शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मदत नाकारण्याचा करंटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:20 IST

केरळातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त अरब अमिरातीने दिलेले ७०० कोटी रुपयांचे साहाय्य घ्यायला केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेला नकार जेवढा अनाकलनीय तेवढाच असंवेदनशील आहे.

केरळातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त अरब अमिरातीने दिलेले ७०० कोटी रुपयांचे साहाय्य घ्यायला केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेला नकार जेवढा अनाकलनीय तेवढाच असंवेदनशील आहे. संकटे आणि आपत्ती जशी माणसांना जवळ येण्याच्या प्रेरणा देतात तशा त्या जगालाही परस्परांच्या जवळ आणत असतात. भारताशेजारच्या अनेक लहान देशांना त्यांच्यावरील नैसर्गिक व अन्य आपत्तीच्या काळात भारताने आर्थिकच नव्हे तर लष्करी साहाय्यही पुरविले आहे. मॉरिशस व श्रीलंका यांना केलेले असे साहाय्य आजही साऱ्यांच्या स्मरणात आहे. असे साहाय्य भारताने बांगला देशालाही केले आहे. संयुक्त अरब अमिरातीत केरळातून गेलेल्या अनेक तरुण, तरुणी वास्तव्याला आहेत. तिथे त्या शिक्षण घेतात आणि विविध सेवांमध्येही सहभागी होतात. त्यांच्या या सहभागाचे स्मरण ठेवून त्या देशाने केरळच्या संकटकाळात त्याला मदत देण्याचे ठरविले असेल तर तो साधा मनुष्य धर्माचा भाग आहे. त्याचा अव्हेर करण्यात राष्टÑाभिमानापेक्षा आपला नको तसा गर्वच अधिक आहे. केरळातील १४ पैकी ११ जिल्हे पुराच्या संकटाने ग्रासले आहेत. त्यात साडे ३०० हून अधिक स्त्री-पुरुष मृत्यू पावले आहेत. शेकडो इमारतींची व सरकारी कार्यालयांची वाताहात झाली आहे आणि तेथील सारी शेतीव्यवस्था पुराने गाळाखाली आणली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या मते त्या राज्याचे प्राथमिक नुकसान २६ हजार कोटींच्या पुढे जाणारे आहे. ते भरून काढायला केंद्र व अनेक राज्य सरकारांसह देशातील अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. मात्र तो सहभाग या संकटाला पुरेसा नाही. या स्थितीत मग त्यासाठी जग पुढे येत असेल तर त्याचे स्वागत करायचे की त्याकडे पाठ फिरवायची? काही काळापूर्वी डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारनेही ही चूक केली होती. २०१३ मध्ये दक्षिणेत आलेल्या त्सुनामीच्या वेळी जगातील अनेक देशांनी देऊ केलेली मदत, आम्ही समर्थ आहोत म्हणून त्याने नाकारली होती. पुढे मात्र विवेकाचा विचार प्रभावी होऊन त्या सरकारने ती मदत स्वीकारलीही होती. संकटे समाजाला व जगाला एकत्र आणतात. ते तसे येत असतील तर आपली दारे मिटून घेणे हा करंटेपणा आहे. तशीही सामान्य काळात विदेशातल्या अनेक संस्था व संघटना भारतातील एनजीओ नावाच्या यंत्रणांना पैसा व अन्य तºहेचे सहाय्य पुरवित असतातच. ते सहाय्य देशाच्या कामी येत असते. विदेशी मदतीवर स्वदेशात सेवा बजावणाºया अशा असंख्य संघटना आज येथे कार्यरत आहेत. त्यातल्या काहींचे संशयास्पद असणे लक्षात घेऊन सरकारने त्यांच्यावर बंदीही घातली आहे. मात्र ही मदत सरसकट बंद करण्याचा प्रश्न आजवर कधी झाला नाही व तो होऊही नये. सरकारे एकत्रित येत नसली तरी त्यांनी जनतेच्या परस्पर संबंधात ढवळाढवळ करणे वा अडथळे आणणे चांगलेही नाही. त्यातून संयुक्त अरब अमिरात हा भारताचा मित्र देश आहे. काश्मीरच्या प्रश्नावर, तो मुस्लीम देश असूनही त्याने भारताची बाजू घेतली आहे. अशा देशाची मदत नाकारणे हा एका चांगल्या मैत्रीला व स्नेहाने दिल्या गेलेल्या सहकार्याला नकार आहे. महाराष्टÑ, राजस्थान, मध्यप्रदेश, बंगाल व पंजाबातील सरकारांच्या प्रमुखांनी विदेशाचे दौरे करून आपल्या राज्याच्या औद्योगिक व आर्थिक उभारणीसाठी तेथील उद्योगपतींसमोर अलीकडेच हात पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर केरळला देऊ केलेली मित्र राष्टÑाची मदत नाकारणे हा प्रकार न समजणारा व काहीसा वेडगळपणाचाही आहे. पाश्चात्त्य जगात परस्परांशी असलेले संबंध विस्कटण्याचे राजकारण सध्या सुरू आहे. त्याची लागण पौर्वात्य जगात होणे हे त्या जगाच्या आर्थिक स्थितीमुळे फारशा उपयोगाचे नाही. त्यातही भारत आज ज्या पूरसंकटातून जात आहे त्या स्थितीत तर अशा मदतीकडे पाठ फिरवणे हा पौर्वात्य जगात सुरू होऊ शकणाºया मैत्रीपर्वात विघ्न आणण्याचा प्रकार आहे. याचा दोष भारताकडे येणे त्याच्या प्रतिमेला काहीसे खाली आणणारे आहे. या स्थितीत मैत्री कायम राखणे व सहकार्याचे वातावरण निर्माण करणे हेच महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरsaudi arabiaसौदी अरेबिया