शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गोगलगाय, पोटावर पाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 07:36 IST

दरवर्षी पावसाळ्यात उगवणारी इवलीशी गोगलगाय यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. 

शेतीवरील संकटांच्या मालिकेला अंत नाही. दरवर्षी नवनवीन विघ्ने येतच असतात. कधी अवर्षण, अतिवृष्टी, तर कधी अवकाळी. अशा अस्मानी संकटांची तर शेतकऱ्यांना आता सवयच झाली आहे. यंदा पावसाने महिनाभर ताण दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या. जून महिनाअखेर ज्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांवर नवेच संकट ओढवले आहे. या संकटावर कशी मात करायची याचा पूर्वानुभव नसल्याने शेतकरी पुरते गांगरून गेले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात उगवणारी इवलीशी गोगलगाय यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. 

गोगलगाय आणि पोटावर पाय, असे म्हणावे असले हे संकट!  चोरपावलाने आलेल्या शंखी गोगलगाई शेकडो एकरावरील कोवळी पिके फस्त करीत आहेत. गतवर्षी गोगलगायींनी विदर्भातील संत्र्यांचा फडशा पाडला. यावर्षी त्यांनी मराठवाड्याकडे मोर्चा वळविला आहे. सोयाबीन हे त्यांचे प्रमुख भक्ष्य आहे. नुकतेच उगवलेले सोयाबीनचे पीक रात्रीतून भुईसपाट होत आहे. आजवर हरिण, रानससे, मोर आणि रानडुक्कर अशा वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांना पळताभुई थोडी केली होती. आता गोगलगायींनी शेतकऱ्यांची झोपमोड केली आहे. वन्यप्राण्यांना बांधाबाहेर हलकण्यासाठी नाना उपाय योजता येतात; परंतु या गोगलगायीचे करायचे काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण हा कीटकवर्गीय जीव इतका चिवट, सर्व प्रकारच्या उपचारांना पुरून उरला आहे! 

कृषीतज्ज्ञ जे उपचार सांगतात, ते एक तर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत आणि दुसरे म्हणजे, गोगलगायींचा नेमका बंदोबस्त कसा करावा, यावर शास्त्रज्ञांमध्येच एकवाक्यता दिसून येत नाही. मुळात गोगलगायीसारखा कीटक असो की अन्य वन्यप्राणी; शेतकऱ्यांच्या मुळावर का उठले? मानवी भूक हे त्याचे प्रमुख कारण सांगता येईल. वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्याकरिता आपण अधिक उत्पादनाचा हव्यास धरला. त्यातून संकरित बियाणे, खते, कीटकनाशके तयार केली. अशा प्रकारच्या वैज्ञानिक प्रयोगांनी पिकांची उत्पादन क्षमता वाढली खरी; परंतु त्यातून जमिनीची प्रत खालावली, अन्नधान्यातील पोषक घटकांचा ऱ्हास झाला. रासायनिक औषधांच्या माऱ्याने कृषी पंढरीतील जैवविविधताच संपुष्टात आली. कृमी कीटकांचा नाश झाल्याने त्यावर अवलंबून असलेले कीटकवर्गीय जीवजंतू नष्ट झाले. 

ज्ञात-अज्ञात अशा लक्षावधी जिवांची वंशावळ नष्ट करून आपण आपली भूक भागविली. मात्र, जीवसृष्टीचा हाच विनाश आज आपल्या अंगाशी आला आहे. गोगलगायीचेच उदाहरण घेऊ. मुख्यत: तृणवर्णीय वनस्पतींवर जगणारा हा इवलासा जीव आजवर शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जात होता. मात्र, शेतातील गवत कमी करण्यासाठी तृणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला. परिणामी, गवत नष्ट झाले; पण त्यातून गोगलगायींची उपासमार सुरू झाली. कोणत्याही जिवाची अन्नसाखळी तुटली की तो जीव अन्य प्रकारच्या अन्नाचा शोध घेणारच. गोगलगायी पिकांवर तुटून पडण्यामागे हेच कारण आहे. या कीटकाचा समूळ नाश करण्यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आता नानाविध उपाय सुचवीत आहेत. अशा उपाययोजनांसाठी सरकारनेही अनुदान जाहीर केले आहे.  गोगलगायींचा समूळ वंश नष्ट करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.  या लढाईत गोगलगायींची हार होणार, हे नक्की; पण गोगलगायी नष्ट केल्याने पुन्हा नवे संकट उद्भवणारच नाही, याची खात्री कोण देणार? शिवाय, आपण दरवर्षी असा जीवसंहार करणार असू तर एक ना एक दिवस पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश अटळ आहे हे सांगण्यासाठी भविष्यवेत्याची गरज नाही. 

मानवी भुकेसाठी पिकांचे रक्षण करणे जितके गरजेचे तितकेच मानवाच्या अस्तित्वासाठी जैविक पर्यावरणाचे रक्षण करणेदेखील अनिवार्य आहे. गोगलगायीसारख्या जैविक संकटावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी तात्पुरते उपाय योजण्याऐवजी यावर अक्षय इलाज शोधला पाहिजे. शाश्वत शेतीसाठी याची नितांत गरज आहे. करपा, बोंडअळी, कपाशीवरील लाल्या, तुरीवरील मर अशा प्रकारची शेतीवर येणारी विघ्ने ही नैसर्गिक आपत्ती नसून संकरित वाणांमुळे ओढवून घेतलेले हे संकट आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र