शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नानांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी; काँग्रेसला मिळणार का उभारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 8:17 AM

पटोले यांची खरी लढाई भाजपसोबत असली तरी आघाडीतील मित्रपक्षांसोबत एकत्र नांदत असताना त्यांच्या विस्ताराला बांध घालून स्थानिक स्वराज्य संस्था ‘हातोहात’ जिंकण्याचे दुहेरी आव्हानदेखील त्यांच्यापुढे असेल.

भाकरी का करपली, घोडा का अडला, या प्रश्नांचे एकार्थी उत्तर राजकीय पक्षांनाही लागू पडते. कोणताही पक्ष, संघटना असो की, संस्था. व्यवस्थापकीय रचनेत कालसुसंगत फेरबदल केले नाहीत, तर त्या संस्थेचा अस्त अटळ असतो. विशेषत: राजकीय पक्ष-संघटनेबाबत तर अधिकच दक्षता बाळगण्याची गरज असते. एकचालकानुवर्ती पक्ष कितीही शिस्तबद्ध वाटत असले तरी कालांतराने ते अस्ताला जातात, हा जागतिक इतिहास आहे. शीर्षस्थ नेतृत्वाच्या पश्चात प्रादेशिक पक्षांची कशी वाताहात होते, याची असंख्य उदाहरणे आपल्या देशातच आहेत. काँग्रेससारख्या देशव्यापी पण सध्या अस्तित्वहीन बनलेल्या पक्षाने तर आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल करण्याची नितांत गरज आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या फेरबदलाची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

देशपातळीवर हा पक्ष गलितगात्र अवस्थेत असला तरी महाराष्ट्रात तो इतर पक्षांच्या टेकूने सत्तास्थानी आहे. पंजाबच्या अमरिंदर सिंह यांच्यासारखे स्वयंभू नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे नसले तरी राज्य नेतृत्वाची धुरा ज्यांच्याकडे सोपविली आहे, ते नाना पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शीर्षस्थ नेतृत्व लोकाभिमुख, आक्रमक, अभ्यासू आणि आंदोलकी बाण्याचे असेल, तर ते पक्ष-संघटनेत ऊर्जा निर्माण करू शकते. पटोले हे प्रस्थापित चौकट मोडणारे, विरोधकांना थेट भिडणारे आणि प्रसंगी आमदारकी-खासदारकी त्यागणारे दबंग नेते आहेत. या गुणविशेषांमुळेच कदाचित पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविलेली दिसते. प्रदेश संघटनेत फेरबदल करताना प्रादेशिक आणि सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्नही केलेला दिसतो. पटोले यांच्यासोबत जे सहा कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत, त्यांची नावे पाहिली तरी ही बाब लक्षात येईल. शिवाय, उपाध्यक्ष आणि संसदीय मंडळात नव्या चेहऱ्यांबरोबरच शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव मोघे या अनुभवी नेत्यांचा समावेश करून संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
राज्यात हा पक्ष ज्यांच्या सोबतीने सत्तेवर आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष तसे प्रादेशिक पक्ष म्हणूनच ओळखले जातात. शिवाय, हे दोन्ही पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आणि तितकेच आक्रमक आहेत. सत्तेवर असतानादेखील ते पक्षविस्ताराकडे लक्ष देऊन असतात. या तीन पक्षांची महाविकास आघाडी भविष्यात कोणते वळण घेईल, याची शाश्वती कोणालाच नाही. त्यामुळे आपापले गड-किल्ले मजबूत करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आजवर बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेमस्ताकडे काँग्रेसचे नेतृत्व असल्याने पक्षविस्ताराला मर्यादा होती. थोरात तसे भिडस्त स्वभावाचे असल्याने सहमतीवरच त्यांचा अधिक भर होता. त्यामानाने पटोले आक्रमक आहेत. मिळालेली संधी लोकाभिमुख करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी असताना त्याची प्रचिती आलीच आहे.
पटोले हे विदर्भाचे आहेत. आजवर आबासाहेब खेडकर, नाशिकराव तिरपुडे, रणजित देशमुख, प्रभा राव, माणिकराव ठाकरे या वैदर्भीय नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे आणि विदर्भानेही वेळोवेळी या पक्षाला साथ दिलेली आहे. आणीबाणीनंतर देशभर या पक्षाची वाताहात झालेली असताना विदर्भानेच इंदिरा गांधींना साथ दिली. आजही विदर्भातील विधानसभेच्या ६२ जागांपैकी १६ जागा काँग्रेसकडे आहेत. पटोले यांची खरी परीक्षा त्यांच्या प्रांतातच आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे तगडे नेते भाजपकडे आहेत. शिवाय, गेल्या काही वर्षांत भाजपने या प्रदेशावर मजबूत पकड मिळवलेली आहे. पटोले यांची खरी लढाई भाजपसोबत असली तरी आघाडीतील मित्रपक्षांसोबत एकत्र नांदत असताना त्यांच्या विस्ताराला बांध घालून स्थानिक स्वराज्य संस्था ‘हातोहात’ जिंकण्याचे दुहेरी आव्हानदेखील त्यांच्यापुढे असेल.
पक्ष- संघटनेला आलेली मरगळ झटकण्यासाठी त्यांना चांद्यापासून बांद्यापर्यंत पायांना भिंगरी लावून फिरावे लागेल. ओस पडलेल्या पक्ष कार्यालयांत पुन्हा गजबज वाढवायची असेल, तर काँग्रेसच्या मंत्र्यांचे जनता दरबार भरवावे लागतील. विद्यार्थी संघटना, महिला आघाडी, सेवा दल, अशा फ्रंटल संघटनांना पुन्हा सक्रिय करावे लागेल. अपवाद वगळता वर्षानुवर्षे हा पक्ष सत्तेत असल्याने जागोजाग सुभेदार तयार झालेले आहेत. लढण्याची क्षमता हरवून बसलेल्या अशांना मार्गदर्शक मंडळात टाकून नव्या चेहऱ्यांना घेऊन मोट बांधली तरच या नव्या फेरबदलाचे सकारात्मक परिणाम दिसतील; अन्यथा, थोरात गेले अन्‌ नाना आले तरी पान न हाले, व्हायचे!

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस