शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

सार्वजनिक क्षेत्रातील बँका भक्कम नसून कसे चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 07:40 IST

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री  भागवत कराड यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बँका, तसेच नाबार्डचे चेअरमन यांची एक विशेष बैठक औरंगाबाद येथे आज होत आहे, त्यानिमित्त.

देवीदास तुळजापूरकर

भारतीय बँकिंग व्यवस्था १५० लाख कोटी रुपयांच्या ठेवी हाताळते. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधल्या ठेवी आहेत १०१ लाख कोटी रुपये. ही समाजाची बचत आहे.  तिचा विनियोग समाजाच्या भल्यासाठी केला गेला पाहिजे या भूमिकेतून शेती, स्वयंरोजगार, लघु उद्योग, शैक्षणिक कर्ज,  छोटी गृहकर्जे इत्यादी क्षेत्रांना देण्यात येणाऱ्या कर्जांना सरकार, तसेच रिझर्व्ह बँकेने प्राथमिकता दिली आणि त्यातूनच प्राथमिकता क्षेत्र आणि ४० टक्के कर्ज वाटपाचे निर्बंध आले.  याचा अर्थ  नफ्याच्या परिभाषेत या क्षेत्रांना वाटलेली कर्जे बँकांना आकर्षक वाटली नाहीत तरी ती सामाजिक बांधिलकीच्या भावनेने वाटली पाहिजेत, कारण यात समाजाचं भलं आहे.

या बँका सामान्य माणसांनी घाम गाळून जमा केलेली बचत तर सांभाळतातच; पण त्यांनी ग्रामीण, मागास भागात बँकिंग नेले.  विद्यमान सरकारने वित्तीय समावेशकतेचा जनधन हा प्रकल्प हाती घेतला  आणि प्राथमिकतेने तो अमलात आणला.  त्यातून बँकिंग आता सर्वदूर, समाजातील सर्व घटकांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.  यामुळे सामान्य माणसाची बचत बँकिंग व्यवस्थेत आली. ती राष्ट्राच्या  विकासासाठी साधनसामग्री बनली.  यातून शेतीला प्राथमिकतेने कर्ज दिले जाऊ लागले. सकल घरेलू उत्पादनात शेतीचा वाटा जरी १८ टक्के एवढा असला तरी शेती आणि पूरक उद्योगांवर देशातील पन्नास टक्के जनजीवनाची उपजीविका अवलंबून आहे. 

गेल्या पन्नास वर्षांत प्रत्येक सरकारने  स्वयंरोजगार योजना बँकांमार्फत राबविल्या. सध्याची मुद्रा योजना ही त्यातीलच!  असे उपक्रम नसते, तर बँकांनी सुशिक्षित बेरोजगारांना सढळ हाताने अशी कर्जे दिली असती का? या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक जटिल प्रश्न आहेत, तरीही स्वयंरोजगारनिर्मितीत सार्वजनिक क्षेत्रातील बँका बजावत असलेली भूमिका महत्त्वाची आहे. या बँकांतर्फे देण्यात येणारे शैक्षणिक कर्ज अनेकांचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगविण्यात मदतगार ठरले आहे.  मध्यमवर्गीयांचे स्वतःचे घर हे स्वप्न पूर्ण करण्यात या बँकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.

या बँकांना आता सामाजिक सुरक्षिततेच्या विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीक विमा योजना, अनुदानाचे वाटप, पगार, पेन्शन एवढेच काय रोजगार हमीवरील मजुरीचे वाटप अशा अनेक भूमिका दिल्या आहेत. सरकारने राबविलेली निश्चलनीकरण योजना असो, की जीएसटी, की कोरोना काळातील मदतकर्जाची योजना.. या बँकांतील कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करून  महामारीच्या काळात काम केले आहे, त्याला तोड नाही!

सामाजिक नफा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत  असताना या बँका आकड्यांच्या परिभाषेतील नफाही कमावत आहेत. मोठ्या उद्योगांना वाटलेल्या मोठाल्या थकीत कर्जांपोटी या बँकांना तरतूद करावी लागल्याने या बँका तोट्यात गेल्या होत्या; पण अवघ्या तीन वर्षांत यातील बहुतांश बँकांनी तो टप्पा ओलांडून आता घसघशीत नफा मिळविण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या तीन वर्षांत सामिलीकरणाच्या प्रक्रियेत बँकांच्या हजारो शाखा बंद करण्यात आल्या.  यात ग्रामीण भागातील शाखांचा आकडा मोठा आहे. डिजिटल बँकिंग हवे; पण त्यासाठी सर्वदूर विजेचा नियमित पुरवठा व्हावा आणि दळणवळण यंत्रणा सक्षम हवी. याच्या अनुपस्थितीत हे शक्य आहे काय,  तसेच सामान्य जनता आर्थिकदृष्ट्या पुरेशी साक्षर हवी. यासाठी सरकारला, बँकांना आपापसात समन्वय ठेवून यावर मोठी गुंतवणूक करावी लागेल. 

या सर्व पार्श्वभूमीवर अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या पुढाकाराने आयोजित औरंगाबाद येथील बैठकीला  अनन्यसाधारण महत्त्व आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संभाव्य खाजगीकरणाची टांगती तलवार आणि यातून येणारी अनिश्चितता याचे सावट या बैठकीवर असेलच! सामाजिक नफा आणि सामान्यांचे हित एकत्रितरीत्या पुढे नेणे ही एक मोठी कसरतच आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र