शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कठोर निर्बंध केवळ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST

धुळे : कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. निर्बंध कितीही ...

धुळे : कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. निर्बंध कितीही कठोर असले तरी ते केवळ नावालाच असल्याचे चित्र आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन होताना दिसत नाही. गेल्या आठवड्यापासून पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज ३०० च्या पार जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता. परंतु या दरम्यान केवळ दुकाने, बाजारपेठा बंद होत्या. नागरिक मात्र बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरत होते. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिकांमध्ये कोणतीही भीती नसल्याचे चित्र आहे. धक्कादायक म्हणजे गांभीर्य नसल्याने काळजी घेताना खूपच कमी लोक दिसत आहेत. बसस्थानक, हाॅटेल्स, विवाह समारंभ आदी ठिकाणी ५० टक्के उपस्थितीचा नियम पाळला जात नाही.

कोठे काय आढळले

चित्रपटगृहे

कोरोना काळात अटी-शर्तीच्या आधारे चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी असली तरी धुळे शहरात चित्रपटगृहे बंद आहेत. कारण कोरोना नियमानुसार चित्रपटगृहे चालविणे परवडणारे नाही. त्यामुळे नवीन चित्रपट प्रदर्शित होत नाहीत.

विवाह समारंभ

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी विवाह समारंभ मात्र धुमधडाक्यातच होत आहेत. ५० वऱ्हाडींना परवानगी असताना सर्वच नातेवाईक, मित्र परिवार गोळा होत आहे. गर्दी आहे, मास्कचा वापर नाही. कोरोना नियमांचे पालन होत नाही.

अंत्यविधी

कोरोनाच्या भीतीमुळे अंत्यविधीला फारशी गर्दी नसते. तरीदेखील जवळचे नातेवाईक आणि परिसरातील लोक मिळून अंत्ययात्रेतील संख्या ५० च्या पुढेच असते. अंत्ययात्रेत मात्र कोरोना नियमांचे काटेकोर पालन होते. मास्क वापरतात.

कार्यालये

कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे. काहीजण नियमित मास्क वापरतात तर काहीजण अधूनमधून मास्क वापरताना दिसतात. सॅनिटायझरचा वापरही होत आहे. सध्या ५० टक्के उपस्थिती आहे.

गृह विलगीकरण

गेल्या वर्षभरापासून गृह विलगीकरण हा प्रकार केवळ नावालाच आहे. सुरुवातीला हातावर शिक्का असलेले लोक बाहेर फिरायचे. आता गृह विलगीकरणात असलेले फिरतच आहेत. त्याच्या घराबाहेर बोर्ड नाही.

पहिल्या दिवशी एकही कारवाई नाही

१५ दिवसांंसाठी कठोर निर्बंध लागू केल्याच्या पहिल्या दिवशी एकही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले.