शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 09:07 IST

मुंबई किती जणांना पोटात घेणार हे ठरवण्यात अपयश आले आहे आणि विकासालाही अंत असतो, असला पाहिजे, हे आपण विसरलो आहोत!

-अभिलाष खांडेकर, ‘रोविंग एडिटर’, ‘लोकमत’

मुंबई एक मायावी आणि बहुरंगी नगरी असून, या शहराची भव्यताही वेगळीच आहे. इथे सातत्याने होणाऱ्या बांधकामात राजकीय नेत्यांना असणारा रस कधीही संपणार नाही. हे दररोज बातम्या देणारे शहर आहे. क्रिकेट, बॉलीवूड, सेन्सेक्स, करोडपतींच्या नित्य नव्या याद्या आणि वाढती लोकसंख्या... विषय संपत नाहीत!

माझ्या या जन्मनगरीत मी अलीकडेच गेलो, तेव्हा दिसले ते सर्व शहराला व्यापून असनेले बांधकाम! कुठेही जा, काही ना काही हटवले जाते आहे आणि तिथे नवे इमले उभे राहात आहेत. लोंढ्याने लोक येत असल्याने या शहरात पर्यावरण खुंटीला टांगून काँक्रीटच्या इमारती वाढत चालल्या आहेत. विसाव्या शतकातले हे आधुनिक महानगर आता अनेक गोष्टींचे एक मोठे मिश्रण झाले आहे. चांगले, वाईट, कुरूप असे सगळेच इथे आसपास नांदते. शहराचा वैभवी वारसा सांगणाऱ्या वास्तू दिसतात. उत्कृष्ट संस्था आणि अद्भुत लोक आहेत. पैसा खूप आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आणि घोर गरिबी पदोपदी दिसते. जे लोक नोकरी व्यवसायासाठी मुंबईत येतात ते क्वचितच परत जातात, असे म्हणतात ते खरेच आहे. वाहतुकीची समस्या आहे, लोकलमध्ये खच्चून गर्दी असते, पाणीटंचाई नेहमीचीच. हिरवळ कमीच दिसते. तरीही लोक परत जाऊ इच्छित नाहीत. रहिवासाला योग्य अशा विभिन्न सूचकांकात न्यूयॉर्क, केप टाऊन, लंडन, बर्लिन, माद्रीद, तसेच बीजिंग या शहरांशी मुंबईलाही स्पर्धा करावी लागते.. मुंबईतल्या अब्जाधीशांची संख्या सध्या ९२ आहे.  ही नवी महागडी ओळख मुंबईला प्रकाशझोतात ठेवते.  मुंबई सगळ्यांनाच आपल्यात सामावून घेते. हे महानगर धारावीच्या झोपडवासीयांवर आणि २७ मजल्यांच्या विशाल ‘अँटेलिया’च्या मालकांवर सारखेच प्रेम करते.

- हीच मुंबादेवीची महानता आहे. १३१८ किंवा त्याच्या आसपास या नगराला देवीचे नाव मिळाले. या ‘मॅक्झिमम सिटी’चा अधिकतम विस्तार आता पूर्ण झाला आहे का? की या शहराला एक ‘उष्णतेचे बेट’ करण्यासाठी अजून ‘विकास’ बाकी आहे? माणसाच्या हावरटपणाला मर्यादा नसते हे खरे; परंतु धोरणे आखणाऱ्यांकडे मात्र समकालीन वास्तवाची जाण आणि समतोल दृष्टिकोन असावा लागतो. ‘बस! आता खूप झाले’ असे ते म्हणू शकत नाहीत का? १९८० च्या दशकाच्या मध्यावर बिमारू म्हटल्या जाणाऱ्या बिहार, मध्यप्रदेश किंवा राजस्थानसारख्या मागासलेल्या राज्यातून येणारे लोंढे पोटात सामावून घेणारे हे शहर आता चारही दिशांना आणखी पाय पसरू शकत नाही. ‘मित्रांनो, क्षमा करा आता आपले येथे स्वागत नाही’ असे राजकीय नेते म्हणू शकणार नाहीत, हे तर खरेच! बाळासाहेब ठाकरे स्पष्ट मतांसाठी ओळखले जाणारे एक दुर्मीळ राजकीय नेते होते. त्यांच्या काळात शिवसेनेने असा प्रयत्न केला होता; परंतु पुढे बिगर मराठी लोकांची संख्या वाढत गेली आणि मराठी माणसाचा आवाज दडपला गेला.

नव्याने तयार झालेला महागडा कोस्टल रोड मरीन ड्राइव्हला दहिसरपर्यंत जोडतो. त्यावरून जात असताना मनात अनेक प्रश्न आले. उड्डाणपुलांच्या विपुल संख्येने या महानगराचे ‘क्षितिज’ जणू पुसून टाकले आहे.  समुद्राच्या बाजूने जाणारा हा विशाल रस्ता हे ‘निसर्गावर विजय मिळवण्याच्या मानवी प्रयत्नांचे दृश्य रूप’ आहे. बॅकबेच्या रूपाने अरबी समुद्राची जागा मुंबईने हडपलीच, आता समुद्रकिनाऱ्यावरून रस्ता झाल्याबरोबर पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतले असतानाही १४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीतून समुद्राच्या खाली बोगदे करायला सुरुवात होणार आहे. 

या सुंदर शहरात असे प्रयोग होतच राहणार. अधिक लोकसंख्या अधिक सुविधा, पुन्हा अधिक लोकसंख्या हे दुष्टचक्र कदाचित कधीच संपणार नाही; पण दुर्दैवाची गोष्ट ही, की कोणतेही जागतिक शहर हे अशा पद्धतीने ‘चालवले’ जात नाही. त्या शहरांची  विशेषता इतक्या सहजपणे पुन्हा पुन्हा नष्ट केली जात नाही. हे केवळ शहराच्या सौंदर्यशास्त्राच्या बाबतीत नाही. ही गोष्ट निसर्गाला सतत आव्हान देण्याच्या बाबतीतही आहे. मुंबई किती जणांना पोटात घेणार हे ठरवण्यातल्या अपयशाच्या बाबतीतही हे तितकेच खरे आहे.नागरिकांना इकडून तिकडे जाण्याचा घटनादत्त अधिकार आहे हे मला माहिती आहे; तरीही विकासाला काही एक मर्यादा असली पाहिजे... असलीच पाहिजे!

टॅग्स :Mumbaiमुंबई