शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
2
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
3
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
4
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
5
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
6
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
7
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
8
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
9
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
10
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
11
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
12
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
13
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
14
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
15
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
16
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
17
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
18
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
19
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
20
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
Daily Top 2Weekly Top 5

देरसे, पर दुरुस्त नही

By admin | Updated: October 15, 2015 23:12 IST

राजधानी दिल्लीजवळील दादरी येथील एका मुस्लिम कुटुंबावर केवळ अफवेच्या आधारे झालेल्या हल्ल्यावर आणि इखलाक नावाच्या निरपराधाच्या हत्त्येवर पंतप्रधान या नात्याने नरेन्द्र मोदी प्रतिक्रिया देण्याचे टाळत

राजधानी दिल्लीजवळील दादरी येथील एका मुस्लिम कुटुंबावर केवळ अफवेच्या आधारे झालेल्या हल्ल्यावर आणि इखलाक नावाच्या निरपराधाच्या हत्त्येवर पंतप्रधान या नात्याने नरेन्द्र मोदी प्रतिक्रिया देण्याचे टाळत असल्याबद्दल जी मंडळी टीका करीत होती, तीच मंडळी आता मोदींचे मौन त्यांच्या मौनभंगापेक्षा बरे होते, असे म्हणू लागली आहेत. थोडक्यात ‘पीएम देरसे आये, पर दुरुस्त न आये’ असाच या प्रतिक्रियेचा अर्थ होतो आणि तो रास्तच आहे. बंगालीतील एका छोट्या नियतकालिकाला मुलाखत देताना त्यांनी दादरी तसेच मुंबईतील (गुलाम अली व सुधीन्द्र कुळकर्णी प्रकरण) प्रकार दुर्दैवी असल्याची खंत तर व्यक्त केली पण या दोन्ही प्रकारांचा केन्द्र सरकारशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. याबाबत देशातील एक नाणावलेले विधिज्ञ सोली सोराबजी यांनी पंतप्रधानांना दोन समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. १९७५ साली जेव्हां इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी लादून नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला, तेव्हां त्यांनी तत्काळ अतिरिक्त सॉलिसीटर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पंतप्रधानांना काही सल्ला देण्याचा त्यांचा नैतिक अधिकार मोदींनाही मान्य व्हावा. केवळ खंत वा खेद व्यक्त करुन काहीही साध्य होणार नसून मोदींनी कठोर शब्दात झाल्या प्रकारांचा निषेध व्यक्त करुन आवश्यक तो संदेश देणे गरजेचे असल्याचे सोराबजी यांनी म्हटले आहे. ज्या साहित्यिकांनी आपापले पुरस्कार परत केले आहेत त्यांच्या या निषेधात्मक कृतीचा रोख सरकारच्या नव्हे तर साहित्य अकादमीच्या दिशेने आहे, कारण अकादमी झाल्या प्रकारांबद्दल मूक राहिली असेही त्यांना वाटते. सोराबजी यांनी सल्ला देताना पंतप्रधानांनी कठोर उक्तीचा वापर करावा असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात आज देशाला कठोर उक्तीची नव्हे तर कठोर कृतीची अपेक्षा आहे. दिल्ली मुंबई असो की देशातील कोणतेही गाव-शहर असो, तिथे घडणाऱ्या अनुचित प्रकारांची जबाबदारी देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांना स्वीकारावीच लागते. त्यातून सध्याचे देशातील आणि महाराष्ट्रातीलही सरकार हिन्दुत्ववाद्यांचे आहे व दिल्ली आणि मुंबईतील अनुचित प्रकारांमागे तथाकथित हिन्दुत्ववाद्यांचाच सहभाग आहे. मोदी काहीच बोलत नाहीव वा करीत नाहीत म्हणून ही मंडळी अधिकाधिक चेकाळल्यागत करु लागली आहेत.