शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

चिंतनासोबत कृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 04:28 IST

वायुप्रदूषणामुळे मेंदूरोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोग यांचे प्रमाणदेखील वाढीस लागले असून जगात दरवर्षी ९० लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत.

वायुप्रदूषणाच्या चक्रव्यूहातून सुटका व्हावी, यासाठी जगभरातील संशोधक सातत्याने प्रयत्नशील आहेत. याचा धोका आता सर्वसामान्यांच्या घरातील चौकटीपर्यंत येऊन पोहोचला आहे. वायुप्रदूषणामुळे मेंदूरोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोग यांचे प्रमाणदेखील वाढीस लागले असून जगात दरवर्षी ९० लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. भारतात हीच संख्या १८ लाख आहे. चिंतेची बाब म्हणजे ३० टक्के लोकांना यामुळेच पक्षाघात होत आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांच्या संशोधनातून समोर आले आहे. वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांवर जगभरात विविध पातळ्यांवर चिंतन सुरू आहे. २०१५ मध्ये पॅरिस येथे संयुक्त राष्ट्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हवामान बदलाच्या परिषदेमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली होती. यानंतर अनेक देशांनी यासंदर्भात कठोर पावलेदेखील उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र आपल्या देशात अद्यापही वायुप्रदूषणाला हवे तेवढे गंभीरतेने घेण्यात आलेले नाही हे दुर्दैव आहे. देशातील कुठल्याही शहरातील रस्त्यांवर मोकळा श्वास घेण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. नेतेमंडळींकडून मोठमोठे दावे निश्चित करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात ‘सायलेन्सर’मधून निघणाऱ्या धुराप्रमाणे हे दावे कधी हवेत मिसळून जातात हे कळतदेखील नाही. कागदावरील उपाययोजना या अद्यापही प्रत्यक्षात फारशा उतरलेल्या नाहीत. देशात ‘आयआयटी’, ‘नीरी’ इत्यादी ठिकाणी मौलिक संशोधन सुरू आहे. मात्र प्रयोगशाळा व चर्चासत्रांच्या चौकटींमध्येच हे संशोधन बंद झाले आहे. आपल्याकडे प्रदूषणाबाबत जनजागृती म्हटली की एक छोटेखानी कार्यक्रम, हारतुरे, पाहुण्यांचे स्वागत, फोटोग्राफी व त्यानंतर पेपरबाजी असा ठराविक क्रम असतो. असेच सुरू राहिले तर सर्वार्थाने जागृती होणे अशक्यप्राय बाब आहे. मुळात कुठल्याही प्रदूषणावर नियंत्रण आणणे ही केवळ कुठल्याही एका संस्थेची जबाबदारी नाही. ही सामाजिक समस्या समजून सर्वंकष व एकत्रितपणे प्रयत्नांची आवश्यकता आहे. समाजातील प्रत्येक स्तरांतून यात सहभाग होणे ही काळाची गरज आहे. राजकारण्यांनीदेखील संशोधकांच्या शिफारसी गंभीरतेने घेतल्या तरच खºया अर्थाने उद्दीष्ट गाठणे शक्य होणार आहे. वायुप्रदूषणाबाबत शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हायला हवी. संबंधित विषयाचे गुण व पुस्तकांच्या जगाबाहेर आणून विद्यार्थ्यांना अगदी मूलभूत बाबी सांगण्यावर भर देणे अपेक्षित आहे. कुठल्याही गोष्टीचे चिंतन हे आवश्यकच असते. मात्र हे चिंतन आत्मचिंतनात बदलले नाही, तर मग चिंता वाढायला सुरुवात होते. भविष्यातील धोका ओळखून केवळ चिंतन की ठोस कृती हे ठरविण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणIndiaभारत