शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

देरसे, पर दुरुस्त नही

By admin | Updated: October 15, 2015 23:12 IST

राजधानी दिल्लीजवळील दादरी येथील एका मुस्लिम कुटुंबावर केवळ अफवेच्या आधारे झालेल्या हल्ल्यावर आणि इखलाक नावाच्या निरपराधाच्या हत्त्येवर पंतप्रधान या नात्याने नरेन्द्र मोदी प्रतिक्रिया देण्याचे टाळत

राजधानी दिल्लीजवळील दादरी येथील एका मुस्लिम कुटुंबावर केवळ अफवेच्या आधारे झालेल्या हल्ल्यावर आणि इखलाक नावाच्या निरपराधाच्या हत्त्येवर पंतप्रधान या नात्याने नरेन्द्र मोदी प्रतिक्रिया देण्याचे टाळत असल्याबद्दल जी मंडळी टीका करीत होती, तीच मंडळी आता मोदींचे मौन त्यांच्या मौनभंगापेक्षा बरे होते, असे म्हणू लागली आहेत. थोडक्यात ‘पीएम देरसे आये, पर दुरुस्त न आये’ असाच या प्रतिक्रियेचा अर्थ होतो आणि तो रास्तच आहे. बंगालीतील एका छोट्या नियतकालिकाला मुलाखत देताना त्यांनी दादरी तसेच मुंबईतील (गुलाम अली व सुधीन्द्र कुळकर्णी प्रकरण) प्रकार दुर्दैवी असल्याची खंत तर व्यक्त केली पण या दोन्ही प्रकारांचा केन्द्र सरकारशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. याबाबत देशातील एक नाणावलेले विधिज्ञ सोली सोराबजी यांनी पंतप्रधानांना दोन समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. १९७५ साली जेव्हां इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी लादून नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला, तेव्हां त्यांनी तत्काळ अतिरिक्त सॉलिसीटर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पंतप्रधानांना काही सल्ला देण्याचा त्यांचा नैतिक अधिकार मोदींनाही मान्य व्हावा. केवळ खंत वा खेद व्यक्त करुन काहीही साध्य होणार नसून मोदींनी कठोर शब्दात झाल्या प्रकारांचा निषेध व्यक्त करुन आवश्यक तो संदेश देणे गरजेचे असल्याचे सोराबजी यांनी म्हटले आहे. ज्या साहित्यिकांनी आपापले पुरस्कार परत केले आहेत त्यांच्या या निषेधात्मक कृतीचा रोख सरकारच्या नव्हे तर साहित्य अकादमीच्या दिशेने आहे, कारण अकादमी झाल्या प्रकारांबद्दल मूक राहिली असेही त्यांना वाटते. सोराबजी यांनी सल्ला देताना पंतप्रधानांनी कठोर उक्तीचा वापर करावा असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात आज देशाला कठोर उक्तीची नव्हे तर कठोर कृतीची अपेक्षा आहे. दिल्ली मुंबई असो की देशातील कोणतेही गाव-शहर असो, तिथे घडणाऱ्या अनुचित प्रकारांची जबाबदारी देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांना स्वीकारावीच लागते. त्यातून सध्याचे देशातील आणि महाराष्ट्रातीलही सरकार हिन्दुत्ववाद्यांचे आहे व दिल्ली आणि मुंबईतील अनुचित प्रकारांमागे तथाकथित हिन्दुत्ववाद्यांचाच सहभाग आहे. मोदी काहीच बोलत नाहीव वा करीत नाहीत म्हणून ही मंडळी अधिकाधिक चेकाळल्यागत करु लागली आहेत.