शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

विमानातील संगणकाची चूक ठरते मृत्यूला जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:24 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान दौडीमुळे गेल्या दहा-वीस वर्षांत जगातील सर्वच बाबींचे स्वरूप आरपार बदलून गेले.

- डॉ. दीपक शिकारपूर माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान दौडीमुळे गेल्या दहा-वीस वर्षांत जगातील सर्वच बाबींचे स्वरूप आरपार बदलून गेले. संगणकांना आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये कितपत प्रवेश द्यावा, त्यांना कितपत निर्णयस्वातंत्र्य द्यावे, उद्या संगणक मानवाच्याच डोक्यावर बसणार नाही ना... अशा अनेक मुद्द्यांवर सतत चर्चा होते आहे. हे सर्व अतीव महत्त्वाचे झाले. लायन एअर कंपनीचे विमान इंडोनेशियामध्ये उडाल्यानंतर काही काळातच समुद्रात कोसळून त्यामधील सर्व प्रवासी व कर्मचारी मिळून १८९ व्यक्तींना जलसमाधी मिळाली. असे निष्पन्न होत आहे की बोइंग कंपनीने त्यामध्ये बसवलेली टउअर (मॅनूव्हरिंग कॅरेक्टरिस्टिक आॅगमेंटेशन सिस्टिम) ही वैमानिकाला साहाय्य करणारी सॉफ्टवेअर प्रणाली बिघडल्याने ही दुर्घटना घडली.सद्यघटनेतले ‘बोइंग ७३७ मॅक्स एट्’ हे विमान लायन एअरच्या ताफ्यात तीन महिन्यांपूर्वी दाखल झाले होते. हे विमानच फक्त नवीन नव्हते तर बोइंग कंपनीने त्यामध्ये बसवलेली टउअर (मॅनूव्हरिंग कॅरेक्टरिस्टिक आॅगमेंटेशन सिस्टिम) ही वैमानिकाला साहाय्य करणारी सॉफ्टवेअर प्रणालीही त्यामध्ये प्रथमच वापरात येत होती. आपला विषय असलेल्या फ्लाइट खळ610 वरचा, कॅप्टनच्या बाजूचा, अडअ संवेदक खराब झाल्याचे संबंधित चालकाने, बालीहून निघतानाच जकार्ता विमानतळाला कळवले होते. बालीहून आलेले हे विमान जकार्ताला उतरल्याबरोबर लगेचच ही दुरुस्ती केली गेली होती. परंतु या विमानाची इंजिने, टउअर सॉफ्टवेअर, त्याला माहिती देणारे कोन-संवेदक... ही संपूर्ण यंत्रणाच नवीन असल्याने तिच्याबद्दल सखोल माहिती कोणालाच नव्हती, अगदी देखभाल करणाऱ्यांनासुद्धा! चालकाला तर याबाबतचे प्रशिक्षणही दिलेले नव्हते! अशा स्थितीत, संवेदक दुरुस्त झाल्यावर, हेच विमान दुसºया म्हणजे ‘त्या’ दिवशी सकाळी जकार्ताहून उडाले.थोड्या वेळाने संवेदकाने नियंत्रक संगणकाला सांगितले की, विमान स्टॉल होण्याच्या मार्गावर आहे. त्यानुसार, पुढच्याच सेकंदाला त्याने विमानाचे नाक खाली केले. दरम्यान, काय होते आहे हे चालकाच्या ध्यानात आले. परंतु त्याने संगणकाची चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेस्तोवर वेळ निघून गेली होती आणि विमानाने समुद्राच्या दिशेने सूर मारलीही होती. बरे विमानाने हवेत पुरेशी उंची गाठलेली नव्हती त्यामुळे सूर मारणारे विमान पुन: वर घेण्यासाठी आवश्यक असलेला हवेचा दाब मिळू शकत नव्हता. हे विमान संगणकाने अक्षरश: समुद्रात घातले, त्यामधील १८९ लोकांसहित! काही दिवसांनी बोइंग कंपनीने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले की, कोन-संवेदकाच्या संदर्भात काहीही समस्या निर्माण झाली तर त्यावरचा सर्वप्रथम रामबाण उपाय म्हणजे संगणक चक्क बंद (स्विच आॅफ) करणे! चालकाला ही बाब माहीत नव्हती असे गृहीत धरायला हरकत नाही. कारण हा उपाय त्याला माहीत असता तर अर्थातच त्याने तो वापरला असता असेही म्हणता येईल. त्याने, विमानाचे नाक (विनाकारण) खाली जाऊ लागल्यावर, संगणकाला बाजूला सारून स्वत:च्या हाती नियंत्रण घेतले असते तर पुढच्या त्या अतिमहत्त्वाच्या एका सेकंदात कदाचित हे दुर्दैवी चित्र पालटलेही असते! या घटनेनंतर एका वेगळ्या (पण तसे पाहिले तर संबंधित) मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे, ‘ज्या गोष्टी मनुष्य स्वत:च्या कौशल्यावर करू शकतो त्या सगळ्याच संगणकाच्या हाती सोपवण्याची खरेच गरज आहे काय?’ आणि जर संगणकाच्या चुकीने मृत्यू अथवा गुन्हे घडले तर त्याला जबाबदार कोण?

(उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक)