शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

त्र्यंबकेश्वरचेही दत्तकविधान!

By किरण अग्रवाल | Updated: February 15, 2018 07:33 IST

पारंपरिक कामांखेरीज विकासाची नवी मानके स्थापायचित तर त्यासाठी कल्पनाशक्ती हवीच; पण कल्पनेतल्या संकल्पनांना वास्तवात उतरवायचे तर निधीही गरजेचा असतो.

पारंपरिक कामांखेरीज विकासाची नवी मानके स्थापायचित तर त्यासाठी कल्पनाशक्ती हवीच; पण कल्पनेतल्या संकल्पनांना वास्तवात उतरवायचे तर निधीही गरजेचा असतो. नव्हे, तोच महत्त्वाचा असतो. अनेक ठिकाणच्या विकासाचा गाडा अडतो अथवा रुततो तो या निधीअभावीच. त्यामुळे निधी वितरणाचा अधिकार असलेल्या खुद्द राज्याच्या अर्थमंत्र्यांनीच त्र्यंबकेश्वरला दत्तक घेण्याची घोषणा केली म्हटल्यावर तेथील विकासाबाबतच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक ठरावे.बारा ज्योतिर्लिंगांतील एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला मोठा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला असला तरी, या वारशाचे नीटपणे जतन होत नसल्याची वास्तविकता चटकन नजरेत भरणारीच ठरत आली आहे. ज्योतिर्लिंगामुळे तेथे भाविकांची बारमाही गर्दी असतेच, त्याखेरीज वारकरी संप्रदायाचे आराध्य ज्ञानोबा माउलींचे वडील बंधू असलेले संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांचे समाधी मंदीरही त्र्यंबकेश्वरात असल्याने त्यांच्या दर्शनासाठीही प्रतिदिनी शेकडो भाविक येतात. पौष वद्य एकादशीला मोठी यात्रा भरते. त्याकरिता तर लाखो भाविक तेथे येत असतात. सिंहस्थात शैवांचा मेळाही त्र्यंबकेश्वरी भरत असतो, जो देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या लोकांच्याही श्रद्धा व औत्सुक्याचा भाग असतो. त्र्यंबकेश्वरातल्याच पर्वतरांगांतील ब्रह्मगिरीतून गंगा नदी अवतीर्ण झाल्याचे दाखले इतिहासात आहेत. पण असे सारे ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ असतानाही त्यांच्याशी संबंधित स्थळे दुर्लक्षित आहेत. देवदर्शनाच्या निमित्ताने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह त्र्यंबक भेटीवर आलेल्या राज्याच्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही ते निदर्शनास आले, आणि म्हणूनचच गंगा अवतीर्ण झालेल्या व सिंहस्थाचे स्नान होणा-या कुशावर्त कुंडाबरोबरच ब्रह्मगिरीला दत्तक घेण्याची घोषणा त्यांनी केली. मुनगंटीवार अर्थमंत्री असल्याने या स्थळांच्या देखरेख व विकासाकरिता निधीची अडचण येणार नाही, पर्यायाने हे दत्तक विधान फळास येईल, अशी आशा त्यातून बळावून गेली आहे.त्र्यंबकच्या या दत्तकविधानाला नाशिकच्या दत्तकविधानाची पार्श्वभूमी आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेऊन विकास करून दाखविण्याचा शब्द नाशिककरांना दिला होता. त्यानुसार महापालिकेत भाजपाची सत्ता येऊनही विकास कुठे दिसेना म्हणून तुकाराम मुंढे यांना नाशकात पाठविले गेल्याची चर्चा आता होते आहे. यावरून दत्तक पाल्याची काळजी घेण्याची भूमिका स्पष्ट व्हावी, म्हणूनच त्र्यंबकच्याही दत्तकविधानाकडे मोठ्या आशा-अपेक्षेने पाहिले जात आहे. अर्थात त्र्यंबक नगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर हे दत्तकविधान केले गेले आहे. त्यामुळे निवडणुकोत्तर लाभाच्या दृष्टीने त्याकडे पाहता येणारे असून, स्थानिक सत्ताधा-यांना ते लाभदायीच ठरणार आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या आर्थिक मर्यादा लक्षात घेता राज्यस्तरावरून पर्यटन विकाास व पुरातन वास्तू संवर्धनासाठीचा निधी उपलब्ध झाल्यास ऐतिहासिक वास्तू वा स्थळे जतन करणे सोयीचे ठरणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, ब्रह्मगिरी पर्वतावरील निसर्गसंपदा जपली जाण्याचीही अपेक्षा या दत्तकविधानातून वाढून गेली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे वनखातेही असल्याने या पर्वतराजीवरील वनसंवर्धनाला यातून चालना मिळू शकेल. पर्वत पोखरून त्यावर होऊ घातलेल्या अतिक्रमणाच्या संदर्भाने त्याचे मोठे महत्त्व आहे. ब्रह्मगिरीतून उगम पाऊन कुशावर्तात अवतीर्ण झालेल्या गंगा नदीचा पुढील मार्ग जागोजागी अवरुद्ध झाला आहे. नमामि गोदा फाउण्डेशनसारख्या पर्यावरणवादी संस्थांच्या सोबतीने स्थानिक नगरपालिका गंगेला खळाळती ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेच, आता या दत्तकविधानातून सदर मोहिमेलाही बळ लाभण्याची अपेक्षा आहे. एकूणच अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे देवदर्शन त्र्यंबकेश्वरवासीयांच्याही पथ्यावरच पडले असे म्हणायचे.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका