शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

'त्या' वृद्धेच्या हत्येसाठी दोषी कुणाला धरायचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:09 PM

गुन्हा कोणताही असो, त्यामागे स्वार्थ वृत्ती दडलेली असते. कोणाला शरीराची लालसा असते, कोणाला मालमत्तेची, तर कोणाला पैसा आणि दागिन्यांची. मोह आवरत नाही आणि मग तो कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही. 

विनायक पात्रुडकर

गुन्हा कोणताही असो, त्यामागे स्वार्थी वृत्ती दडलेली असते. कोणाला शरीराची लालसा असते, कोणाला मालमत्तेची, तर कोणाला पैसा आणि दागिन्यांची. मोह आवरत नाही आणि मग तो कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही. लहान मुलं, अंथरूणाला खिळलेले शरीर, अशा कोणत्याही अवस्थेतील व्यक्तीचा बळी स्वार्थासाठी जातो. सतत जागी असलेली मुंबईसारखी शहरेदेखील अशा घटनांसाठी अपवाद राहिलेली नाहीत. या मायानगरीत कर्ज फेडण्यासाठी एका जोडप्याने ७० वर्षीय महिलेचा गळा दाबून खून केला. ही महिला एकटी राहत होती. तिच्याकडे खूप दागिने होते. आरोपी जोडप्याचे या महिलेकडे रोजचे जाणे-येणे होते. कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी त्या महिलेचे दागिने चोरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महिलेने त्याला विरोध केला. अखेर त्या दोघांनी महिलेचा खून केला. 

मुंबईपोलिसांची ख्याती जगभरात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना पोलिसांनी तयार केल्या आहेत. गेली दोन वर्षे या उपाय योजनांची घोषणा दणक्यात केली जाते. घरात एकट्या असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी पोलीस जाईल, त्यांची चौकशी करेल, असेही पोलिसांनी जाहीर केले आहे. असे असताना ७० वर्षीय महिलेच्या हत्येसाठी नेमके दोषी कोणाला धरावे. हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे की सर्वसामान्य नागरिकांचा निष्काळजीपणा. २६/११ चा हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा अधिक अद्ययावत झाली. नवनवीन तंत्रज्ञान पोलीस ताफ्यात दाखल झाले. नाक्या नाक्यावर सीसीटीव्ही लागले. तरीही घरात एकट्या असलेल्या महिलेचा जीव जाणे हे पोलिसांना शोभनीय नाही. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही जबाबदारीने वागायला हवे. वयोवृद्ध महिला घरात एकटी राहते. तिच्याजवळ दागिने कशासाठी होते. बँकेत दागिने ठेवण्याची व्यवस्था असते. वेळेला आपण ते बँकेतून काढूही शकतो. मग घरात दागिने का ठेवावेत, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येणार नाही. जीवघेण्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतात, त्यासाठी नागरिकांचीही मदत आवश्यक असते. ज्येष्ठ नागरिक लहान मुलांप्रमाणे असतात. त्यांना काय द्यावे, काय देऊ नये, त्यांच्याजवळ काय असायला हवे किंवा त्यांना एकटे सोडू नये, अशी काळजी घ्यावी लागते. यात कसूर केल्यास अनुचित प्रकार घडतो. तेव्हा भविष्यात पैशासाठी ज्येष्ठ नागरिकाचा बळी जाऊ नये, यासाठी सर्वांनीच सर्तक राहायला हवे. कुटुंब, शेजारी, अशा प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सतर्क राहायला हवे. तरच अशा घटना टाळात येतील. अन्यथा मुली व महिलांसाठी असुरक्षित असल्याचा ठपका मुंबईला लागलाच आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचीही भर पडेल.

टॅग्स :MumbaiमुंबईPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी