शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

विकास आणि वाढते वायुप्रदूषण : एक पॅराडॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:20 IST

‘विकासाची किंमत प्रदूषणाद्वारे चुकवावी लागते’ असा अनुभव विकसित राष्ट्रांबरोबरच विकसनशील राष्ट्र राहिलेल्या विकासप्रवण भारतासारख्या देशातही येतो.

- शैलेश माळोदे‘विकासाची किंमत प्रदूषणाद्वारे चुकवावी लागते’ असा अनुभव विकसित राष्ट्रांबरोबरच विकसनशील राष्ट्र राहिलेल्या विकासप्रवण भारतासारख्या देशातही येतो. एका जागतिक स्तरावरील ताज्या अहवालानुसार २०१७ मध्ये सुमारे १२ लक्ष लोक घराबाहेरील आणि घराच्या आतील प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडले. ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०१९’ या नावाने प्रकाशित या अहवालातील अध्ययन निष्कर्षानुसार सध्याच्या स्तरावरील वायुप्रदूषणातील वाढणारं प्रमाण पाहता दक्षिण आशियामधील प्रत्येक मुलाचं सरासरी आयुर्मान सुमारे अडीच वर्षांनी कमी होण्याची भीती आहे. जागतिक स्तरावर ती संख्या २० महिने असेल. हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे हा अहवाल दरवर्षी प्रकाशित होतोय. ही संस्था स्वतंत्र, नफाविरहित संशोधन करणारी असून अमेरिकेची पर्यावरण एजन्सी, उद्योग आणि विविध प्रतिष्ठानं तसेच विकास बँकांतर्फे दिल्या जाणाऱ्या निधीद्वारे कार्य करते.

आपलं आरोग्य आपण श्वसनाद्वारे घेत असलेल्या हवेवर अवलंबून असतं. हवेच्या गुणवत्तेतील घट लोकांच्या लवकर मृत्यू होण्याबरोबरच विविध प्रकारचे हृदयविकार आणि श्वसनविकारांना आमंत्रण देते. आणि त्याचबरोबर दम्यासारखे विविध जुनाट रोग वाढून शाळा, कॉलेज आणि कार्यालयीन अनुपस्थिती वाढू लागते. वायुप्रदूषणास क्षेत्र, जात, पात, धर्म, लिंग, वर्ग कशाचंही बंधन नाही. गेल्या अनेक दशकांमध्ये आरोग्यतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांच्या लक्षात आलंय की, खराब हवेमुळे आरोग्य आणि जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. परंतु एकीकडे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, बदलत्या आकांक्षा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी वाढता दबाव आणि घटती साधनं यामुळे विकास प्रक्रियेवरही विपरीत परिणाम होतोय. वाढत्या नागरीकरणामुळे वाढत्या परिवहनाची गरज यामुळे वाढती लोकसंख्या याचाही बाह्य वायुप्रदूषण वाढण्यावर परिणाम होतो. तसेच घरांमध्ये कोळसा, जैवमार (बायोमास) म्हणजे लाकडं इत्यादी वापरण्यामुळेदेखील हवेची गुणवत्ता घसरते.
म्हणूनच जगामध्ये २०१७ साली वायुप्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूपैकी निम्मे मृत्यू भारत आणि चीन या दोन प्रचंड लोकसंख्या आणि वाढत्या विकास आकांक्षा असलेल्या देशात होताना दिसतात. असं अहवालातील आकडेवारीतून लक्षात येतं. मृत्यूस कारणीभूत ठरू शकणाºया विविध जोखीम घटकांमध्ये कुपोषण, अल्कोहोलचा वापर आणि कमी शारीरिक काम वा शैथिल्य यापेक्षा वायुप्रदूषण हा अधिक मृत्यूस कारणीभूत ठरणारा घटक आहे. भारतात ती मृत्यूस कारणीभूत ठरणारी तिसºया क्रमांकाची आरोग्य जोखीम आहे. धूम्रपानापेक्षाही तिचा क्रमांक वरचा आहे. प्रदूषणाशी संबंधित मृत्यू जास्त आहेत. २०१७ मध्ये स्ट्रोक, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, फुप्फुस विकार यामुळे किमान कोटी भारतीय मरण पावले. त्याचा संबंध घरातील आणि घराबाहेरील प्रदूषणाशी होता. त्यापैकी ३० लाख लोक पी.एम. २.५ मुळे मरण पावले. हवेतील अतिसूक्ष्म तरंगणाºया धूलिकणांच्या स्वरूपात दोन प्रकारची प्रदूषकं यासाठी कारणीभूत आहेत. वैज्ञानिक भाषेत त्याचा व्यास २.५ मायक्रोमीटर्सपेक्षा कमी असतो. तसेच अगदी जमिनीलगत ओझोनचे प्रमाण जास्त असणंदेखील यात भर घालतं. जगातील सर्वाधिक वायुप्रदूषित क्षेत्रात भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश अशा दाट लोकवस्ती असलेल्या दक्षिण आशियाचा समावेश आहे. चीनने सुरुवातीला यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले. त्यातून आता त्यांना चांगलं यश लाभताना दिसतंय. या अहवालातील अध्ययनातून भारतानेही केलेल्या प्रयत्नांचं कौतुक आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मॅक्सलरेटेड भारत सेज-६, स्वच्छ वाहनांची प्रमाणकं यामुळे फरक पडू लागल्याचं अहवालात नमूद केलंय.जगात एकूणच जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा वातावरणातील पीएम २.५ चं प्रमाण तसं जास्तच आहे. २०१७ मध्ये जगातील ९२ टक्के लोक जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त पीएम असलेल्या भागात राहत होते, असं अहवालातून दिसतं. हवामान बदलाविरुद्धच्या महापद्धतीतील हवा प्रदूषणाविरुद्धची लढाई खूपच महत्त्वाची आहे. इंधनाऐवजी इतर ऊर्जास्रोतांचा (अर्थात कमी प्रदूषण करणाºया) वापर दरवर्षी मृत्यू कमी करेल. मानव जातीच्या समग्र भवितव्यासाठी प्रदूषण कमी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मानवी आरोग्यच नव्हे तर हवामानावरही सकारात्मक प्रभाव पडेल.(विज्ञान पत्रकार)

टॅग्स :pollutionप्रदूषण