शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांचे पक्षांतर काँग्रेसला नाउमेद करणारे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 07:53 IST

नांदेड ते दिल्लीची वळणे, दशकानुदशके काँग्रेसचेच म्हणून ओळखले जाणारे आणि आता उजवा रस्ता धरणारे चव्हाण हे दुसरे घराणे. आधी मुंबईत मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला  

काल-आज महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण नव्या वळणावर पोहाेचले आहे. लोकसभेतील सलग पंचवीस वर्षांची कारकीर्द थांबवून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी राज्यसभेच्या वाटेवर आहेत. त्यांचा राजस्थानमधून अर्ज हे महत्त्वाचे राजकीय वळण आहे. पती राजीव यांच्या हत्येनंतर आठ वर्षांनी सोनिया राजकारणात आल्या. राजीव यांच्या अमेठी मतदारसंघातून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. नंतर सासू इंदिरा व सासरे फिरोज गांधी यांच्या रायबरेलीचे त्या प्रतिनिधित्व करू लागल्या. आता त्या राज्यसभेत जाताहेत. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्यासोबत जया बच्चन, सुष्मिता देव, सागरिका घोष, मेधा कुलकर्णी, ममताबाला ठाकूर, माया नरोलिया यादेखील राज्यसभेचा उंबरठा ओलांडू पाहत आहेत. राजकारणाचे दुसरे वळण महाराष्ट्रात व तेदेखील काँग्रेसशी संबंधित आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पक्ष व आमदारकीचा राजीनामा, चोवीस तासांत भारतीय जनता पक्षात प्रवेश, लगोलग राज्यसभेची उमेदवारी या घडामोडींनी पुन्हा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस पक्षाशी स्वत:ची चाळीस तर चव्हाण कुटुंबाची सत्तर वर्षांची नाळ का तोडली वगैरेंबद्दल आपण काही बोलणार नाही, असे स्वत: अशोक चव्हाणांनीच सांगितल्याने पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला किंवा इतरांनी कितीही संताप व्यक्त केला तर पुढे काही होणार नाही. अर्थात रविवारी सायंकाळपर्यंत पक्ष तसेच महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये व्यस्त असणारे, डिसेंबरमध्ये नागपूर येथे झालेल्या स्थापना दिनाच्या सभेची जबाबदारी उचलणारे, भारत जोडो यात्रा यशस्वी करणारे, सध्याच्या भारत जोडो न्याय यात्रेची समरसून तयारी करणारे अशोक चव्हाण अचानक पक्ष साेडतात हे सर्वांसाठीच धक्कादायक होते. त्यातही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची शकले पडत असताना अभेद्य राहिलेल्या, त्याचा तोरा मिरविणाऱ्या काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पक्षांतर नाउमेद करणारे आहे.

दशकानुदशके काँग्रेसचेच म्हणून ओळखले जाणारे आणि आता उजवा रस्ता धरणारे चव्हाण हे दुसरे घराणे. आधी मुंबईत मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जवळ केली. दिवंगत मुरली देवरा तसेच मिलिंद यांनी केंद्रात मंत्रिपदे सांभाळलेली. मिलिंद हा राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडचा एक चेहरा. त्या पक्षांतराची शाई वाळण्याआधीच अशोक चव्हाण यांनी स्फोट घडविला. भूषविलेल्या पदांचा विचार केला तर नांदेडचे चव्हाण घराणे देवरा यांच्यापेक्षा काकणभर सरस. मराठवाड्याचे पाणीदार नेतृत्व, दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणेच अशोक चव्हाण यांनीही दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. शंकरराव चव्हाण यांनीही एकदा वेगळी वाट धरली होती. पण, ती इंदिरा गांधींच्याच इशाऱ्यावर. अशोकरावांसारखी त्यांनी काँग्रेसच्या मूळ प्रवाहापासून फारकत घेतली नव्हती.

दरम्यान, मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. देवरा, सिद्दीकी, चव्हाण ही सगळी जुळवाजुळव लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून आणि तीदेखील ‘साम, दाम, दंड, भेद’ या परिचित नीतीनुसार सुरू आहे, यात शंका नाही. लागोपाठचे सर्व्हे दाखवतात की लोकसभेच्या जागांबाबत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. छत्रपती शिवरायांचे नाव आणि मराठा चेहरा ते आव्हान पेलण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठीच सुरुवातीला नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपने जवळ केले. ते पुरेेेसे नाही हे पाहून शिवसेना व राष्ट्रवादीला भगदाड पाडले आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेतले, तरीही राणे वगळता इतर नेते राज्यापुरतेच मर्यादित आहेत आणि दिल्ली दरबारी काही उपयोग होत नाही हे स्पष्ट झाले तेव्हा, लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेले नारायण राणे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना अशोक चव्हाण यांच्या रूपाने उच्चविद्याविभूषित कुशल प्रशासक नेता भाजपने आपल्या तंबूत आणला.

चव्हाण यांच्यासोबत भाजपने चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूड मतदारसंघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी व नांदेडचेच डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिलिंद देवरा, तर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना रिंगणात उतरविले आहे. अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठवायचे ठरवल्याने महाराष्ट्रातील निवडणूक बिनविरोध होईल. या घडामोडींचा तातडीचा अन्वयार्थ हाच, की नारायण राणे यांच्याऐवजी भाजपला अशोक चव्हाण अधिक महत्त्वाचे वाटतात.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस