शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

पैसा...पैसा... वाढत वाढे पेट्रोल डिझेलचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:53 IST

गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला.

- धर्मराज हल्लाळे

गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला. ही इंधन दरवाढ सातत्याने झाल्याने मोठ्या शहरांत भाजीपाल्यांचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढले. सर्वसामान्य जनतेत संताप आहे. काँग्रेस आणि सर्व विरोधक एकवटले. भारत बंदसाठी रस्त्यावर उतरले. परंतु कें द्रातील पर्यटनमंत्री म्हणतात, कार चालकांकडे पैसे भरपूर आहेत, त्यांना काही कमी नाही. एकूणच जनतेच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देण्याऐवजी मंत्री वादग्रस्त विधाने करुन सरकारलाच अडचणीत आणत आहेत. पेट्रोल डिझेल केवळ चारचाकी कारलाच लागत नाही. सामान्य माणसांच्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तु वाहून आणणाºया ट्रकलाही लागते. ज्यामुळे जनता भाववाढ अर्थात महागाईने त्रस्त झाली आहे. 

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन सुरू असताना १० सप्टेंबर रोजीही परभणीत ८९.८८ रुपये तर अमरावतीत ८९.३७ रुपये दराने पेट्रोल मिळत आहे. सरकारमधील मंत्र्याला वाटते तसे कारचालक हे पेट्रोल, डिझेल वाढले म्हणून काही उपाशी राहत नाही. परंतू  सामान्यांचे जगणे मुश्किल होते, हेही सत्ताधा-यांना समजत नसेल तर पेट्रोल डिझेलचा भडका निवडणुकीत उडाल्याशिवाय राहणार  नाही. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता महागाईच्या स्फोटक स्थितीतही सरकार पक्षातील काहीजण गंमतीशीर तुलना करत आहेत. देशातील सर्व गावांमध्ये वीज पुरवठा करायचा आहे, शौचालये बांधायची आहेत. विकास प्रत्येकाच्या दारात घेऊन जायचा आहे, मग कर रुपाने पैसा गोळा करावाच लागेल असे समर्थन करणारेही महाभाग आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती युपीए काळातील किंमतीच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी कमी आहेत. तरीही इंधन दरात दिवसेंदिवस वाढ होत आह़े. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू असल्याने आयात खर्चाचा प्रश्न आहे. परंतु ही घसरण थांबवणे, इंधन दरावर नियंत्रण आणणे सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ता पक्षातील सर्वच नेत्यांनी युपीए काळातील इंधन दरवाढीवर रान उठविले होते.

त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती उसळल्या होत्या. तुलनेने आजची स्थिती बरी असतानाही विद्यमान सरकार इंधन दरवाढीचा आलेख का उंचावत आहे हा सामान्यजणांना पडलेला प्रश्न आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेती आणि शेतक-यांचे प्रश्न, ज्यामध्ये आत्महत्या, हमीभाव यावर जनतेत सरकारबद्दल नाराजी आहे. त्यातही शहरी भाग तुलनेने सरकारला जो काही अनुकूल होता तोही आता इंधनाच्या भडक्यात होरपळून निघत आहे. सत्तर वर्षात काँग्रेसने काय केले वा काय केले नाही याची चर्चा करताना लोक मोदी सरकारने चार वर्षात काय केले हेही विचारणार आहेत. नोटाबंदीत पैसेवाला मोठा माणूस अडचणीत आला, आपला काही सबंध नाही, काळा पैसा आता जणू नदी, नाल्यांमध्ये दिसेल अशी स्वप्ने रंगवली गेली. नोटाबंदीच्या रांगेत हाल झाले तरी अनेकांना काळ्या धनावर टाच येईल याचा आनंद झाला. मात्र रिझर्व्ह बॅकेच्या अहवालानंतर नोटाबंदीचे फलित सांगणे हे सरकारसमोर मोठे आव्हान आहे. तसेच शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणाही हवेत विरल्या. हमीभावाचा प्रश्न सोडविता आला नाही. महाराष्ट्रात तूर, हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आले. येणा-या काळात सरकारने साखर निर्यात अनुदानात वाढ नाही केली तर ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा संकटात येणार आहे.

एकंदर गेल्या काही काळात केलेल्या घोषणा आणि आश्वासने सरकार समोरील डोके दुखी आहे. अच्छे दिन हा शब्दच गले कि हड्डी बना है, हे जबाबदार मंत्र्याचे विधान त्याच भावनेने समोर आले होते. पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबतही सत्ताधा-यांची कालची आणि आजची विसंगत भूमिका जनतेला पटणार नाही. इतकेच नव्हे लोक हेही सांगू लागले आहेत, चार वर्षांत वाढवलेल्या दरात ऐन निवडणुकीत घट केला जाईल. भाजपाशासित राज्यांना व्हॅट कमी करुन दर खाली आणण्याचा उपाय सांगितला जाईल. शेवटी ‘ ऐ जो पब्लिक है, ऐ सब जानती है’.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेल