शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

इतिहासाची पाने...बोफोर्सच्या तोफगोळ्याने काँग्रेसचे बळ घटले...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 05:50 IST

इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या सहानुभूतीने काँग्रेस पक्षाला आठव्या लोकसभेत प्रचंड बहुमत मिळाले होते. राजीव गांधी यांच्या रूपाने चाळीस वर्षांचे तरुण-तडफदार पंतप्रधान देशाला लाभले होते.

- वसंत भोसलेइंदिरा गांधी यांच्या हत्येच्या सहानुभूतीने काँग्रेस पक्षाला आठव्या लोकसभेत प्रचंड बहुमत मिळाले होते. राजीव गांधी यांच्या रूपाने चाळीस वर्षांचे तरुण-तडफदार पंतप्रधान देशाला लाभले होते. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत देशाच्या विकासाला नवे वळण देण्याचा प्रयत्न सुरू केला. दळणवळणाच्या सुविधांमध्ये क्रांतिकारक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. संगणकांच्या वापराने नवी क्रांती उदयाला येऊ लागली. पंचायत राज्य व्यवस्थेत बदल करण्यात आले. महिलांना या संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रासह काही राज्यांनी हा निर्णय आधीच घेतला होता. राजीव गांधी यांनी एका नव्या भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या अनेक संकल्पनांना विरोध करण्यात येऊ लागला. विशेषत: प्रशासन, बँकिंग, विमा कंपन्या आदींमध्ये संगणकांचा वापर करण्यावरून विरोध वाढत होता. बेरोजगारी वाढीस लागेल, असा आक्षेप घेण्यात येऊ लागला. याच काळात तीन महत्त्वाच्या विषयांनी देशाचे राजकारण ढवळून निघण्याची स्थिती निर्माण झाली.सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो प्रकरणात मुस्लीम महिलेला पोटगी देण्याचा निर्णय दिला. याला मुस्लीम समाजाने विरोध करताच राजीव गांधी यांनी कायद्यात बदल करून हा पोटगीचा हक्क नाकारण्याचा निर्णय घेतला. यावरून धार्मिक धुव्रीकरणास प्रारंभ झाला. भाजपाने याच काळात अयोध्येतील राममंदिराचा विषय लावून धरण्याचा निर्णय घेतला. त्यावरही तोडगा काढण्यासाठी अयोध्येतील वादग्रस्त वास्तुतील रामाच्या मूर्ती ठेवलेल्या जागेचे दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरूनही बरीच उलटसुलट चर्चा झाली. तिसरा विषय लष्करासाठी बोफोर्स कंपनीच्या तोफा खरेदी करताना दलाली दिल्या=घेतल्याचा आरोप झाला. याच्या चौकशीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आग्रह धरला. संसदीय चौकशी समिती नेमण्यात आली. तिची चौकशी होत असतानाच अर्थमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बोफोर्सप्रकरणी संशय आणखी बळावला. शाहबानो प्रकरणी केंद्रीय मंत्री अरिफ मोहम्मद खान यांनी राजीनामा देऊन बंड केलेच होते. अशा एका मागून एक संकटांच्या मालिकाच राजीव गांधी यांच्यासमोर उभ्या राहू लागल्या.वास्तविक नव्या विचाराने आणि प्रशासनात आमूलाग्र बदल करण्याचा आग्रह धरणारे राजीव गांधी देशाला एक नवी ओळख निर्माण करून देत होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरही त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून पंजाबप्रश्नी लोंगोवाल करार, आसामच्या समस्येवर करार, मिझोरामच्या प्रश्नावर चर्चा, श्रीलंकेतील यादवी युद्धात शांतीसेनेद्वारा थेट सहभाग घेऊन लष्करी मदतीचा हात, आदी महत्त्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतले. संसदेत त्यांना प्रचंड बहुमत तर होतेच, त्याचबरोबर त्यांची एक नवा चेहरा म्हणून लोकप्रियताही खूप होती.या सर्वाला बोफोर्सच्या दलालीच्या आरोपाने गालबोट लागले. त्याचा विरोधकांनी इतका प्रचार केला की, सामान्य माणूसही काही गैर झाले असले तर ‘काही तरी बोफोर्स आहे’ असेच म्हणू लागला. भाजपाने राम मंदिर व शाहबानो प्रकरणावरून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरू केलाच होता. अशा पार्श्वभूमीवर झालेल्या नवव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. १९८४ मध्ये ४१४ जागा जिंकणाऱ्या या पक्षाला २१७ जागा गमवाव्या लागल्या. केवळ १९७ जागांवर विजय मिळवून कॉँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला; पण बहुमतासाठी कोणीही मदत केली नाही. भाजपा आणि जनता दलाने अनेक ठिकाणी सहकार्याने निवडणुका लढवून अनुक्रमे ८५ आणि १४३ जागा जिंकल्या. जनता दलास भाजपाने तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला. त्या पक्षाला ३३ जागा मिळाल्या होत्या. बारा जागा मिळालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सरकारमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला. डावे व उजवे यांच्या पाठिंब्यावर विश्वनाथ प्रताप सिंग या काँग्रेसच्या बंडखोर नेत्याच्या नेतृत्वाखाली २ डिसेंबर १९८९ रोजी सरकार स्थापन झाले.उद्याच्या अंकात ।जनता दलातील भांडणातून पुन्हा एकदा अस्थिरता

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक