शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विकास आणि वाढते वायुप्रदूषण : एक पॅराडॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:20 IST

‘विकासाची किंमत प्रदूषणाद्वारे चुकवावी लागते’ असा अनुभव विकसित राष्ट्रांबरोबरच विकसनशील राष्ट्र राहिलेल्या विकासप्रवण भारतासारख्या देशातही येतो.

- शैलेश माळोदे‘विकासाची किंमत प्रदूषणाद्वारे चुकवावी लागते’ असा अनुभव विकसित राष्ट्रांबरोबरच विकसनशील राष्ट्र राहिलेल्या विकासप्रवण भारतासारख्या देशातही येतो. एका जागतिक स्तरावरील ताज्या अहवालानुसार २०१७ मध्ये सुमारे १२ लक्ष लोक घराबाहेरील आणि घराच्या आतील प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडले. ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०१९’ या नावाने प्रकाशित या अहवालातील अध्ययन निष्कर्षानुसार सध्याच्या स्तरावरील वायुप्रदूषणातील वाढणारं प्रमाण पाहता दक्षिण आशियामधील प्रत्येक मुलाचं सरासरी आयुर्मान सुमारे अडीच वर्षांनी कमी होण्याची भीती आहे. जागतिक स्तरावर ती संख्या २० महिने असेल. हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे हा अहवाल दरवर्षी प्रकाशित होतोय. ही संस्था स्वतंत्र, नफाविरहित संशोधन करणारी असून अमेरिकेची पर्यावरण एजन्सी, उद्योग आणि विविध प्रतिष्ठानं तसेच विकास बँकांतर्फे दिल्या जाणाऱ्या निधीद्वारे कार्य करते.

आपलं आरोग्य आपण श्वसनाद्वारे घेत असलेल्या हवेवर अवलंबून असतं. हवेच्या गुणवत्तेतील घट लोकांच्या लवकर मृत्यू होण्याबरोबरच विविध प्रकारचे हृदयविकार आणि श्वसनविकारांना आमंत्रण देते. आणि त्याचबरोबर दम्यासारखे विविध जुनाट रोग वाढून शाळा, कॉलेज आणि कार्यालयीन अनुपस्थिती वाढू लागते. वायुप्रदूषणास क्षेत्र, जात, पात, धर्म, लिंग, वर्ग कशाचंही बंधन नाही. गेल्या अनेक दशकांमध्ये आरोग्यतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांच्या लक्षात आलंय की, खराब हवेमुळे आरोग्य आणि जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. परंतु एकीकडे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, बदलत्या आकांक्षा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी वाढता दबाव आणि घटती साधनं यामुळे विकास प्रक्रियेवरही विपरीत परिणाम होतोय. वाढत्या नागरीकरणामुळे वाढत्या परिवहनाची गरज यामुळे वाढती लोकसंख्या याचाही बाह्य वायुप्रदूषण वाढण्यावर परिणाम होतो. तसेच घरांमध्ये कोळसा, जैवमार (बायोमास) म्हणजे लाकडं इत्यादी वापरण्यामुळेदेखील हवेची गुणवत्ता घसरते.
म्हणूनच जगामध्ये २०१७ साली वायुप्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूपैकी निम्मे मृत्यू भारत आणि चीन या दोन प्रचंड लोकसंख्या आणि वाढत्या विकास आकांक्षा असलेल्या देशात होताना दिसतात. असं अहवालातील आकडेवारीतून लक्षात येतं. मृत्यूस कारणीभूत ठरू शकणाºया विविध जोखीम घटकांमध्ये कुपोषण, अल्कोहोलचा वापर आणि कमी शारीरिक काम वा शैथिल्य यापेक्षा वायुप्रदूषण हा अधिक मृत्यूस कारणीभूत ठरणारा घटक आहे. भारतात ती मृत्यूस कारणीभूत ठरणारी तिसºया क्रमांकाची आरोग्य जोखीम आहे. धूम्रपानापेक्षाही तिचा क्रमांक वरचा आहे. प्रदूषणाशी संबंधित मृत्यू जास्त आहेत. २०१७ मध्ये स्ट्रोक, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, फुप्फुस विकार यामुळे किमान कोटी भारतीय मरण पावले. त्याचा संबंध घरातील आणि घराबाहेरील प्रदूषणाशी होता. त्यापैकी ३० लाख लोक पी.एम. २.५ मुळे मरण पावले. हवेतील अतिसूक्ष्म तरंगणाºया धूलिकणांच्या स्वरूपात दोन प्रकारची प्रदूषकं यासाठी कारणीभूत आहेत. वैज्ञानिक भाषेत त्याचा व्यास २.५ मायक्रोमीटर्सपेक्षा कमी असतो. तसेच अगदी जमिनीलगत ओझोनचे प्रमाण जास्त असणंदेखील यात भर घालतं. जगातील सर्वाधिक वायुप्रदूषित क्षेत्रात भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश अशा दाट लोकवस्ती असलेल्या दक्षिण आशियाचा समावेश आहे. चीनने सुरुवातीला यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले. त्यातून आता त्यांना चांगलं यश लाभताना दिसतंय. या अहवालातील अध्ययनातून भारतानेही केलेल्या प्रयत्नांचं कौतुक आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मॅक्सलरेटेड भारत सेज-६, स्वच्छ वाहनांची प्रमाणकं यामुळे फरक पडू लागल्याचं अहवालात नमूद केलंय.जगात एकूणच जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा वातावरणातील पीएम २.५ चं प्रमाण तसं जास्तच आहे. २०१७ मध्ये जगातील ९२ टक्के लोक जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त पीएम असलेल्या भागात राहत होते, असं अहवालातून दिसतं. हवामान बदलाविरुद्धच्या महापद्धतीतील हवा प्रदूषणाविरुद्धची लढाई खूपच महत्त्वाची आहे. इंधनाऐवजी इतर ऊर्जास्रोतांचा (अर्थात कमी प्रदूषण करणाºया) वापर दरवर्षी मृत्यू कमी करेल. मानव जातीच्या समग्र भवितव्यासाठी प्रदूषण कमी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मानवी आरोग्यच नव्हे तर हवामानावरही सकारात्मक प्रभाव पडेल.(विज्ञान पत्रकार)

टॅग्स :pollutionप्रदूषण