शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्याच्या विकासासाठी आता असे काही घडणार नाही, अशी आशा करूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 05:29 IST

गेले दोन दिवस विधानसभेत सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या दबावातून हे सरकार सत्तेवर आल्याची टिप्पणी वारंवार होत राहिली. तिलाही उत्तर देताना फडणवीसांनी होय हे ईडी सरकारच आहे, परंतु एकनाथमधला ‘ई’ व देवेंद्रमधला ‘डी’ असे हे ‘ईडी’ सरकार, असा शब्दच्छल केला.

अपेक्षेनुसार एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्र विधानसभेतील दोन्ही कसोट्या पार केल्या. रविवारी भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तर सोमवारी बारा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतरचे अत्यंत आवश्यक असे विश्वासमत जिंकले. दोन्हीवेळी २८७ सदस्यांपैकी १६४ मते सत्ताधारी गटाला मिळाली. निकाल आधीच स्पष्ट असल्यामुळे म्हणा, अध्यक्ष निवडीवेळी गैरहजर व तटस्थ राहिलेल्यांची संख्या पंधरा होती, तर विश्वासमतावेळी त्यात आणखी आठ जणांची भर पडली. काँग्रेसचेच मोठे नेते व काही आमदार सदनात प्रवेश करू शकले नाहीत. विश्वासमत जिंकल्यानंतरच्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली. इच्छा नसताना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागल्याबद्दलच्या चर्चांचा उल्लेख करीत शरद पवार यांना  धन्यवाद दिले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार व शिस्तीचा त्यांनी गौरव केला.

गेले दोन दिवस विधानसभेत सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या दबावातून हे सरकार सत्तेवर आल्याची टिप्पणी वारंवार होत राहिली. तिलाही उत्तर देताना फडणवीसांनी होय हे ईडी सरकारच आहे, परंतु एकनाथमधला ‘ई’ व देवेंद्रमधला ‘डी’ असे हे ‘ईडी’ सरकार, असा शब्दच्छल केला. थोडक्यात, ठाण्याचे भाई एकनाथ शिंदे आणि नागपूरचे भाऊ देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विश्वासमताच्या रूपाने खऱ्या अर्थाने स्थानापन्न झाले आहे. यादरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मूळ शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांचा पक्षादेश अधिकृत असल्याचे सांगून शिंदे यांच्यासह ३९ जणांनी व्हिप झुगारल्याचे नोंदविले. त्यानंतर पीठासीन झालेले ॲड. राहुल नार्वेकर यांनी ऑक्टोबर २०१९ मधील एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरील नियुक्ती वैध ठरवली. त्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत असल्याचे सांगून १६ आमदारांनी तो डावलल्याची नोंद केली. शिवसेनेने लगेच अध्यक्ष निवडीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तो अर्जदेखील येत्या ११ जुलै रोजी आधीच्या याचिकांसोबत सुनावणीला घेतला जाईल, असे न्यायमूर्तींनी सांगितल्यामुळे पुढच्या सोमवारपर्यंत विधानसभेत फार काही अनपेक्षित घडण्याची शक्यता नाही.

सर्वोच्च न्यायालयात काय होते, यावर बरेच काही अवलंबून आहे. न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या गटाची याचिका मान्य केली तर विधिमंडळातील मूळ शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येईल. ‘जैसे थे’ स्थिती ठेवली किंवा सुनील प्रभू व शिवसेनेचे आक्षेप मान्य केले तर मात्र पुन्हा राजकीय शक्तिप्रदर्शन होईल. कदाचित शिंदे गटाला भाजप किंवा अन्य पक्षात विलीन व्हावे लागेल. विधानसभेतील बहुमतावर त्यामुळे फार परिणाम होणार नाही. दोन्ही शक्यतांच्या पलीकडे एका नव्या संघर्षाला सुरुवात होईल. ‘लोकमत’ने याआधी गुरुवारच्या अग्रलेखात म्हटल्यानुसार, आता राज्यातील मूळ शिवसेनेची सत्ता संपली असून, पक्षाच्या पातळीवर, झालेच तर रस्त्यावरील संघर्ष सुरू झाला आहे. हा शिवसेनेच्या अस्तित्वाचा संघर्ष आहे. प्रखर प्रादेशिक अस्मिता जोपासणारा पक्ष देशातील बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये टिकून राहतोच किंवा ती त्या त्या राज्यांची गरज असते. अशावेळी उद्धव ठाकरे, विशेषत: आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखविले तसे शिवसैनिकांच्या मदतीने पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निष्ठावंत गट अधिक आक्रमक होईल. ते जे व्हायचे ते होवो, तथापि आता महाराष्ट्रातील जनतेला शिंदे-फडणवीस यांचे सरकार कसे व किती दिवस चालेल, याचीच उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली आहे. अनेकांना ती सत्ताधारी वर्तुळात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी सोडलेली पुडी वाटते. फडणवीस यांनी ती शक्यता ठामपणे फेटाळून लावली आहे. हे सरकार उरलेली अडीच वर्षे पूर्ण करील, असा शब्द त्यांनी दिला आहे. तसे या सरकारला करावेही लागेल. कारण, सरकारच्या स्थैर्यावर उद्धव ठाकरे, तसेच दोन्ही काँग्रेसचे लक्ष असेल. विधानसभा व लोकसभा निवडणुकीला सामाेरे जाताना भाजपला स्थिर सरकारची प्रतिमा सोबत हवी असेल. तरीही महाविकास आघाडीत एकचालकानुवर्ती, आदेशाचे पालन करणारा पक्ष अशी शिवसेना व दोन्ही काँग्रेस अशा तीन पक्षांमध्ये फूट पडण्याची शक्यताच नाही, असे मानले जात होते. तरीदेखील काय घडले, हे राज्याने व  देशाने पाहिले. राज्याच्या विकासासाठी आता असे काही घडणार नाही, अशी आशा करूया!

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना