शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
7
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
8
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
9
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
10
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
11
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
12
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
13
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
14
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
15
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
16
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
17
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
18
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
19
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
20
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांची मग्रुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:27 IST

मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत असलेला कास्तकार यंदाही पाऊस दगा देतो की काय, या विवंचनेत अडकला असताना राष्ट्रीयीकृत बँकाही त्याला पीक कर्जासाठी ताटकळत ठेवत आहे.

मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत असलेला कास्तकार यंदाही पाऊस दगा देतो की काय, या विवंचनेत अडकला असताना राष्ट्रीयीकृत बँकाही त्याला पीक कर्जासाठी ताटकळत ठेवत आहे. बँक व्यवस्थापनाकडून होणारा त्रास आणि पावसाच्या हुलकावणीमुळे तो पुरता खचला आहे. शासनाचे स्पष्ट निर्देश असताना काही राष्ट्रीयीकृत बँका कर्जासाठी टोलवाटोलवी करीत आहेत. ज्या राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यानंतरही जर या बँका जुमानत नसतील तर केंद्र शासनाला यात हस्तक्षेप करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. परवा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी तर याच कारणामुळे आपले खासदार विकास निधीचे खातेच दुसºया बँकेत वळते केले.शिवाय ज्या बँका शेतकºयांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा बँकांमधून शासकीय-निमशासकीय यंत्रणेचे शासकीय जमा खाते काढून ज्या बँका पीक कर्जासंदर्भात चांगली कामगिरी करीत आहेत, अशा बँकेमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले. तरीदेखील राष्ट्रीयीकृत बँकांची मग्रुरी कायम असल्याचे जाणवते. अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांनीही एसबीआयला दणका देत हीच भूमिका घेतली. वारंवार निर्देश दिल्यानंतरही पीक कर्ज वाटपात नकारात्मक धोरण आणि मंदगती असल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सात विभागांची एसबीआय शाखेत असलेली खातीच बंद केली. यवतमाळ जिल्हाधिकारीही त्याच पवित्र्यात आहेत. अर्थात प्रशासन कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी सकारात्मक पाऊल उचलत असताना बँका मात्र अडेलतट्टू धोरण राबवीत आहे. त्यामुळे शेतकºयांची पीक कर्जासाठी सुरू असलेली धावपळ अद्याप थांबलेली नाही. कर्जमाफी योजनेंतर्गत ज्यांचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे, अशा काही शेतकºयांना वगळता इतरांना आजही बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात तर आतापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. शेतकरी कर्जाची परतफेड करीत नाही, असा पूर्वग्रह असल्याने बँक अधिकारी त्यांना कर्ज देण्यास नकार देतात. नाहरकत प्रमाणपत्र मागू नये, असे निर्देश असताना कास्तकाराला नाहरकत प्रमाणपत्राची अट घातली जाते. कर्जासाठी वेगवेगळी कागदपत्रे मागितली जातात. शेवटी वैतागून कास्तकार अवैध सावकाराकडे जातो. कर्जाचा डोंगर वाढला की आत्महत्या करतो. पीक कर्जाची ही समस्या दरवर्षी त्याच्यापुढे आ वासून असते. मात्र शासन काही ठोस तोडगा काढत नाही.