शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कुठे केनेडी, कुठे आपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 06:21 IST

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायद्यासारखा साऱ्या देशात अंमलात येतो. शिवाय तो मूलभूत अधिकारांमधील लिंगभेद विरहित समतेच्या मुद्द्याला धरून दिला असेल तर त्याची अंमलबजावणीही कठोरपणे केली जाणे आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायद्यासारखा साऱ्या देशात अंमलात येतो. शिवाय तो मूलभूत अधिकारांमधील लिंगभेद विरहित समतेच्या मुद्द्याला धरून दिला असेल तर त्याची अंमलबजावणीही कठोरपणे केली जाणे आवश्यक आहे.केरळातील साबरीमाला या प्राचीन मंदिरात स्त्रियांना मुक्त प्रवेश करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही त्या मंदिराचे कर्मठ पुजारी, पुरोहित व अधिकारी त्यांना तो मिळू देत नसतील आणि तशा अडवणुकीचा प्रयत्न करणाºया साडेतीन हजार लोकांना सरकारला अटक करावी लागत असेल तर तो देशात आपली राज्यघटना रुजविण्याच्या कामात आपल्याला आलेले अपयश सांगणारा प्रकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायद्यासारखा साºया देशात अंमलात येतो. शिवाय तो मूलभूत अधिकारांमधील लिंगभेद विरहित समतेच्या मुद्द्याला धरून सर्वोच्च न्यायालयाने दिला असेल तर त्याची अंमलबजावणीही कठोरपणे केली जाणे आवश्यक आहे. कित्येक वर्षे देशातील स्त्री संघटना व राजकीय पक्ष ही मागणी करीत आहेत. परंतु परंपरेने स्त्रियांना कमी लेखण्याचे मनात असलेल्यांचा एक वर्ग देशात आहे आणि कर्मठांच्या या वर्गाला बळ देणारे व त्याचा वापर आपल्या निवडणुकीसाठी करायला सज्ज असलेले पक्षही देशात आहेत. ते व त्यांचे कार्यकर्तेच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारून मंदिरात प्रवेश करणाºया स्त्रियांना अडविण्याचा उद्योग करीत आहेत. सर्वोच्च न्यायालय आदेशच तेवढा देऊ शकते. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सरकारकडे असते. पण त्यासाठी केंद्रातले सरकार मजबूत व पुरोगामी विचारांना वाहिले असावे लागते. जॉन एफ. केनेडी हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना दक्षिणेतील एका वर्णविद्वेषी राज्याने एका कृष्णवर्णीय विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारला होता. मात्र तो देण्याचे आदेश तेथील सुप्रीम कोर्टाने दिले. त्या राज्याने मात्र तो प्रवेश कोणत्याही परिस्थितीत दिला जाणार नाही असे घोषित केले तेव्हा केनेडींनी देशाच्या सैन्याची एक मोठी बटालियनच त्या राज्यात व त्या शाळेभोवती नेऊन उभी केली. परिणाम दरदिवशी तो मुलगा सायकलवरून शाळेत जात असताना त्याच्या मागे त्याच्या रक्षणार्थ अमेरिकी लष्कराचा एक मोठा रणगाडाच शाळेपर्यंत जाताना जगाने पाहिला. मात्र त्यासाठी केनेडींचे मन व त्यांच्याएवढ्या जबर पुरोगामी व समतावादी निष्ठा लागतात. भारतात सत्तारूढ असलेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष अजून मनाने विसाव्या शतकातच यायचा राहिला आहे. स्त्रियांना मंदिरात प्रवेश नसावा हा परंपरेचा अभिमान त्याला निवडणुकीत विजय मिळवून देतो असा त्याचा विश्वास आहे. तसाही तो पक्ष गंगेचे पाणी, राम मंदिराच्या विटा व बाबरीचा विध्वंस असे धार्मिक म्हणविणारे उद्योग करीतच आता सत्तेवर पोहोचला आहे. स्त्रिया, दलित, अल्पसंख्य व अन्य धर्मीयांवर त्याचा असलेला रोष व त्यांना बहुसंख्येतील पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार प्राप्त होऊ न देणारी त्याची मानसिकता आता साºयांना ठाऊक झाली आहे. त्यामुळे देशातील स्त्रियांना सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला तरी भाजपाचे राजकारण तो त्यांच्यापर्यंत पोहोचू देणार नाही ही अटकळ अनेकांच्या मनात होती, तीच आता खरीही झाली आहे. या साºया विपरीत प्रकारावर भाष्य करताना भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी तर न्यायालयाला शहाणपण शिकविण्याचा आव आणून ‘जो आदेश अंमलात आणता येत नाही तो तुम्ही देताच कशाला’ असा प्रश्न त्यांनी न्यायालयाला विचारला आहे. म्हटले तर हा प्रश्न विनोदी आहे आणि तो घटनेशी द्रोह करणाराही आहे. न्यायालयाने प्रत्येकच गुन्ह्याच्या विरोधात आजवर आदेश दिले आहेत. तरीही गुन्हे घडतात. त्यामुळे अमित शहांचे शहाणपण मान्य केले तर न्यायालयांना त्यांची कामेच बंद करावी लागतील. त्याहून महत्त्वाचा प्रश्न भाजपाच्या स्त्रीविषयक मानसिकतेचा आहे. शहा यांची मानसिकता सुषमा स्वराज, मनेका गांंधी, हेमामालिनी किंवा वसुंधरा राजे या त्यांच्या पक्षातील महिला नेत्यांना मान्य आहे काय, हाच खरा प्रश्न आहे. या स्थितीत देशातील महिलांनी मंदिराबाहेरच राहणे शहाणपणाचे ठरेल की सरकार घटनेतील मूल्यांची कठोर अंमलबजावणी करून मंदिर प्रवेशाबाबतचा लिंगभेद दूर करील, हा आताचा खरा प्रश्न आहे आणि तो राजकीय व सामाजिक व्यासपीठांनीही सोडवायचा आहे.

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीKeralaकेरळAmit Shahअमित शाहBJPभाजपाWomenमहिला