शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: महाराष्ट्राचे ‘दावोस वास्तव’! देशाच्या औद्योगिक उत्पादनात १५ टक्क्यांचा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 11:02 IST

दावोस परिषदेत यावर्षी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस परिषदेत यावर्षी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर ३७.२७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दावोसला जाऊ लागल्यापासून, दरवर्षी ‘इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक’, ‘लाखो कोटींचे सामंजस्य करार’, ‘लाखो रोजगार’ अशी मथळेखोर भाषा चर्चेत येते; परंतु घोषणा कितपत वास्तवात उतरतात, हा प्रश्न दुर्लक्षितच राहतो. देशातील सर्वाधिक औद्योगीकरण झालेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात राज्याचा वाटा सुमारे १५ टक्क्यांच्या आसपास आहे.

मुंबई-पुणे पट्टा, ठाणे-नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या भागांत औद्योगिक पायाभूत सुविधा दशकानुदशके उभ्या आहेत. त्यामुळे दावोससारख्या व्यासपीठावर महाराष्ट्र ‘रेडी प्रॉडक्ट’ म्हणून मांडला जातो. प्रश्न हा आहे, की सामंजस्य करारांचे रूपांतर प्रत्यक्ष प्रकल्पांत कितपत होते? सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या दहा-बारा वर्षांत दावोस व तत्सम गुंतवणूक परिषदांमध्ये महाराष्ट्राने लाखो कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले; परंतु उद्योग विभागाच्या अंतर्गत आढाव्यांतून आणि नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या (कॅग) निरीक्षणांतून एक गोष्ट सातत्याने पुढे येते की, या करारांपैकी प्रत्यक्षात जमिनीवर उतरलेली गुंतवणूक २० ते ३० टक्क्यांच्या पुढे जात नाही. उरलेले करार कागदावरच राहतात, रद्द होतात किंवा इतर राज्यांत वळतात. याला सरकारी अपयश संबोधणे सोपे आहे; पण तसे करणे अपुरे ठरेल. सामंजस्य करार हे ‘इच्छा व्यक्त करणारे’ दस्तावेज असतात. जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार, व्याजदर, भांडवली बाजारातील अस्थिरता, जमीनविषयक अडचणी, पर्यावरणीय मंजुरी, वीज व पाण्याची उपलब्धता इत्यादी घटकांवर प्रकल्प प्रत्यक्षात उतरणे अवलंबून असते.

रोजगार निर्मितीचा मुद्दा तर आणखी गुंतागुंतीचा आहे. दावोस घोषणांमध्ये ‘दहा लाख’, ‘वीस लाख’ रोजगारांचे आकडे सहजपणे उच्चारले जातात. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक भांडवल-प्रधान क्षेत्रांत होते. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, पेट्रोकेमिकल्स, डेटा सेंटर्स अशा प्रकल्पांत गुंतवणूक प्रचंड असते, पण थेट रोजगार तुलनेने कमी असतात. एखाद्या दहा हजार कोटींच्या प्रकल्पातून काही हजारच प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. अर्थात अप्रत्यक्ष रोजगार वेगळा! त्यामुळे ‘लाखो रोजगार’ ही भाषा आकड्यांच्या खेळावर अधिक आधारलेली असते, वास्तवावर कमी! गुंतवणुकीचे समन्यायी भौगोलिक वितरण हादेखील मोठा प्रश्न आहे. यावर्षी मुंबई महानगर क्षेत्रात २२ टक्के, कोकणात १६ टक्के, विदर्भात १३ टक्के आणि उत्तर महाराष्ट्र व इतर भागांत ५० टक्के गुंतवणूक येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बहुतांश प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश, पुणे परिसर, नाशिक पट्टा किंवा विदर्भात नागपूर आणि मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नजरेसमोर ठेवून आखले जातात. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र आणि कोकणचा मोठा भाग या गुंतवणुकीपासून दूरच राहतो. परिणामी ‘महाराष्ट्रात गुंतवणूक’ असा शब्दप्रयोग केला जात असला तरी, प्रत्यक्ष गुंतवणूक काही शहरांपुरतीच मर्यादित राहते. हा केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक असमतोलाचाही प्रश्न आहे. उद्योग तिथेच जातात, जिथे पायाभूत सुविधा असतात, असे उत्तर त्यावर दिले जाते.  ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर, पण राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहे. पायाभूत सुविधा निर्माण करणे हेच तर सरकारचे मुख्य काम आहे.

दावोसला जाऊन मिळणाऱ्या गुंतवणुकीचा ठरावीक हिस्सा मागास भागांसाठी अटींसह वळवला गेला, औद्योगिक वसाहतींचे विकेंद्रीकरण केले गेले, तर चित्र बदलू शकते; पण त्यासाठी घोषणांच्या पलीकडे जाऊन काटेकोर अंमलबजावणी हवी. ते न झाल्यास रोजगारासाठीच्या स्थलांतरामुळे मोठ्या शहरांवरील ताण अधिकाधिक वाढतच जाईल! दावोस हे महाराष्ट्रासाठी संधीचे व्यासपीठ नक्कीच आहे; पण ‘चमत्कारा’ची खात्री नाही. किती करार प्रत्यक्षात आले, किती प्रकल्प सुरू झाले, किती अर्धवट राहिले, किती रोजगार निर्माण झाले, याची वार्षिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध व्हायला हवी. महाराष्ट्रात  कुशल मनुष्यबळ, विमानतळे, बंदरे, औद्योगिक परंपरा आहे; पण या सामर्थ्याचा वापर सर्वसमावेशक विकासासाठी होतो का? दावोसच्या झगमगाटात हरवून न जाता, वस्तुस्थितीशी प्रामाणिक राहून धोरणे आखल्यास, ‘गुंतवणूक’ हा शब्द सामान्य माणसाच्या जीवनात अर्थपूर्ण ठरेल; अन्यथा दरवर्षी बदलणारे आकडे, बदलणारे करार आणि न बदलणारी विषमता, हेच महाराष्ट्राचे `दावोस वास्तव’ राहील!

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Davos Reality: Investment Promises vs. Ground Realities Examined

Web Summary : Davos investment pledges for Maharashtra often exceed actual project implementation. While MoUs reach crores, only a fraction materializes due to economic factors and infrastructure gaps. Geographical disparities persist, hindering inclusive growth, demanding strategic policy changes for equitable development.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारInvestmentगुंतवणूकjobनोकरीUday Samantउदय सामंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस