शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

दृष्टिकोन: कोरोनामुळे ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींच्या लग्नाची घाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 03:30 IST

या परिस्थितीचे बालविवाहासारखे नकारात्मक परिणाम मुलींचं भविष्य, आरोग्य धोक्यात आणत आहे. या मुलींवर अवलंबून असलेली पुढची पिढीही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

माधुरी पेठकर सातारा जिल्ह्यातील घटना. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर वसतिगृहातील मुला-मुलींना घरी पाठविण्यात आलं; पण दहावीत शिकणारी एक मुलगी घरातून पळून पुन्हा वसतिगृहात आली... का?- तर आई-वडील तिचं लग्न लावून द्यायला निघाले होते म्हणून! मुलींच्या शिक्षणाविषयीचा उदासीन दृष्टिकोन, शिक्षण गळती, नैसर्गिक आपत्ती, हंगामी स्थलांतर, पितृसत्ताक कुटुंबपद्धती, मासिक पाळी, प्रेमविवाह-पलायन, हुंडा, स्त्री-पुरुषांचं विसंगत प्रमाण, हे मुलींचे लग्न लवकर लावून देण्यास कारणीभूत ठरणारे मुख्य घटक; पण आता कोरोनानं निर्माण झालेली परिस्थिती या नवीन कारणाचीही यात भर पडलेली आहे. पोलीस, सामाजिक संस्था, समाजसेवक , जागरूक कार्यकर्ते, नागरिक यांच्या यशस्वी हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रात अलीकडच्या काळात असे २०० पेक्षा जास्त विवाह थांबविण्यात आले आहेत; पण कितीतरी लग्नं उरकून गेलेली आहेत, हेही वास्तव आहे. ज्या मुलींचे लग्न थांबविण्यात यश आलं, त्यांना कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर पुन्हा शाळेत जाता येईलच याची मात्र काहीच खात्री नाही.

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शाळा कधी सुरू होतील याबाबत अद्यापही कसलीच स्पष्टता नाही. ग्रामीण भागातील लोकांचे रोजगार गेले आहेत. काम कधी मिळेल, मिळेल तरी का, याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत मुलींचं घरात राहणं हे ग्रामीण भागातील पालकांना ओझं वाटू लागलं आहे. शिवाय कोरोनामुळे लग्न स्वस्तात आटोपण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. लग्नाला माणसं कमी येणार, देणी-घेणी करावी लागणार नाहीत, या विचारानंही आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेली कुटुंबं मुलींचे लग्न लावून देत आहेत. मागील वर्षीपाऊस चांगला झाला. त्यामुळे उसाचं भरघोस उत्पन्न झालं. आता सप्टेंबरनंतर ऊसतोडीसाठी कामगार स्थलांतरित होतील. तेव्हा एकाकोयत्या (एकटी व्यक्ती)पेक्षा दोन कोयत्यांना (जोडप्याला) जास्त मजुरी मिळते. या कारणामुळेही मराठवाडा, यवतमाळ, नंदुरबारमधील गावांमध्ये कोरोनाआधी आणि कोरोनाकाळात मुलींचे लग्न लवकर लावून देण्याच्या घटना घडत आहेत. शासकीय पातळीवरील संपूर्ण यंत्रणा ही कोरोनानं निर्माण केलेली परिस्थिती हाताळण्यात व्यस्त असल्यामुळे पोलीस, व्यवस्था यांचं दुर्लक्षही या लग्नांच्या पथ्यावर पडत आहे.

रोजगारासाठी स्थलांतर करणारे अनेकजणआपल्या मुलांना जवळच राहणाऱ्या आजी-आजोबांच्या, काका-काकूंच्या भरवशावर सोडून जातात. हे नातेवाईक शाळेत जाणाºया मुलांकडे लक्ष ठेवतात, त्यांना काय हवं - नको ते बघतात; पण कोरोनामुळे आता आपल्या मुलांना ही मदत मिळेलच अशी खात्री पालकांना वाटत नसल्यानं मुलींचे लग्न उरकून त्यांना त्यांच्या घरी पाठवून देणं हा मार्ग ग्रामीण भागातील पालकांना जास्त सुरक्षित वाटत आहे. हस्तक्षेप करून मुलींचे अल्पवयात होणारे विवाह थांबविणे या एकाच मार्गावर आता अवलंबून राहता येणार नाही. कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कुटुंबांना मुलांच्या सुरक्षेसाठी रोजगार किंवा आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात मोबाईल, संगणक या सुविधांचा अभाव आहे. अशा ठिकाणी दूरदर्शन, कम्युनिटी रेडिओ यांद्वारे बालविवाहाबाबत जाणीवजागृती देणारे संदेश लोकांपर्यंत पोहोचविणं, ही आजची तातडीची गरज आहे. शिवाय शासन पातळीवर गावा-गावांमध्ये बालसंरक्षण समिती तयार करून अशा घटनांवर लक्ष ठेवल्यास असे विवाह वेळीच रोखले जातील. कोरोनानं निर्माण केलेली परिस्थिती भीषण आहे; पण या परिस्थितीचे बालविवाहासारखे नकारात्मक परिणाम मुलींचं भविष्य, आरोग्य धोक्यात आणत आहे. या मुलींवर अवलंबून असलेली पुढची पिढीही धोक्यात येण्याची शक्यता आहे.‘मुलींचे लवकर लग्न...’ या विषयावर ‘युनिसेफ’चा एक स्वतंत्र गट काम करतो. महिला बालविकास विभागातील बालसुरक्षा कक्ष, चाइल्ड लाइन ही लहान मुलांसाठी काम करणारी आपत्कालीन दूरध्वनी सेवा, गावपातळीवर काम करणाºया संस्था यांच्याकडे ‘माझं अल्पवयात होणारं लग्न थांबवा, मला शिकायचं आहे’, असं सांगून अनेक मुली मदत मागत आहेत. याबाबत गावपातळीवर जाणीव जागृतीची गरज आहे. - अल्पा वोरा, बालसुरक्षा विशेषज्ञ, युनिसेफ, महाराष्ट्र.

(लेखिका नाशिक लोकमतच्या उपसंपादक आहेत)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न