October 15, 2015 23:12 IST

राजधानी दिल्लीजवळील दादरी येथील एका मुस्लिम कुटुंबावर केवळ अफवेच्या आधारे झालेल्या हल्ल्यावर आणि इखलाक नावाच्या निरपराधाच्या हत्त्येवर पंतप्रधान या नात्याने नरेन्द्र मोदी प्रतिक्रिया देण्याचे टाळत

राजधानी दिल्लीजवळील दादरी येथील एका मुस्लिम कुटुंबावर केवळ अफवेच्या आधारे झालेल्या हल्ल्यावर आणि इखलाक नावाच्या निरपराधाच्या हत्त्येवर पंतप्रधान या नात्याने नरेन्द्र मोदी प्रतिक्रिया देण्याचे टाळत असल्याबद्दल जी मंडळी टीका करीत होती, तीच मंडळी आता मोदींचे मौन त्यांच्या मौनभंगापेक्षा बरे होते, असे म्हणू लागली आहेत. थोडक्यात ‘पीएम देरसे आये, पर दुरुस्त न आये’ असाच या प्रतिक्रियेचा अर्थ होतो आणि तो रास्तच आहे. बंगालीतील एका छोट्या नियतकालिकाला मुलाखत देताना त्यांनी दादरी तसेच मुंबईतील (गुलाम अली व सुधीन्द्र कुळकर्णी प्रकरण) प्रकार दुर्दैवी असल्याची खंत तर व्यक्त केली पण या दोन्ही प्रकारांचा केन्द्र सरकारशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. याबाबत देशातील एक नाणावलेले विधिज्ञ सोली सोराबजी यांनी पंतप्रधानांना दोन समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. १९७५ साली जेव्हां इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी लादून नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला, तेव्हां त्यांनी तत्काळ अतिरिक्त सॉलिसीटर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पंतप्रधानांना काही सल्ला देण्याचा त्यांचा नैतिक अधिकार मोदींनाही मान्य व्हावा. केवळ खंत वा खेद व्यक्त करुन काहीही साध्य होणार नसून मोदींनी कठोर शब्दात झाल्या प्रकारांचा निषेध व्यक्त करुन आवश्यक तो संदेश देणे गरजेचे असल्याचे सोराबजी यांनी म्हटले आहे. ज्या साहित्यिकांनी आपापले पुरस्कार परत केले आहेत त्यांच्या या निषेधात्मक कृतीचा रोख सरकारच्या नव्हे तर साहित्य अकादमीच्या दिशेने आहे, कारण अकादमी झाल्या प्रकारांबद्दल मूक राहिली असेही त्यांना वाटते. सोराबजी यांनी सल्ला देताना पंतप्रधानांनी कठोर उक्तीचा वापर करावा असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात आज देशाला कठोर उक्तीची नव्हे तर कठोर कृतीची अपेक्षा आहे. दिल्ली मुंबई असो की देशातील कोणतेही गाव-शहर असो, तिथे घडणाऱ्या अनुचित प्रकारांची जबाबदारी देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांना स्वीकारावीच लागते. त्यातून सध्याचे देशातील आणि महाराष्ट्रातीलही सरकार हिन्दुत्ववाद्यांचे आहे व दिल्ली आणि मुंबईतील अनुचित प्रकारांमागे तथाकथित हिन्दुत्ववाद्यांचाच सहभाग आहे. मोदी काहीच बोलत नाहीव वा करीत नाहीत म्हणून ही मंडळी अधिकाधिक चेकाळल्यागत करु लागली आहेत.