शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

‘झाडू’न पराभव!

By admin | Updated: April 26, 2017 23:17 IST

देशातील सध्याच्या राजकीय पर्यावरणाबद्दल कोणी कितीही नाकं मुरडली, तरी मोदींची त्सुनामी अजून कायम असून, ती रोखण्याची ताकत सध्यातरी कोणाकडे नाही

देशातील सध्याच्या राजकीय पर्यावरणाबद्दल कोणी कितीही नाकं मुरडली, तरी मोदींची त्सुनामी अजून कायम असून, ती रोखण्याची ताकत सध्यातरी कोणाकडे नाही, हे वास्तव दुर्लक्षण्याजोगे नक्कीच नाही. उत्तर प्रदेशातील ‘न भूतो...’ अशा यशानंतर भाजपाने दिल्लीतील तीन महापालिकांमध्ये मिळविलेला दणदणीत विजय याचीच साक्ष देणारा आहे. दिल्लीत सरकार असताना आणि मोफत वीज-पाणी देण्याचा दावा करूनही आम आदमी पार्टीचा झालेला ‘झाडू’न पराभव मान्य करण्याऐवजी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पराभवाचे खापर पुन्हा ‘इव्हीएम’वर फोडले आहे. वास्तावाचे भान हरपले की, अशीच बहाणेबाजी केली जाते. दिल्लीतील जनतेने मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने केजरीवाल यांच्या हाती देशाची राजधानी असलेल्या ‘दिल्ली’ची सूत्रे सोपविली, मात्र भांडकुदळ स्वभावामुळे पहिल्या दिवसापासून केजरीवाल कुरकुर करत राहिले. कधी उप राज्यपालांच्या तर कधी केंद्रातील मोदी सरकारच्या नावे त्यांचे रडगाणे सुरूच आहे. विधानसभा जिंकली, तिथे मनपा काय चीज? हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला.
दिल्लीतील तीन महापालिकांमधील एकूण २७० जागांपैकी भाजपाने १८५ जागा जिंकून विजयाची मालिका कायम ठेवली आहे. केजरीवाल यांच्या ‘आप’ला केवळ ४२ जागा मिळाल्या. जर भाजपाचा विजय इव्हीएममुळे असेल तर, मग या ४२ जागा ‘आप’ला कशा मिळाल्या? का तिथेही काही गडबड झाली? केजरीवाल यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. केजरीवालांचे गुरु अण्णा हजारे यांनीदेखील असाच सल्ला दिला आहे. केजरीवाल यांना सत्तेची धुंदी चढली आहे, अशी जरा अधिकची बोचरी टीका अण्णांनी केली आहे. अण्णांच्या या त्राग्यामागे बरीच कारणं आहेत. केजरीवाल मुख्यमंत्री झाले तेव्हा अण्णांचा सूर वेगळा होता. असो. राजकारणात हार-जीत होतच असते. २०१४पर्यंत भाजपाने अनेक पराभव पत्करले आहेत. निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना जागा किती मिळाल्या, यापेक्षाही टक्केवारी किती वाढली, यातच ते समाधान मानत. आज ती वेळ काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर आली आहे. दिल्ली मनपात काँग्रेस जिंकेल, असा दावा कोणीही केलेला नव्हता. कारण हा पक्ष पुरता आत्मविश्वास गमावून बसलेला आहे.दिल्लीतील काँग्रेसच्या पराभवास शीला दीक्षित आणि अजय माकन या नेत्यांमधील भांडणंदेखील कारणीभूत आहेत. असे सवतेसुभे खालसा होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन येणे नाही !