शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

झारखंडचा दणका, भाजपाचे एक एक राज्य गळावया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 05:54 IST

‘एक एक पान गळावया’प्रमाणे एक एक राज्य गळावया अशी भाजपची स्थिती झाली आहे

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनामुळे आदिवासीबहुल झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांकडे फारसे कोणाचे लक्ष गेलेच नव्हते. देशात जोरदार आंदोलन सुरू असताना आणि त्याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा झारखंडमध्ये जाहीर सभा घेत होते. त्या दोघांच्या मिळून तिथे १८ सभा झाल्या. तरीही झारखंडमधील जनतेने भाजपला सत्तेतून बाहेर घालवले. तिथे झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीचे सरकार येणार आणि झामुमोचे नेते हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे. एकूण ८१ सदस्य असलेल्या झारखंडच्या विधानसभेत या आघाडीने ४७ हून अधिक जागा मिळविल्या आहेत. सकाळी मतमोजणीचे कल येत असतानाही पुन्हा आम्हीच सत्तेवर येऊ, असा दावा भाजप नेते करीत होते. त्यासाठी तेथील अन्य पक्ष व अपक्ष यांच्याशी संपर्क साधायलाही भाजपने सुरुवातही केली होती. म्हणजे येनेकेन प्रकारे सरकार स्थापन करायचाच, असा भाजपचा प्रयत्न सुरू होता. पण भाजपला स्वत:लाच इतक्या कमी जागा मिळाल्या की, इतरांचा पाठिंबा मिळाला तरी सरकार स्थापन करता येणे अशक्य आहे.

‘एक एक पान गळावया’प्रमाणे एक एक राज्य गळावया अशी भाजपची स्थिती झाली आहे. गेल्या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड ही राज्ये भाजपने गमावली. त्याआधी अकाली दल-भाजप युती असलेल्या पंजाबमध्ये पराभव झाला. कर्नाटकची सत्ताही भाजपने तोडफोड करून मिळवली. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने काडीमोड दिला. तरीही भाजपने सरकार स्थापन केले. पण अवघ्या काही तासांतच देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की आली. हरयाणातही बहुमत न मिळाल्याने दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाला हाताशी धरून भाजपच्या मनोहरलाल खट्टर यांनी सरकार बनविले. त्यानंतर आता झारखंड हातातून गेले. तिथे पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला २५ जागा मिळवता आल्या आहेत. गेल्या वेळीही स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने आॅल झारखंड स्टुडंट्स युनियनची मदत घेऊन सरकार स्थापन केले. पण रघुबर दास यांना मुख्यमंत्री केले आणि आदिवासींची नाराजी ओढवून घेतली. या वेळी तर त्या दोन पक्षांत जागावाटप झाले नाही आणि त्याचा फटका दोघांनाही बसला. २0१४ च्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा १२ ने कमी झाल्या. प्रश्न एखादे राज्य हातातून गेले हा नसून, एकापाठोपाठ एक राज्यात पराभव का होत आहे, याचे चिंतन भाजपला आता करायला लागणार आहे. केवळ प्रसिद्धी माध्यमांतून स्वत:चा डिंडिम वाजवून आणि चुकांचे समर्थन करून चालणार नाही. भाजपकडून गेलेली उत्तरेकडील असून, ती आतापर्यंत भाजपचा किल्ला होती. कर्नाटक वगळले, तर भाजप दक्षिणेकडे नाही. ईशान्येकडेही प्रादेशिक पक्षांचीच सरकारे असून, भाजप त्यांच्यासमवेत आहे एवढेच.

केंद्रात सत्तेत असलेल्याशी जुळवून घेतात. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासमवेत भाजप आहे. ती भाजपची सत्ता नव्हे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, भाजपकडे आहेत. गुजरातमध्येही भाजपची लोकप्रियता कमी झाल्याचे दाखवून दिले. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे २0१४ पासून विजयाची पताका फडकावणारा भाजप ही अवस्था कशामुळे होत आहे, याचे चिंतन करणार की भावनात्मक मुद्द्यांच्या आधारे राजकारण करीत राहणार? नागरिकत्व नोंदणी, सुधारित नागरिकत्व कायदा यांमुळे सर्वत्र नाराजी आहे. जनतेला रोजगारनिर्मिती, उद्योगधंद्यांत वाढ, विकास, सुदृढ अर्थव्यवस्था हे विषय महत्त्वाचे वाटतात. मागास झारखंडमधील लोकांना आर्थिक प्रश्न तर अधिकच भेडसावतात. हे प्रश्न न सुटल्याने तेथील मतदारांनी भाजपच्या विरोधात कौल दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भाजपला आपला अजेंडा बदलावा लागेल. अनेक नेत्यांना गुर्मी बंद करावी लागेल. अन्यथा काही राज्यांत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांतही पुन्हा हेच घडेल.
हातातील एक एक राज्य भाजपने गमवायला सुरुवात केली आहे. झारखंड हे त्यापैकी पाचवे राज्य असले तरी आपला बालेकिल्ला असलेल्या उत्तर भारतातच भाजपचा पराभव होत आहे. भाजपच्या लोकप्रियतेला लागलेली ही ओहोटी तर नव्हे?

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी