शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विरोधी पण समंजस

By admin | Published: October 14, 2015 12:16 AM

संदर्भ भले वेगळा असेल पण आता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील समाजातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

संदर्भ भले वेगळा असेल पण आता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील समाजातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. समाजाच्या किंवा समाजातील विशिष्ट वर्ग वा गटाच्या अशा वृद्धिंगत होत चाललेल्या असहनशीलतेची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात घडून गेल्याने ज्याला त्याच समाजातील संवेदनशील घटक म्हणून ओळखले जाते त्या साहित्यिकांनी त्यांना आजवर मिळालेले पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली आहे. अशा साहित्यिकांच्या यादीत रोजच नवनवी नावे जोडली जात असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इंग्रजीतील लेखक सलमान रश्दी यांचेही नाव त्यात जोडले गेले आहे. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल व महात्मा गांधींचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांनीही या साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे. तरीही प्रामुख्याने पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांच्या यादीत बव्हंशी लेखक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळविणारे आहेत. त्यांच्या या प्रतिकात्मक कृतीच्या काहीसा विसंवादी पण समंजस सूर साहित्य अकादमीचाच पुरस्कार प्राप्त केलेल्या हिन्दीतील लेखिका मृदुला गर्ग यांनी काढला आहे. आजवर ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले वा अकादमीचे राजीनामे दिले त्यातील बव्हंशी लोकानी सरकारच्या अनास्थेचा निषेध म्हणून हे पाऊल उचलले असले तरी काहींनी साहित्यिक संस्थांच्या अनास्थेचा निषेध म्हणूनही पुरस्कार परतीची कृती केली आहे. मृदुला गर्ग यांना अशा पद्धतीने साहित्य अकादमीला आणि तिच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांना सरकारशी जोडणे मान्य नाही. साहित्य अकादमी ही एक स्वायत्त संस्था असल्याचे त्यांचे ठाम मत असून याबाबतीत त्यांनी याच अकादमीचे पहिले अध्यक्ष आणि देशाचेही पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा दाखला दिला आहे. पुरस्काराचा निर्णय घेताना, साहित्यिक संस्थांकडून ज्या शिफारसी येतील त्यांचाच आदर केला जाईल व तेव्हां आपल्यातील पंतप्रधान अकादमीच्या अध्यक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार नाही. सबब उभय संस्था भिन्न आहेत. गर्ग यांना याबाबतीत एक अशीही भीती वाटते की, जर अकादमीचे सारेच सदस्य राजीनामे देऊन मोकळे होतील तर मग ते सरकारच्या पथ्यावरच पडेल आणि सरकार स्वत:स अनुकूल लोकांचीच तिथे वर्णी लावून मोकळे होईल. पुरस्कार परत करणारे वा अकादमीचा राजीनामा देणारे साहित्यिक जर सरकार आणि अकादमी यांच्यातील नाते अद्वैताचे मानीत असतील तर मग कोणे एकेकाळी त्यांना मिळालेले पुरस्कार हीदेखील तत्कालीन सरकारने दिलेली खिरापत होती हेही त्यांना मान्य करावे लागेल आणि साहजिकच तेव्हां त्यांनी ज्यांच्याकरवी ओशाळेपण स्वीकारले त्यांनाच आता ते आपल्या कृतीने ओशाळे करीत आहेत. त्यात नव्या सरकारचा काहीएक संबंध नाही.