शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

संपादकीय: कोरोना शैक्षणिक वर्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 07:09 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने चालू शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबर ते ३१ ऑगस्ट असे असेल, असे जाहीर केले आहे. म्हणजेच सुट्या कमी करून दहा महिन्यांत शैक्षणिक वर्ष पूर्ण केले जाणार आहे. वर्ष वाचविण्यासाठी हा पर्याय योग्य असला, तरी भारतातील विविध प्रदेशांतील हवामान पाहता ते सुरळीत पार पाडणे मोठे दिव्य असेल.

विद्यापीठ अनुदान आयोग आता चालू शैक्षणिक वर्षाच्या निर्णयाप्रती ठाम भूमिका घेणार, असे स्पष्ट होऊ लागले आहे. आपत्तीजनक परिस्थितीत खूप सावध पावले टाकणे महत्त्वाचे असते. भारतात मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरायला सुरू झाला. तोवर २०१९-२० चे शैक्षणिक वर्ष संपले नव्हते. वर्षाच्या अखेरच्या अनेक परीक्षा रोखल्या गेल्या होत्या. परिणामी पुढील प्रवेशाची प्रक्रिया थांबली गेली. दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशाबशा घेण्यात आल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा आता कोठे सुरू करण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण होणार, त्यांचा निकाल जाहीर होणार आणि त्यांच्या पुढील अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

दहावी, बारावी आणि सर्व प्रकारच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्याशिवाय पुढील अभ्यासक्रमच चालू शकत नाहीत, हा सर्वांत मोठा अडथळा आहे. तेवढ्या परीक्षा तातडीने आणि पुरेपूर खबरदारी घेऊन पार पाडायला हव्या होत्या. कर्नाटकसह काही राज्यांनी तसाच निर्णय घेऊन नव्या शैक्षणिक वर्षाला आकार दिला. या तीन परीक्षा वगळून उर्वरित परीक्षा न घेता मागील सत्रातील गुणानुसार निकाल द्यायचा होता. मागील सत्रात नापास झालेल्या किंवा एखादा विषय राहिलेल्या विद्यार्थ्याला आताही नापास करण्याचा पराक्रम शिवाजी विद्यापीठाने केला. अशा विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळालेली असते. मागील सत्रात एका विषयात नापास झाला तर तो पुन्हा नापासच होणार, हे गृहीत धरून परीक्षा न घेता निकाल कसा लावता येईल? उच्चशिक्षण देणाऱ्या किंवा विद्यापीठांसारख्या संस्था चालविणाऱ्यांना अशा महामारीच्या काळात येणाऱ्या संकटावर मात करता येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. काही उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद ठेवण्यात आले असतील; पण अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी हजारो हात राबतच होते. देशांत कोठेही भूकबळी पडला नाही. औषधांविना माणसे तडफडून मरण पावली नाहीत. घरा-घरांत दररोज पाणीपुरवठा होतो, वीजपुरवठा होतो. दूध, भाजीपाला मिळतो आहे. पुरेशी काळजी घेऊन अत्यावश्यक सेवा देणे चालू आहे. तसे शैक्षणिक क्षेत्रांविषयी ऑनलाइनसारखे प्रयत्न चालू झाले. विद्यार्थी, शिक्षण संस्था आणि विद्यापीठ पातळीवर खास प्रयत्न झाले नाहीत.

आपल्या देशाच्या अनेक भागांत ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधांचा अभाव, गरिबीमुळे त्या सुविधांपर्यंत पोहोचण्यात येणाºया अडचणी आदींचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने पदविका, पदवी किंवा इतर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देताना अंतिम परीक्षा होणे अनिवार्य आहे, हे अनेकवेळा स्पष्ट केले. मात्र, त्या कशा घ्यायच्या, विद्यार्थ्यांचा घोळका कसा टाळता येईल, याचा गांभीर्याने विचार केला नाही. तसे मार्गदर्शनही केले नाही. कर्नाटक राज्याने दहावी-बारावीच्या परीक्षा घेतांना सर्व पातळीवर सर्व साधनांचा वापर केला. प्रत्येक विद्यार्थ्याला सोयीनुसार राज्यभरात कोठेही परीक्षा देण्याची मुभा दिली. परिणामी ९८ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. तसाच प्रयत्न इतर राज्यांनी करायला हवा होता. तो एक उत्तम पॅटर्न ठरला आहे. एस.टी. गाड्या किंवा रेल्वेने मोफत प्रवासाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली.

विद्यापीठ अनुदान आयोग आणि काही राज्य सरकारे यांच्यात परीक्षा घेण्यावरून वादही उत्पन्न झाले. त्यात केंद्रांनी कृतिशील हस्तक्षेप करायला हवा होता. शेवटी मार्ग निघालाच नाही. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने चालू वर्षाचे शैक्षणिक वर्षच १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. ते पुढील वर्षाच्या ३१ आॅगस्ट अखेरीस संपणार आहे. म्हणजेच सुट्या कमी करून दहा महिन्यांत शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे. हा पर्याय चालू शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी योग्य असला, तरी भारतातील विविध प्रदेशांतील हवामान पाहता कठीण जाणार आहे.

शिवाय कोरोनाची भीती पाठ सोडणार नाही. सर्व नियम-निकष पाळून पुढे जावेच लागणार असे दिसते. अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षही अडचणीत येऊ शकते. हे शैक्षणिक वर्ष ‘कोरोना’चे आहे. त्याच्यासह लोकशिक्षण आणि प्रचलित शिक्षण पूर्ण करण्याचा धडा गिरविला पाहिजे. याला पर्याय नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण