शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

राष्ट्रीयीकृत बँकांची मग्रुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:27 IST

मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत असलेला कास्तकार यंदाही पाऊस दगा देतो की काय, या विवंचनेत अडकला असताना राष्ट्रीयीकृत बँकाही त्याला पीक कर्जासाठी ताटकळत ठेवत आहे.

मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत असलेला कास्तकार यंदाही पाऊस दगा देतो की काय, या विवंचनेत अडकला असताना राष्ट्रीयीकृत बँकाही त्याला पीक कर्जासाठी ताटकळत ठेवत आहे. बँक व्यवस्थापनाकडून होणारा त्रास आणि पावसाच्या हुलकावणीमुळे तो पुरता खचला आहे. शासनाचे स्पष्ट निर्देश असताना काही राष्ट्रीयीकृत बँका कर्जासाठी टोलवाटोलवी करीत आहेत. ज्या राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यानंतरही जर या बँका जुमानत नसतील तर केंद्र शासनाला यात हस्तक्षेप करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. परवा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी तर याच कारणामुळे आपले खासदार विकास निधीचे खातेच दुसºया बँकेत वळते केले.शिवाय ज्या बँका शेतकºयांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा बँकांमधून शासकीय-निमशासकीय यंत्रणेचे शासकीय जमा खाते काढून ज्या बँका पीक कर्जासंदर्भात चांगली कामगिरी करीत आहेत, अशा बँकेमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले. तरीदेखील राष्ट्रीयीकृत बँकांची मग्रुरी कायम असल्याचे जाणवते. अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांनीही एसबीआयला दणका देत हीच भूमिका घेतली. वारंवार निर्देश दिल्यानंतरही पीक कर्ज वाटपात नकारात्मक धोरण आणि मंदगती असल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सात विभागांची एसबीआय शाखेत असलेली खातीच बंद केली. यवतमाळ जिल्हाधिकारीही त्याच पवित्र्यात आहेत. अर्थात प्रशासन कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी सकारात्मक पाऊल उचलत असताना बँका मात्र अडेलतट्टू धोरण राबवीत आहे. त्यामुळे शेतकºयांची पीक कर्जासाठी सुरू असलेली धावपळ अद्याप थांबलेली नाही. कर्जमाफी योजनेंतर्गत ज्यांचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे, अशा काही शेतकºयांना वगळता इतरांना आजही बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात तर आतापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. शेतकरी कर्जाची परतफेड करीत नाही, असा पूर्वग्रह असल्याने बँक अधिकारी त्यांना कर्ज देण्यास नकार देतात. नाहरकत प्रमाणपत्र मागू नये, असे निर्देश असताना कास्तकाराला नाहरकत प्रमाणपत्राची अट घातली जाते. कर्जासाठी वेगवेगळी कागदपत्रे मागितली जातात. शेवटी वैतागून कास्तकार अवैध सावकाराकडे जातो. कर्जाचा डोंगर वाढला की आत्महत्या करतो. पीक कर्जाची ही समस्या दरवर्षी त्याच्यापुढे आ वासून असते. मात्र शासन काही ठोस तोडगा काढत नाही.