शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Budget 2019: मोदी सरकारकडून केवळ शब्दांची उधळपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 04:40 IST

गेली पाच वर्षे फक्त कॉर्पोरेट उद्योगपतींचे चोचले पुरवून झाल्यावर निवडणुकीच्या तोंडावर मोदींना गरीब व मध्यमवर्गीयांची आठवण झाली आहे.

- राजेेंद्र काकोडकरगेली पाच वर्षे फक्त कॉर्पोरेट उद्योगपतींचे चोचले पुरवून झाल्यावर निवडणुकीच्या तोंडावर मोदींना गरीब व मध्यमवर्गीयांची आठवण झाली आहे. आतापर्यंत मोठ्या उद्योगपतींना २ टक्के कमी व्याजदराने कर्जे पुरवून ३ लाख कोटी रु पयांचा फायदा करून दिला आहे; जो पैसा मध्यमवर्गीय व ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांकडून हिसकावला गेला आहे. तसेच मोठ्या उद्योजकांच्या ११.५ लाख कोटी बुडीत कर्जापैकी ६.५ लाख कोटींची कर्जे निकाली काढताना फक्त ३ लाख कोटी वसूल केले गेले व ३.५ लाख कोटी रुपये माफ केले गेले.अशा प्रकारे १३० कोटी जनतेमधील हजारपेक्षा कमी कॉर्पोरेटना ६.५ लाख कोटी रुपयांचा फायदा करून दिल्यावर व त्यांच्या ५ लाख कोटींच्या बुडीत कर्जांचे निवारण पुढे ढकलल्यावर पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटी व राजस्थान-मध्य प्रदेश मतदारांनी भाजपाला इंगा दाखवल्यावर बाकी जर्जर समाज-समूहाला गाजरे दाखवायचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला गेला आहे.अर्थसंकल्पीय भाषणात गरिबांना खूश करणारे अलंकारित शब्द वापरले आहेत; परंतु त्यातील आकडे बघितल्यास गरिबांना देतानाची सरकारची कंजुषी उघड होते. बिगर कॉर्पोरेट घटकांना या पूर्ण अर्थसंकल्पात काय दिले गेले? १२ कोटी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष प्रत्येकी ६००० रुपये याप्रमाणे ७५,००० कोटी रुपये दिले आहेत. कर उंबरठा ५ लाखपर्यंत वाढवून ३ कोटी मध्यमवर्गीयांचा १८,५०० कोटी रुपयांचा फायदा केला गेला. एक कोटी पगारदारांना दिलेली करांतील इतर सूट १५०० कोटी रुपये; ५० लाख व्यापाºयांना दिलेली जीएसटीमधील एकूण सूट १४०० कोटी; ५० लाख मध्यम व लघू उद्योगांसाठी ६०० कोटी; ४२ कोटी असंघटित कामगारांच्या पेन्शनसाठी फक्त ५०० कोटी. या सगळ्या ५९ कोटी लोकांसाठी ९८,००० कोटी रुपये दिले गेले, तर जेमतेम हजारेक कॉर्पोरेटसाठी ६.५ लाख कोटी रुपये, हे सरकारचे गरीबविरोधी व श्रीमंतधार्जिणे रूप.नोटाबंदी, जीएसटी व रेरा या तिळ्यांच्या प्रसूतीमुळे इमारत बांधकाम क्षेत्र पूर्ण गलितगात्र झाले होते. त्याला थोडेफार प्रोटिन पाजण्याचा प्रयत्न झालेला आहे. कर सवलतींमुळे वाहने व गृहोपयोगी उत्पादनांना पण प्रोत्साहन मिळेल. गेल्या वर्षी लावलेला इक्विटी कॅपिटल गेन कर समाप्त न केल्याने शेअर बाजारासाठी विशेष काही नाही. खासगी गुंतवणुकीसाठी चालना न दिल्यामुळे यंत्रसामग्री उत्पादकांची स्थिती डळमळीत राहील व रोजगारवाढ खुंटेल. जोपर्यंत घरगुती उपभोग व मागणी वाढत नाही तोपर्यंत सरकारच्या आर्थिक वाढीच्या आकड्यांवर विश्वास ठेवणे हाराकिरी आहे.(लेखक आर्थिक विषयांचे तज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Farmerशेतकरी