शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

जयनंतर नामदेव आणि आता श्रीनिवासही...

By admin | Updated: May 3, 2017 00:26 IST

जय गेला, नामदेव हरवला आणि आता श्रीनिवासचेही प्रेत जमिनीत पुरलेले आढळले. महाराष्ट्राचे सरकार वाघांचा जीव राखू शकत नाही हे या तीन नामांकित व ताडोबाच्या व्याघ्र

जय गेला, नामदेव हरवला आणि आता श्रीनिवासचेही प्रेत जमिनीत पुरलेले आढळले. महाराष्ट्राचे सरकार वाघांचा जीव राखू शकत नाही हे या तीन नामांकित व ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकात लोकप्रिय झालेल्या दिमाखदार व देखण्या जिवांच्या हत्येतून देशाला कळले आहे. जय हा वाघ त्याची पूर्ण वाढ झालेला आणि पर्यटकांना ठरवून भेटावा तसा भेटणारा होता. त्याच्या चालीत राजाचा डौल होता आणि त्याचे दर्शन पाहणाऱ्याला नम्र करणारे होते. तो दिसेनासा झाला तेव्हा त्याच्या तपासाची फार नाटके वनखात्याने केली. त्यासाठी त्या विभागाचे अधिकारी सरकारी खर्चाने ठिकठिकाणी प्रवास करून आले. पुढे तो दिसल्याचे कधी सांगितले गेले तर कधी जो दिसला तो तोच होता किंवा नाही अशी शंका पुढे केली गेली. आता जयची चर्चा संपली आहे. नामदेव हा जयएवढाच दिमाखदार वाघही पर्यटकांच्या प्रेमाचा विषय होता. पाहणाऱ्यांनी काढलेली त्याची छायाचित्रे अनेक घरात आता लागली आहेत. तोही अलीकडेच बेपत्ता झाला आणि त्याचाही कुणाला आजवर पत्ता लागला नाही. नंतरची गोष्ट श्रीनिवासची. तो जयचाच बच्चा होता असे सांगितले जात होते. त्याचेही देखणेपण बापासारखेच ऐटदार होते. तो हरवला आणि त्याचे शवच मातीत पुरलेले परवा सापडले. गेल्या एक वर्षात दीड डझनाएवढे वाघ वा त्याची पिले अशी मारली गेली वा मेलेली आढळली. जगाच्या बाजारात जिवंत वा मृत वाघाची किंमत २० लाखांहून अधिक आहे. अनेक धनवंत शौकिनांना वाघ पाळायचे असतात तर काही चोरट्यांना त्यांचा बळी घेऊन त्यांचे अवयव चीनपर्यंतच्या बाजारात पोहचवायचे असतात. त्यातून एवढे बहुमोल जनावर साधे एन्ड्रीन पाजून मारता येते. वाघाने केलेल्या शिकारीच्या तुकड्यावर एन्ड्रीन नुसते टाकले तरी ते तुकडे पुन्हा खायला येणारे ते जनावर मरून पडते. जंगले लहान झाली आणि त्यावरचे माणसांचे अतिक्रमण वाढत चालले. एका वाघाला स्वतंत्रपणे जगायला किमान ५० चौ. कि.मी.चा अरण्य परिसर लागतो. तो त्यांना मिळत नाही. उन्हाळ्यात जंगलातले पाणी संपते. मग पाण्याच्या शोधात गावात येणारे अनेक वाघ अन् बिबटे विहिरीत पडून मेलेले आढळतात. सरकार हतबल आहे आणि वनखातेही दुबळे आहे. त्यांनी ठेवलेले वन्यजीवांचे रक्षकही त्यांच्यावर कुठपर्यंत लक्ष देतात, हाही विचारावा असा प्रश्न आहे. गळ्यात इलेक्ट्रॉनिक कॉलर अडकविलेले वाघ जमिनीत पुरलेले सापडत असतील तर ती यंत्रणाही निकामीच समजली पाहिजे. आताचा प्रश्न वाघ व अन्य वन्यजीव सांभाळायला जनतेची मदत घेण्याचा आहे. काही काळापूर्वी याविषयी भरलेल्या एका राष्ट्रीय परिषदेत तो उपस्थितही झाला होता. पण वनअधिकाऱ्यांच्या हट्टीपणापायी तो तसाच अपुरा राहिला. जे उद्योगपती व धनवंत वाघ पोसू शकतात त्यांना तसा परवाना आता देणे गरजेचे आहे. वाघासारखे जनावर पाण्यावाचून वा एन्ड्रीन पाजून मेलेले पाहण्याहून तसे करणे अधिक योग्य ठरणार आहे. शिवाय कुणाच्या बागेत वा खासगी व्यवस्थेत राहिल्याने वाघ त्याचा स्वभाव वा प्रवृत्ती बदलतही नाही. अस्वले पोसणारी माणसे देशात आहेत. अशा माणसांची छायाचित्र अनेक नियतकालिकांनी याआधी प्रकाशितही केली आहेत. अशा माणसांजवळची अस्वले वनखात्याने जप्त करताच ती मृत्यू पावल्याचेही प्रकाशित झाले आहे. राजस्थानात हरणांना व मोरांना घरात वाढविण्याची मुभा आहे. प्रकाश आमटे यांना वन्यजीवांचे चांगले पोषण केल्याबद्दल पद्म पुरस्कार दिला गेला आहे. मुंबईतील एका सिनेनटाकडे असलेले वाघ वनखात्याने जप्त करून नेले तेव्हा ते वाटेतच मरण पावल्याची कथा याविषयीच्या नोंदीत आहे. ज्या माणसांना वन्यप्राणी बाळगण्याचे परवाने दिले जावेत, त्यांच्यावर सरकारला कडक पाळत ठेवता येणेही शक्य आहे. त्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी कृत्रिम रेतनाचा उपायही करता येणारा आहे. जंगले संपली तर जंगलातले हे देखणे रहिवासी कुठे जाणार आणि कसे? त्यांच्याही पुनर्वसनाचा विचार आपण गंभीरपणे करायचा की नाही? डॉ. मनमोहनसिंग हे देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी वाघांच्या रक्षणाचा व त्यांच्या वाढीचा प्रश्न गंभीरपणे हाती घेऊन त्यासाठी एक यंत्रणाही उभी केली होती. ती सध्या काय करते? जी गोष्ट सरकारला करता येत नाही ती करायला खासगी यंत्रणा हाताशी धरण्याची सोय फक्त औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे काय? सरकारच्या अख्त्यारितील अनेक कामे व योजना खासगी यंत्रणांच्या स्वाधीन करण्याचा आताचा काळ आहे. या काळात वन्यजीवांचे रक्षण करण्याची जबाबदारीही या यंत्रणांवर वा व्यक्तींवर सोपविता येणे शक्य आहे. वन्यजीव ही देशाची शोभा आहे आणि वाघ वा सिंह हे त्याचे देखणे अलंकार आहे. ते जपायला सर्वतऱ्हेच्या सरकारी, खासगी वा स्वायत्त यंत्रणा कामाला लावणे ही आजची गरज आहे. नाही तर जयपाठोपाठ नामदेव जाणार आणि त्याच्यामागे श्रीनिवासही मातीत गाडलेला पाहावा लागणार. जबाबदारी मोठी आहे व म्हणूनच ती अनेकांनी एकत्र येऊन आपल्या खांद्यावर घेणे आवश्यक आहे.